तळोजातील रस्त्यांची दुरुस्ती पावसाळा संपल्यावर

Share

रहिवाशांच्या तक्रारीची सिडकोने घेतली दखल

नवी मुंबई (प्रतिनिधी) : मुसळधार पावसामुळे सिडकोच्या वतीने तळोजा फेज – १/२ मधील डांबरीकरण केलेल्या रस्त्यांवरील डांबराच्या थराची झालेली झीज आणि महानगर गॅस कंपनी व विद्युत विभागाकडून, रस्त्यांचे करण्यात आलेले खोदकाम नव्याने दुरुस्ती करण्यात येणार असल्याचे सिडकोचे कार्यकारी अभियंता (तळोजा) मिलिंद म्हात्रे यांनी स्पष्ट केले आहे.

सिडकोकडून पावसाळ्यापूर्वी तळोजा फेज -१/२ मधील रस्त्यांचे डांबरीकरण पावसात वाहून गेले त्यामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पडलेले खड्डे दुरुस्ती आणि रस्त्यांचे नित्कृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या मे. पी.पी. खारपाटील यांची सखोल चौकशी करण्याची मागणी पंचनंद नगर रहिवाशी सामजिक संस्थेचे अध्यक्ष कासम मुलाणी यांनी केली होती. सिडकोकडून तळोजा फेज -१ मधील ९६,९०० वर्ग मीटर रस्त्यांचे डांबरीकरण तसेच फेज -२ मधील ९२,७०० वर्ग मीटर रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले आहे. रस्त्यांचे डांबरीकरण करण्याचे काम मे. पी.पी. खारपाटील कन्ट्रक्शन कंपनीला काम देण्यात आले आहे. ऑक्टोबर -२०२३ पर्यंत काम पूर्ण करण्याचा कालावधी आहे.

सध्या सुरू असलेला मुसळधार पाऊस जून महिन्यात तळोजा परीसरात १,४३३ मिमी. पडल्याची नोंद झाली आहे. या पावसात फेज- १ मधील एकूण डांबरीकरण करण्यात आलेल्या रस्त्यापैकी १ टक्का आणि फेज -२ एकूण कामांपैकी २.७५ टक्के रस्त्याच्या पृष्ठ भागाची (डांबराच्या ३० मिमी. थर) झीज झाल्याचे आढळून आले. तसेच महानगर गॅस कंपनीचे पाइप लाइन टाकण्याचे काम आणि विद्युत विभागाकडून गृहनिर्माण प्रकल्पातील विद्युत केबल टाकण्यासाठी रस्त्यांचे खोदकाम करण्यात आले आहे. सदर कामे पूर्ण झाल्यानंतर तत्काळ नव्याने दुरूस्ती करण्यात आली. परंतु सतत पडत असलेल्या पावसामुळे डांबरीकरणाचे काम पूर्ण झालेले नाही. रस्त्यांचे डांबरीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर दोषदायित्व कालावधी ३ वर्षाचा असल्याने पाऊस कमी झाल्यानंतर तत्काळ रस्त्यांचे दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात येईल असे, मिलिंद म्हात्रे यांनी मुलाणी यांना पाठवलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Recent Posts

“कटातील सर्वांना कल्पनेपेक्षा मोठी शिक्षा मिळेल” पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोठा इशारा

दहशतवाद्यांचे उरलेले अड्डे नष्ट करण्याची वेळ आली आहे- पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्ली: पहलगाममधील पर्यटकांवर…

2 minutes ago

अतिरेक्यांची माहिती द्या, वीस लाख रुपये मिळवा

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पहलगाम…

1 hour ago

Indus Water Treaty : सिंधू नदी पाणी वाटप करार स्थगित, पाकिस्तान पडणार कोरडाठाक

मुख्यमंत्री हिमंता बिस्वा यांची ट्विटर पोस्ट चर्चेत नवी दिल्ली : पहलगाममध्ये पर्यटकांवर मंगळवारी झालेल्या दहशतवादी…

2 hours ago

Riteish Deshmukh : ‘हा’ कलाकार नदीत वाहून गेला म्हणून; रितेश देशमुखने थांबवलं ‘राजा शिवाजी’ सिनेमाचं शूटिंग

सातारा: रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आला आहे. या चित्रपटाचं शूट…

2 hours ago

Kesari Chapter 2 : अक्षय कुमारचा ‘केसरी 2’ फ्लॉप! ६ दिवस उलटूनही गल्ला रिकामीच

मुंबई : बॉलीवूड (Bollywood) चित्रपटसृष्टीत सातत्याने नवनवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. गेल्या काही दिवसांत…

2 hours ago

उधमपूरमध्ये चकमक सुरू, जवान हुतात्मा

उधमपूर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. यानंतर संपूर्ण जम्मू…

3 hours ago