World cup 2023: भारताची चांद्रमोहीम यशस्वी, आता भारत जिंकणार वर्ल्डकप?

  118

मुंबई: भारताच्या चांद्रयान ३ (chandrayaan 3) या यानाने चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे लँडिंग करताच एक इतिहास रचला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर (south pole) उतरणारा भारत (india) हा पहिला देश ठरला आहे. चंद्रावर यशस्वीपणे यान पाठवणारा भारत चौथा देश ठरला आहे तर दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश ठरला आहे.


इस्त्रोच्या असंख्य कर्मचाऱ्यांनी गेल्या चार वर्षापासून घेतलेली मेहनत अखेरीस यशस्वी ठरली. इस्त्रोच्या या यशाचे सेलिब्रेशन भारतीय संघानेही आयर्लंडमध्ये साजरे केले. बीसीसीआयने एक व्हिडिओ शेअर केला यात भारतीय संघ चांद्रयान ३चे यश साजरे करताना दिसत आहे.


या चांद्रयान ३च्या यशानंतर एक सुखद योगायोग दिसत आहे. हा संयोग वर्ल्डकपशी संबंधित आहे. चांद्रयान २ ही मोहीम इस्रोने २०१९मध्ये लाँच केली होती. मात्र ती यशस्वी झाली नाही. तेव्हा भारतीय संघही वर्ल्डकपमध्ये सेमीफायनलमध्ये हरला होता.


 


आता चार वर्षानंतर इस्त्रोला चंद्रावर यशस्वी लँडिंग करता आली आहे. अशातच भारताच्याही वर्ल्डकप जिंकण्याच्या आशा उंचावल्या आहेत. मुंबई इंडियन्सने याबाबतचे ट्विट केले आहे. हे ट्विट व्हायरल होत आहे.


यावेळेस वनडे वर्ल्डकप भारतात खेळवला जात आहे. ही स्पर्धा ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबरपर्यंत रंगणार आहे. भारतीय संघाने आतापर्यंत दोन वेळा वनडे वर्ल्डकप जिंकला आहे. १९८३मध्ये आणि २०११मध्ये. २०११मध्ये भारतीय संघाने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात ही स्पर्धा जिंकली होती. तेव्हा भारतातच हा वर्ल्डकप रंगला होता.

Comments
Add Comment

सकाळी उठल्यावर वॉलपेपर लावले Believe आणि ठरवले देशासाठी जिंकायचे, ओव्हल विजयानंतर सिराजची प्रतिक्रिया

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीत भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आपल्या

IND vs ENG : चक दे इंडिया! ओव्हल कसोटीत टीम इंडियाने रचले अनेक विक्रम, इतिहासात होईल नोंद

लंडन: लंडनच्या ओव्हल मैदानावर पाचव्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने केवळ इंग्लंडला पराभूतच केले नाही तर अनेक

उत्कंठावर्धक सामन्यात मोहम्मद सिराजनं तारलं

लंडन : केनिंग्टन ओव्हल स्टेडियममध्ये रंगलेल्या भारत - इंग्लंड कसोटी सामन्यात भारत जिंकला. या उत्कंठावर्धक

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट