Asia Cup: आशिया कपच्या संघनिवडीवर गांगुलीने दिली ही प्रतिक्रिया

मुंबई: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवड समितीने आशिया कप २०२३साठी (asia cup 2023) भारताच्या १७ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. आशिया कप २०२३ पाकिस्तान (pakistan) आणि श्रीलंका (srilanka) या देशात खेळवला जाणार आहे. ३० ऑगस्ट ते १७ सप्टेंबर ही स्पर्धा रंगणार आहे.


आशिया कप २०२३मध्ये भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध २ सप्टेंबरला रंगणार आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने की भारताकडे आपल्या वनडे संघात चौथ्या स्थानासाठी फलंदाजांचे खूप पर्याय आहेत आणि केवळ एका स्थानावर लक्ष देऊन वर्ल्डकपसारख्या स्पर्धा जिंकता येत नाहीत. गांगुलीने सांगितले की समितीला एका खेळाडूला ठरवून त्याला चौथ्या स्थानासाठी संधी दिली पाहिजे.



आशिया कपबाबत गांगुलीने दिली ही प्रतिक्रिया


भारतीय क्रिकेट मंडळाचा माजी अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाले, भारताकडे प्रचंड प्रतिभा आहे. मी अशा तक्रारी ऐकत आहे की आमच्याकडे हे नाही आमच्याकडे ते नाही. मात्र आमच्याकडे खूप काही आहे आणि समस्या ही आहे की आपल्याला निर्णय घेता येत नाहीये. फलंदाजीत चौथ्या क्रमांकासाठी राहुल द्रविड, निवड समिती आणि रोहित शर्माने कोणत्याही एका खेळाडूला निवडून सातत्याने संधी दिली पाहिजे.



नंबर चार बाबत म्हणाला असं काही


गांगुलीने पुढे सांगितले, चौथा क्रमांक हा केवळ एक नंबर आहे आणि यात कोणीही फिट होऊ शकते. मी वनडे क्रिकेटमध्ये मधल्या फळीत खेळण्यास सुरूवात केली आणि नंतर डावाची सुरूवात करू लागलो आणि त्यावेळेसचा तत्कालीन कर्णधार सचिन तेंडुलकरने असे सांगितले होते. सचिनसोबतही हेच झाले. तेंडुलकरने करिअरच्या सुरूवातीला सहाव्या स्थानावर फलंदाजी केली होती. जेव्हा त्याच्या कर्णधाराने त्याला डावाची सुरूवात करण्यास सांगितले तेव्हा तो जागतिक स्तराचा खेळाडू बनला. चौथ्या स्थानावर कोणीही खेळू शकतं तेथे विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि के एल राहुलसारखे खेळाडू आहेत.

Comments
Add Comment

IPL 2026 Sunil Gavaskar : सुनील गावस्करांची अनफिट क्रिकेटपटूंवर टीका

मुंबई : भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी पुन्

IPL 2026 : गुवाहाटीवर पावसाचे सावट! MI vs RR थरार रंगणार की सामना होणार रद्द?

IPL 2026: मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आज आमनेसामने; विजयासाठी दोन्ही संघ सज्ज

मुंबई : आयपीएल 2026 मधील आजचा सामना क्रिकेटप्रेमींसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स

Umpire Killed Over Run-Out Argument : विशाखापट्टणम हादरलं! रनआऊट दिलं म्हणून थेट अंपायरचीच केली हत्या

विशाखापट्टणम येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने क्रीडा क्षेत्र हादरले आहे. स्थानिक स्तरावर सुरू असलेल्या

IPL 2026 Avesh Khan : लखनऊच्या विजयावरून वाद, आवेश खानच्या 'त्या' कृतीमुळे सनरायझर्स नाराज

मुंबई : रविवार ५ एप्रिल रोजी खेळल्या गेलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ च्या सामन्यात सनरायझर्स

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुची चेन्नई सुपर किंग्सवर 43 धावांनी मात

बंगळूरु : रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (आरसीबी) संघाने चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) संघाचा ४३ धावांनी पराभव केला. आयपीएल