Mayur Datir : मयूर दातीर खून प्रकरणी तिन्ही आरोपी २४ तासात जेरबंद

  653

अंबड पोलिस व गुन्हे शाखेच्या पोलिसांची मोखाडा येथे कारवाई


सिडको : अंबड गावातील मयूर केशव दातीर (फडोळ मळा, अंबड) या युवकाच्या खून प्रकरणातील आरोपी करण अण्णा कडूसकर (वय २१), मुकेश अनिल मगर (वय २५), रविंद्र शांताराम आहेर (वय २८) यांना २४ तासाच्या आत जेरबंद करण्यात आले आहे. अंबड तसेच गुन्हे शाखेच्या पथकाने मोखाडा (जि. ठाणे) येथे केलेल्या संयुक्त कारवाईत तिघे आरोपी पोलिसांच्या हाती लागले.


याबाबतचे अधिक वृत्त असे की, गुरूवारी दुपारी अंबड गावातील महालक्ष्मी नगरमधील हनुमान मंदिराजवळ ही घटना घडली होती. दारू पिण्यासाठी पैसे मागण्यावरून वाद झाला. या वादाचे पर्यावसन प्राणघातक हल्ल्यात झाले. करण कडुसकर, रवी आहेर, मुकेश मगर यांनी धारदार शस्त्राने मयूर दातीर याच्या छाती व पोटावर वार केले. हे घाव वर्मी बसल्याने मयूरचा जागीच मृत्यू झाला. यातील करण कडुसकर याच्यावर खून, घरफोडी सह १८ गुन्हे दाखल आहेत. तर मुकेश मगर याला हद्दपार करून अहमदनगर जिल्ह्यात सोडण्यात आले होते.


या घटनेचे वृत्त समजताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे, शेखर देशमुख, अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रमोद वाघ यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासास प्रारंभ केला होता. मारेकऱ्यांना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेत अंबड वासियांनी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला होता. आरोपींचा माग काढत असताना ते घटनेनंतर त्र्यंबकेश्वर मार्गे मोखाडा येथे गेल्याची माहिती मिळताच अंबड व गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्तपणे कारवाई करत तिघांना ताब्यात घेतले आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments

dr.a v .hardikar.    August 18, 2023 07:17 PM

गुन्डाना कायद्याची भीती अजिबात वाटत नाही.. आता आता या नमक हरामा किती वर्ष आपल्या खर्च म्हणजे करदात्यांच्या खर्चाला कोर्ट तुरुंगामध्ये पोषण त्यांच्यावरचा सुरक्षा वगैरे सगळे खर्च करणे याचा अंदाज सरकार कधी प्रसिद्ध करेल का ? दीड वर्ष ते मंत्री आता बाहेर आले माजी मंत्री नवाब मलिक, यांच्यासाठी जनतेच्या करातून किती खर्च झाला आणि शेवटी त्याचा फायदा जनतेला कायदा आहे कळेल का ? हे तीन गुंड नावाजलेल्या अगोदरचे गुंड हे बहुतेक जामिनवर फिरत असणार ? आणि त्यामुळे त्यांची हिम्मत चेपलेल्यात. यांच्यासाठी निराळ्या तर्हेचे कायदे ,काहीतरी झटप व्हायला पाहिजेत. अन्यथा हे आणखीन असंच करणार !काही दिवसापूर्वी दोन बहिणी दोन मुलींना ठार मारलं खून केला आणि कोर्टात त्यांना फाशीची शिक्षा झाली . पण त्या शिक्षेची अंमलबजावणी पाच वर्षात झाली नाही उशिरा झाले म्हणून फाशीच्या ऐवजी त्यांना जन्मठेपेची शिक्षा दोन्हीला बायकांना मिळाली. आता ह्याला जबाबदार कोण तिथले शासकीय अधिकारी ज्यानी अंमलबजावणीला ?विलंब केला? विशेष पैसे खाऊन केलं? का केलं ? अंमलबजावणीला उशीर केला आणि शेवटी जनतेच्या बोकांडी या सगळ्यांना फुकट पोसणं पडलंय . त्यासाठी आम्ही कर भरतो का? मी 72 सालापासून कर भरतो, इन्कम टॅक्स आणि याच्यासाठी भरतोय का याअसे वाटते .तेवढ्या तुम्ही कोर्टात भरती करून ठेवता व प्रत्येक तुरुंगामध्ये कच्चे कैदी कच्चे कैदी त्याच्यावरती किती प्रचंड खर्च आहे ? कुणी नाही का याच्यावर विचार करणारा तज्ञ ,एक्सपर्ट ? का हे असंच चालायचं ? ही??? लोकशाही म्हणायची का गुंडशाही ? म्हणायची की बेकायदा होण्याची न्यायालय म्हणायचे की दिरंगाई करणारी अन्यायालय म्हणायची? अगदी साधे साधे हातच्या काकणाला सुद्धा सिद्ध करायला ते वर्षानुवर्षे घालवतात ? माझा अनुभव आहे. याला कोण जबाबदार शासक शासन का तुम्ही आम्ही बिंदास कर भरा म्हटले की भरणारे , नाहीतर दंड करू? फार वाईट चाललंय त्याना अजिबात भीती नाही कायद्याची आणि त्यांचा परत एकमेकांशी संगणमत असतं अशा शंका घ्यायला दाट शंका घ्यायला भरपूर चान्सेस आहेत .काही करणे आपल्याला शक्य नाहीये .? डॉक्टर आनंद हर्डीकर डोंबिवली रामचंद्र नगर पूर्व.

Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या