Akshay Kumar Indian Citizenship : 'दिल और सिटीझनशिप दोनों हिंदुस्थानी' अक्षय कुमार झाला भारतीय

ट्विटर पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली खुशखबर


मुंबई : गेल्या तीन दशकांहून अधिक काळ बॉलीवूड (Bollywood) गाजवलेल्या आणि चाहत्यांच्या हृदयात स्थान मिळवलेल्या बॉलीवूडच्या खिलाडीला अखेर भारतीय नागरिकत्व (Indian Citizenship) मिळाले आहे. अक्षय कुमार (Akshay Kumar) हा यापूर्वी कॅनडाचा (Canada) नागरिक होता, त्यामुळे त्याच्यावर काही लोकांकडून अनेकदा टीकाही झाली होती. मात्र आता अधिकृत सरकारी कागदपत्रांचे फोटोज आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करत आजच्या स्वातंत्र्यदिनादिवशी त्याने ही खुशखबर दिली आहे.


अक्षयने ट्विटरवर (Twitter post) एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात त्याचं नाव अक्षय हरिओम भाटिया असं आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, “दिल और सिटीझनशिप, दोनो हिंदुस्थानी. स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा! जय हिंद." त्याच्या चाहत्यांनी त्याचे अभिनंदन करत स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.





अक्षयचा नुकताच ओएमजी २ (OMG 2) चित्रपट प्रदर्शित झाला आहे. आगामी काळात तो टायगर श्रॉफ सोबत बडे मियाँ छोटे मियाँ या ॲक्शन थ्रिलर चित्रपटात देखील दिसणार आहे. अक्षय त्याच्या हिट कॉमेडी चित्रपट हाऊसफुलच्या पाचव्या भागासाठी रितेश देशमुखसोबत पुन्हा एकत्र येणार आहे. तो बहुप्रतिक्षित हेरा फेरी ३ मध्ये देखील दिसणार आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

तुमच्यापेक्षा सभागृहात गोंधळ घालण्यात आम्ही एक्सपर्ट

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेचे सर्व पक्षांच्या नगरसेवकांना सोबत घेवून चांगल्याप्रकारे कामकाज क

मुंबईतील फेरीवाला माफियाराज कायमचेच उखडून टाका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील वाढत्या फेरीवाल्यांवरील कारवाई सध्या प्रशासनाने कडक केली असली तरी या

औद्योगिक क्षेत्राला अपेक्षित कौशल्य प्रशिक्षणाचे कार्यक्रम सारथीने सुरू करावेत : विखे पाटील

मुंबई : उद्योजकांच्या संघटनांशी संपर्क ठेवून औद्योगिक व सेवा क्षेत्रात मागणी असलेल्या कौशल्य प्रशिक्षणाचे

महावितरणचा 'आयपीओ' येणार - उत्पन्न वाढीसाठी मुख्यमंत्र्यांनी केली सूचना; 'कॉर्पोरेट गव्हर्नन्स' चा अंमल करणार

मुंबई : ऊर्जा क्षेत्रात कार्यरत असलेल्या बाजारपेठेचा लाभ उठवित महावितरणने आयपीओ (इनिशियल पब्लिक ऑफरिंग) आणत

Kokan Railway: कोकणकरांसाठी आनंदाची बातमी! शिमग्यासाठी धावणार खास विनाआरक्षित 'ही' ट्रेन

मुंबई : कोकणकरांसाठी महत्वाचा सण म्हणजे शिमगा, राज्याच्या कानाकोपऱ्यातून चाकरमानी आपल्या गावी शिमग्यासाठी

दहिसर नदी प्रदूषण रोखण्यासाठीच्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार

मुंबई : दहिसर नदीतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे,