आयटी कंपन्यांकडून २.२६ लाख कर्मचाऱ्यांना नारळ

नवी दिल्ली : माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांमध्ये नोकरकपात वेगाने सुरू आहे. २०२२च्या तुलनेत २०२३ मध्ये माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांनी ४० टक्के अधिक नोकरकपात केली आहे. २ लाख २६ हजार कर्मचाऱ्यांना या कंपन्यांनी घरी बसवले आहे.


अल्टइंडेक्स डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील परिस्थिती अधिक गंभीर आहे. त्यामुळे यंदा मोठ्या प्रमाणात या कंपन्यांमध्ये नोकरकपात सुरू आहे.


जानेवारी ते डिसेंबर २०२२ मध्ये कंपन्यांनी १ लाख ६४ हजार ७४४ कर्मचाऱ्यांना घरी बसवले होते. यंदा जानेवारीत ७५ हजार ९१२, फेब्रुवारीत ४० हजार नोकरकपात केली. जागतिक अर्थव्यवस्थेतील अनिश्चितता, महागाई, पुरवठा साखळीतील अडथळे, महसुलात होणारी घट यामुळे माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांनी २०२३ मध्ये मोठी नोकरकपात केली. यात गुगल, मेटा, मायक्रोसॉफ्ट व ॲमेझॉन अशा बड्या कंपन्यांचा समावेश आहे. या सोबतच काही लहान कंपन्यांनीदेखील नोकरकपात केली आहे.

Comments
Add Comment

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या

केरळमध्ये 'ब्रेन-इटिंग अमीबा'चा हाहाकार; १८ जणांचा बळी, ही लक्षणे दिसल्यास तातडीने व्हा सावधान!

नवी दिल्ली : केरळमध्ये पुन्हा एकदा 'ब्रेन-इटिंग अमीबा' (Brain-Eating Amoeba) चा धोका वाढला असून, या वर्षी या जीवघेण्या संसर्गाचे

पंतप्रधान मोदींनी वाढदिवसानिमित्त महिलांना दिली खास भेट; सुरु केले 'हे' नवे अभियान

धार: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील धार येथे महिलांसाठी 'स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान'ची घोषणा

भारत धमक्यांना घाबरत नाही, घरात घुसून मारतो - पंतप्रधान मोदी

भोपाळ : “हा नवा भारत आहे, तो कोणत्याही अणुबॉम्बच्या धमक्यांपासून घाबरत नाही. हा नवा भारत घरात घुसून मारतो,” असे