Sanjay Dutt : तलवारीमुळे डोके फुटले; शूटिंगदरम्यान संजय दत्त थोडक्यात बचावला!

मुंबई : ‘डबल आईस्मार्ट’ या चित्रपटाच्या (Double iSmart) शूटिंग दरम्यान अभिनेता संजय दत्तच्या (Sanjay Dutt) डोक्याला तलवार लागल्याने या अपघात तो गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्याला टाके मारावे लागले.


संजय दत्त सध्या दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीमध्ये एन्ट्री केल्याचे पहायला मिळत आहे.


लवकरच त्याचा ‘डबल इस्मार्ट’ हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या शूटिंगच्या दरम्यान संजय दत्तच्या डोक्याला टाके पडल्याचे सांगितले जात आहे. ’डबल इस्मार्ट’ या सिनेमाचे बँकॉकमध्ये शूटिंग सुरु आहे. तलवारबाजीचा सीन शूट करत असताना संजय दत्तचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्या डोक्याला टाके पडले आहेत.


त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. परंतु संजय दत्तने उपचार घेतल्यावर शुटिंग पूर्ण करण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गेल्या आठवड्यात घडली होती आणि आता संजय दत्त पूर्णपणे बरा असल्याचे सांगितले जात आहे. ‘डबल इस्मार्ट’ हा संजय दत्तचा पहिला तेलुगू सिनेमा आहे.


संजय दत्तने ‘केजीएफ चॅप्टर २’ या सिनेमाच्या माध्यमातून कन्नड मनोरंजन सृष्टीमध्ये एन्ट्री केली होती. यानंतर त्याचा ‘लियो’ हा सिनेमा तामिळ भाषेत आहे. या सिनेमातून तो तामिळ मनोरंजनसृष्टीमध्ये पदार्पण करणार आहे.

Comments
Add Comment

दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची चर्चा असतानाच

Rain Update : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं.मुंबई,

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले

पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते. डोंबिवली: भारताने आशिया

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.