बाली : इंडोनेशियामध्ये आज सकाळी सकाळी भूकंपाचे जोरदार झटके बसले. इंडोनेशियाची राजधानी बालीमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. ज्यामुळे लोक भयभीत जाले. या भूकंपाची तीव्रता ७.० रिश्टर स्केल इतकी होती. युरोपीय-भूमध्यसागरीय भूकंप विज्ञान केंद्राच्या हवाल्याने रॉयटर्सने ही माहिती दिली.
हा भूकंप इतका तीव्र होता की घरातील सर्व गोष्टी हलू लागल्या आणि लोकांनी आपल्या घरातून पळ काढला. दरम्यान, या भूकंपामध्ये किती नुकसान झाले आहे याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र ज्या तीव्रतेचा भूकंपाचा धक्का होता त्यावरून जिवितहानीची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ईएमएससीच्या माहितीनुसार, भूकंपाचे केंद्र इंडोनेशियाच्या मातरम येथून २०१ किमी उत्तरेला आणि पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ५१८ किमी खाली होते. अमेरिकन भूवैज्ञानिक सर्वेक्षणानुसार या भूकंपाची तीव्रता ७.१ इतकी होती.
याआधी भारताच्या छत्तीसगडमधील उत्तर क्षेत्र सरगुजा जिल्ह्यात सोमवारी संध्याकाळी उशिरा भूकंपाचे हलके धक्के जाणवले होते. मात्र या घटनेत कोणत्याही प्रकारची जिवितहानी झाल्याची माहिती नाही.
सेवाव्रती: शिबानी जोशी ईशान्य भारतातील सात राज्ये निसर्ग संपन्नतेने नटलेली राज्य; परंतु सीमारेषा जवळ असल्यामुळे…
मुंबई : आधीच महागाईने बेजार झालेल्या सर्वसामान्य मुंबईकरांना आणखीन महागाईचा फटका बसण्याची शक्यता आहे. सीएनजी…
मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने आयसीसी टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर या फॉरमॅटला अलविदा म्हटले…
महाराष्ट्रातील १० कॉलेजचा त्यात समावेश मुंबई : वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी परदेशामध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची वाढती संख्या…
वॉशिंग्टन : अमेरिकेत आर्थिक मंदीचा फटका बसला आहे. वाढती बेरोजगारी आणि आयटीतील एआयचा वाढता यामुळे…
मुंबई: केसगळती(hair fall) ही सध्याची मोठी समस्या बनली आहे. थोडेफार केस गळणे ही सामान्य बाब…