Asia Cup: आशिया कपच्या संघनिवडीवर गांगुलीने दिली ही प्रतिक्रिया

मुंबई: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवड समितीने आशिया कप २०२३साठी (asia cup 2023) भारताच्या १७ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. आशिया कप २०२३ पाकिस्तान (pakistan) आणि श्रीलंका (srilanka) या देशात खेळवला जाणार आहे. ३० ऑगस्ट ते १७ सप्टेंबर ही स्पर्धा रंगणार आहे.


आशिया कप २०२३मध्ये भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध २ सप्टेंबरला रंगणार आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने की भारताकडे आपल्या वनडे संघात चौथ्या स्थानासाठी फलंदाजांचे खूप पर्याय आहेत आणि केवळ एका स्थानावर लक्ष देऊन वर्ल्डकपसारख्या स्पर्धा जिंकता येत नाहीत. गांगुलीने सांगितले की समितीला एका खेळाडूला ठरवून त्याला चौथ्या स्थानासाठी संधी दिली पाहिजे.



आशिया कपबाबत गांगुलीने दिली ही प्रतिक्रिया


भारतीय क्रिकेट मंडळाचा माजी अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाले, भारताकडे प्रचंड प्रतिभा आहे. मी अशा तक्रारी ऐकत आहे की आमच्याकडे हे नाही आमच्याकडे ते नाही. मात्र आमच्याकडे खूप काही आहे आणि समस्या ही आहे की आपल्याला निर्णय घेता येत नाहीये. फलंदाजीत चौथ्या क्रमांकासाठी राहुल द्रविड, निवड समिती आणि रोहित शर्माने कोणत्याही एका खेळाडूला निवडून सातत्याने संधी दिली पाहिजे.



नंबर चार बाबत म्हणाला असं काही


गांगुलीने पुढे सांगितले, चौथा क्रमांक हा केवळ एक नंबर आहे आणि यात कोणीही फिट होऊ शकते. मी वनडे क्रिकेटमध्ये मधल्या फळीत खेळण्यास सुरूवात केली आणि नंतर डावाची सुरूवात करू लागलो आणि त्यावेळेसचा तत्कालीन कर्णधार सचिन तेंडुलकरने असे सांगितले होते. सचिनसोबतही हेच झाले. तेंडुलकरने करिअरच्या सुरूवातीला सहाव्या स्थानावर फलंदाजी केली होती. जेव्हा त्याच्या कर्णधाराने त्याला डावाची सुरूवात करण्यास सांगितले तेव्हा तो जागतिक स्तराचा खेळाडू बनला. चौथ्या स्थानावर कोणीही खेळू शकतं तेथे विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि के एल राहुलसारखे खेळाडू आहेत.

Comments
Add Comment

बीसीसीआयकडून धोनीला दरमहा ७० हजार रुपये पेन्शन

मुंबई : १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्यानंतरही धोनीची क्रेझ तसूभरही कमी झालेली नाही.

वैभव सूर्यवंशीचा टी-२० विश्वचषक संघात समावेश होणार?

भारताचा माजी कर्णधार कृष्णमाचारी श्रीकांत यांची मागणी मुंबई : माजी भारतीय कर्णधार आणि राष्ट्रीय निवड समितीचे

पहिल्याच दिवशी मेलबर्नमध्ये ७५ षटकांत २० बळी

चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला ४२ धावांची आघाडी नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील ॲशेस

भारतीय महिलांचा श्रीलंकेवर एकतर्फी मालिका विजय

शफाली वर्माची ७९ धावांची वादळी खेळी नवी दिल्ली : भारतीय महिला संघाने श्रीलंकेविरुद्धचा तिसरा सामना ८ विकेट्सने

श्रीलंकेविरूद्धच्या खेळीत शेफाली अव्वल! भारतीय महिला क्रिकेट 'टी 20'च्या इतिहासात ठरली वेगवान अर्धशतक करणारी तिसरी फलंदाज

तिरुवनंतपुरम: भारतीय महिला क्रिकेट संघाने एकदिवसीय विश्वचषक जिंकल्यानंतर टी 20 मध्येही उत्कृष्ट कामगिरी कायम

क्रिकेट विश्वात जेमिमाच्या मैत्रीचीच चर्चा!

वाईट काळामधून स्मृती मानधनाला बाहेर काढायला मदत नवी दिल्ली : मैत्रीण कशी असावी, याचे उत्तम उदाहरण जेमिमा