Akshay Kumar Indian Citizenship : 'दिल और सिटीझनशिप दोनों हिंदुस्थानी' अक्षय कुमार झाला भारतीय

ट्विटर पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली खुशखबर


मुंबई : गेल्या तीन दशकांहून अधिक काळ बॉलीवूड (Bollywood) गाजवलेल्या आणि चाहत्यांच्या हृदयात स्थान मिळवलेल्या बॉलीवूडच्या खिलाडीला अखेर भारतीय नागरिकत्व (Indian Citizenship) मिळाले आहे. अक्षय कुमार (Akshay Kumar) हा यापूर्वी कॅनडाचा (Canada) नागरिक होता, त्यामुळे त्याच्यावर काही लोकांकडून अनेकदा टीकाही झाली होती. मात्र आता अधिकृत सरकारी कागदपत्रांचे फोटोज आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करत आजच्या स्वातंत्र्यदिनादिवशी त्याने ही खुशखबर दिली आहे.


अक्षयने ट्विटरवर (Twitter post) एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात त्याचं नाव अक्षय हरिओम भाटिया असं आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, “दिल और सिटीझनशिप, दोनो हिंदुस्थानी. स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा! जय हिंद." त्याच्या चाहत्यांनी त्याचे अभिनंदन करत स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.





अक्षयचा नुकताच ओएमजी २ (OMG 2) चित्रपट प्रदर्शित झाला आहे. आगामी काळात तो टायगर श्रॉफ सोबत बडे मियाँ छोटे मियाँ या ॲक्शन थ्रिलर चित्रपटात देखील दिसणार आहे. अक्षय त्याच्या हिट कॉमेडी चित्रपट हाऊसफुलच्या पाचव्या भागासाठी रितेश देशमुखसोबत पुन्हा एकत्र येणार आहे. तो बहुप्रतिक्षित हेरा फेरी ३ मध्ये देखील दिसणार आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत