Asia Cup 2023: कधी मिळणार भारत-पाकिस्तान सामन्याचे तिकीट, जाणून घ्या

मुंबई: आशिया कप २०२३ची सुरूवात येत्या ३० ऑगस्टपासून होत आहे. या स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात रंगणार आहे. यावेळेस आशिया कपचे आयोजन हायब्रिड मॉडेलप्रमाणे होत आहे. या स्पर्धेतील ९ सामने हे श्रीलंकेत होणार आहेत. तर ४ सामने पाकिस्तानात खेळवले जाणार आहेत.


श्रीलंकेत खेळवल्या जाणाऱ्या सामन्यांची तिकीट विक्री गुरूवार म्हणजेच आजपासून सुरू होत आहे. चाहते भारत आणि पाकिस्तान यांच्यात रंगणाऱ्या सामन्याचे तिकीट गुरूवारी खरेदी करू शकतात. हा सामना पल्लेकल येथे खेळवला जाणार आहे.



आजपासून तिकीट विक्री


खरंतर, पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने प्रेस रिलीजद्वारे तिकीट विक्रीची माहिती दिली. पीसीबीने सांगितले की श्रीलंकेत खेळवल्या जाणाऱ्या सामन्यांची तिकीटे १७ ऑगस्टला १२.३०वाजल्यापासून खरेदी करता येतील. तिकीट विक्रीचा दुसरा टप्पा संध्याकाळी सात वाजता सुरू होईल. भारत आणि पाकिस्तान यांच्यात २ सप्टेंबरला सामना खेळवला जाईल. या सामन्याची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. भारत-पाकिस्तान सामन्याचे तिकीट आज चाहत्यांना मिळणार आहे. हे दोन्ही संघ पल्लेकलमध्ये आमनेसामने असतील.


इंडिया टुडेच्या बातमीनुसार चाहत्यांना तिकीट खरेदी करण्यासाठी पासपोर्ट अथवा ओळखपत्राची गरज असेल. या दोन्हींपैकी कोणतेही एक कागदपत्र असणे गरजेचे आहे. एका ओळखपत्रावर तुम्हाला केवळ चार तिकीटे खरेदी करता येऊ शकतात. तर एका ओळखपत्राने भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याचे केवळ दोन तिकीटे तुम्हाला मिळू शकतात. प्रेक्षक ऑनलाईन पद्धतीने याची तिकीटे खरेदी करू शकतात. यासाठी त्यांना पीसीबीच्या वेबसाईटला भेट द्यावी लागेल.


आशिया कप २०२३चा पहिला सामना मुल्तानमध्ये खेळवला जाईल. यानंतर ३ सप्टेंबरला बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांच्यात लाहोरमध्ये खेळवला जाईल. लाहोरमध्ये ५ सप्टेंबर आणि ६ सप्टेंबरला सामने आयोजित केले जातील. याशिवाय बाकी ९ सामने श्रीलंकेत खेळवले जाणार आहेत. स्पर्धेचा शेवटचा सामना १७ सप्टेंबरला कोलंबोमध्ये होणार आहे.

Comments
Add Comment

Asia Cup: टीम इंडियाने सुपर ४ साठी केले क्वालिफाय, पाकिस्तानचे काय होणार?

दुबई: टीम इंडियाने आशिया कप २०२५च्या सुपर ४ साठी क्वालिफाय केले आहे. आता या ग्रुपमधून दुसरा कोणता संघ क्वालिफाय

पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कारवाई होणार?

नवी दिल्ली: काल भारत आणि पाकिस्तान या दरम्यान दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्याच्या टीमने

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून सूर्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हात नाही मिळवला, सांगितले हे कारण

मुंबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने ७ विकेट राखत विजय मिळवला. या

IND vs PAK: भारताने पाकड्यांना धुतले, ७ विकेट राखत मिळवला विजय

दुबई: आशिया कप स्पर्धेतील सहाव्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर जबरदस्त विजय मिळवला आहे. पाकिस्तानने

हॉकी आशिया कपमध्ये भारतीय महिला संघ उपविजेता

अंतिम सामन्यात चीनकडून ४-१ ने पराभव बीजिंग : महिला हॉकी आशिया कपमध्ये भारतीय संघ उपविजेता राहिला. हांगझोऊ येथे