मुंबई: भारताच्या चांद्रयान ३ (chandrayaan 3) या यानाने चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे लँडिंग करताच एक इतिहास रचला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर (south pole) उतरणारा भारत (india) हा पहिला देश ठरला आहे. चंद्रावर यशस्वीपणे यान पाठवणारा भारत चौथा देश ठरला आहे तर दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश ठरला आहे.
इस्त्रोच्या असंख्य कर्मचाऱ्यांनी गेल्या चार वर्षापासून घेतलेली मेहनत अखेरीस यशस्वी ठरली. इस्त्रोच्या या यशाचे सेलिब्रेशन भारतीय संघानेही आयर्लंडमध्ये साजरे केले. बीसीसीआयने एक व्हिडिओ शेअर केला यात भारतीय संघ चांद्रयान ३चे यश साजरे करताना दिसत आहे.
या चांद्रयान ३च्या यशानंतर एक सुखद योगायोग दिसत आहे. हा संयोग वर्ल्डकपशी संबंधित आहे. चांद्रयान २ ही मोहीम इस्रोने २०१९मध्ये लाँच केली होती. मात्र ती यशस्वी झाली नाही. तेव्हा भारतीय संघही वर्ल्डकपमध्ये सेमीफायनलमध्ये हरला होता.
आता चार वर्षानंतर इस्त्रोला चंद्रावर यशस्वी लँडिंग करता आली आहे. अशातच भारताच्याही वर्ल्डकप जिंकण्याच्या आशा उंचावल्या आहेत. मुंबई इंडियन्सने याबाबतचे ट्विट केले आहे. हे ट्विट व्हायरल होत आहे.
यावेळेस वनडे वर्ल्डकप भारतात खेळवला जात आहे. ही स्पर्धा ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबरपर्यंत रंगणार आहे. भारतीय संघाने आतापर्यंत दोन वेळा वनडे वर्ल्डकप जिंकला आहे. १९८३मध्ये आणि २०११मध्ये. २०११मध्ये भारतीय संघाने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात ही स्पर्धा जिंकली होती. तेव्हा भारतातच हा वर्ल्डकप रंगला होता.
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…