Asia Cup 2023: कधी मिळणार भारत-पाकिस्तान सामन्याचे तिकीट, जाणून घ्या

  243

मुंबई: आशिया कप २०२३ची सुरूवात येत्या ३० ऑगस्टपासून होत आहे. या स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात रंगणार आहे. यावेळेस आशिया कपचे आयोजन हायब्रिड मॉडेलप्रमाणे होत आहे. या स्पर्धेतील ९ सामने हे श्रीलंकेत होणार आहेत. तर ४ सामने पाकिस्तानात खेळवले जाणार आहेत.


श्रीलंकेत खेळवल्या जाणाऱ्या सामन्यांची तिकीट विक्री गुरूवार म्हणजेच आजपासून सुरू होत आहे. चाहते भारत आणि पाकिस्तान यांच्यात रंगणाऱ्या सामन्याचे तिकीट गुरूवारी खरेदी करू शकतात. हा सामना पल्लेकल येथे खेळवला जाणार आहे.



आजपासून तिकीट विक्री


खरंतर, पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने प्रेस रिलीजद्वारे तिकीट विक्रीची माहिती दिली. पीसीबीने सांगितले की श्रीलंकेत खेळवल्या जाणाऱ्या सामन्यांची तिकीटे १७ ऑगस्टला १२.३०वाजल्यापासून खरेदी करता येतील. तिकीट विक्रीचा दुसरा टप्पा संध्याकाळी सात वाजता सुरू होईल. भारत आणि पाकिस्तान यांच्यात २ सप्टेंबरला सामना खेळवला जाईल. या सामन्याची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. भारत-पाकिस्तान सामन्याचे तिकीट आज चाहत्यांना मिळणार आहे. हे दोन्ही संघ पल्लेकलमध्ये आमनेसामने असतील.


इंडिया टुडेच्या बातमीनुसार चाहत्यांना तिकीट खरेदी करण्यासाठी पासपोर्ट अथवा ओळखपत्राची गरज असेल. या दोन्हींपैकी कोणतेही एक कागदपत्र असणे गरजेचे आहे. एका ओळखपत्रावर तुम्हाला केवळ चार तिकीटे खरेदी करता येऊ शकतात. तर एका ओळखपत्राने भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याचे केवळ दोन तिकीटे तुम्हाला मिळू शकतात. प्रेक्षक ऑनलाईन पद्धतीने याची तिकीटे खरेदी करू शकतात. यासाठी त्यांना पीसीबीच्या वेबसाईटला भेट द्यावी लागेल.


आशिया कप २०२३चा पहिला सामना मुल्तानमध्ये खेळवला जाईल. यानंतर ३ सप्टेंबरला बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांच्यात लाहोरमध्ये खेळवला जाईल. लाहोरमध्ये ५ सप्टेंबर आणि ६ सप्टेंबरला सामने आयोजित केले जातील. याशिवाय बाकी ९ सामने श्रीलंकेत खेळवले जाणार आहेत. स्पर्धेचा शेवटचा सामना १७ सप्टेंबरला कोलंबोमध्ये होणार आहे.

Comments
Add Comment

IND vs ENG : चक दे इंडिया! ओव्हल कसोटीत टीम इंडियाने रचले अनेक विक्रम, इतिहासात होईल नोंद

लंडन: लंडनच्या ओव्हल मैदानावर पाचव्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने केवळ इंग्लंडला पराभूतच केले नाही तर अनेक

उत्कंठावर्धक सामन्यात मोहम्मद सिराजनं तारलं

लंडन : केनिंग्टन ओव्हल स्टेडियममध्ये रंगलेल्या भारत - इंग्लंड कसोटी सामन्यात भारत जिंकला. या उत्कंठावर्धक

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा