Asian Champion trophy: जपानला हरवत भारताचा अंतिम फेरीत प्रवेश

मुंबई: हरमनप्रीत सिंहच्या(harmanpreet singh) नेतृत्वात भारतीय पुरुष संघाने(indian mens team) आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या(asian champion trophy) सेमीफायनलमध्ये जपानला(japan) 5-0 अशी मात देत फायनलमध्ये एंट्री घेतली आहे. भारतीय संघ पूर्णपणे जपान संघावर भारी पडला. भारताला(india) फायनलमध्ये मलेशियासोबत(malaysia) लढावे लागेल. मलेशियाने त्यांच्या सेमीफायनलमध्ये दक्षिण कोरियाचा 6-2 असा पराभव केला होता. भारताकडून आकाशदीप सिंह(18), हरमनप्रीत सिंह(23), मनदीप सिंह(30), सुमित (39), शमशेर सिंह(51) यांनी गोल केले. जपानच्या संघाला एकही गोल करण्याची संधी संपूर्ण सामन्यादरम्यान मिळाली नाही.


पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळाली. कोणत्याच संघाला यात गोल करता आला नाही. दुसऱ्या क्वार्टरमधील चौथ्या मिनिटाला आकाशदीपने पहिला गोल करत संघाचे खाते खोलले. यानंतर कर्णधार हरमनप्रीतने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर केले आणि भारताला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. तिसरा फिल्ड गोल भारताच्या मनदीप सिंहने केला. मनदीपने हरमनप्रीतच्या शॉटला शानदार पद्धतीने गोलमध्ये रूपांतरित करीत भारताला हाफ टाईमपर्यंत 3-0 अशी आघाडी मिळवून दिली.



हरमनप्रीत पुन्हा विजयाचा हिरो


भारतीय संघाने सेकंड हाफच्या सुरूवातीला 3-0 अशी आघाडी घेतली होती. भारतासाठी चौथा गोल सुमितने तिसऱ्या क्वार्टरमध्ये केला. तीन क्वार्टरच्या खेळानंतर भारताने 4-0 अशी आघाडी घेत आपला विजय निश्चित केला होता. चौथ्या क्वार्टरच्या सुरूवातीला शमशेर सिंगने हरमनप्रीतच्या शानदार पासला जपानच्या गोल पोस्टमध्ये धाडत ही आघाडी आणखीनच मजबूत केली. हा स्कोर भारताचा अंतिम स्कोर ठरला.

Comments
Add Comment

T20 World Cup 2026 : अभिषेक शर्माच्या फॉर्मची काळजी करणाऱ्यांची मला काळजी वाटते : सूर्यकुमार यादव

आयसीसी टी२० २०२६ च्या विश्वचषकाचा गट टप्पा संपला असून आता सुपर ८ चा महत्वाचा टप्पा सुरु झाला आहे. या स्पर्धेत

भारत आणि दक्षिण आफ्रिका रविवारी आमनेसामने

अहमदाबाद : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ आता निर्णायक टप्प्यात पोहोचला असून रविवारी नरेंद्र मोदी स्टेडियमवर

शिखर धवन दुसऱ्यांदा अडकला विवाहबंधनात

नवी दिल्ली : माजी भारतीय क्रिकेटपटू शिखर धवनने दुसऱ्यांदा लग्न केले. आयर्लंडच्या सोफी शाइनसोबत शिखर धवनने लग्न

सुपर एट फेरीतला पहिलाच सामना पावसामुळे रद्द

कोलंबो : आयसीसी पुरुष टी ट्वेंडी वर्ल्डकप २०२६ च्या सुपर एट फेरीतला पहिला सामना पावसामुळे रद्द झाला आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्धची टी ट्वेंटी मालिका भारताने २-१ अशी जिंकली, सिडनी आणि अॅडलेडमध्ये भारताचा विजय

अॅडलेड : भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला संघांदरम्यान तीन सामन्यांची टी ट्वेंटी मालिका झाली. ही मालिका भारताने

पाक मिस्ट्री स्पिनर्सना रोखण्याचे 'किवीं'समोर आव्हान

कोलंबो :टी-२० विश्वचषकाच्या 'सुपर-८' फेरीचा थरार आजपासून खऱ्या अर्थाने सुरू होत असून, ग्रुप-२ मध्ये न्यूझीलंड आणि