तळोजातील रस्त्यांची दुरुस्ती पावसाळा संपल्यावर

  266

रहिवाशांच्या तक्रारीची सिडकोने घेतली दखल


नवी मुंबई (प्रतिनिधी) : मुसळधार पावसामुळे सिडकोच्या वतीने तळोजा फेज - १/२ मधील डांबरीकरण केलेल्या रस्त्यांवरील डांबराच्या थराची झालेली झीज आणि महानगर गॅस कंपनी व विद्युत विभागाकडून, रस्त्यांचे करण्यात आलेले खोदकाम नव्याने दुरुस्ती करण्यात येणार असल्याचे सिडकोचे कार्यकारी अभियंता (तळोजा) मिलिंद म्हात्रे यांनी स्पष्ट केले आहे.


सिडकोकडून पावसाळ्यापूर्वी तळोजा फेज -१/२ मधील रस्त्यांचे डांबरीकरण पावसात वाहून गेले त्यामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पडलेले खड्डे दुरुस्ती आणि रस्त्यांचे नित्कृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या मे. पी.पी. खारपाटील यांची सखोल चौकशी करण्याची मागणी पंचनंद नगर रहिवाशी सामजिक संस्थेचे अध्यक्ष कासम मुलाणी यांनी केली होती. सिडकोकडून तळोजा फेज -१ मधील ९६,९०० वर्ग मीटर रस्त्यांचे डांबरीकरण तसेच फेज -२ मधील ९२,७०० वर्ग मीटर रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले आहे. रस्त्यांचे डांबरीकरण करण्याचे काम मे. पी.पी. खारपाटील कन्ट्रक्शन कंपनीला काम देण्यात आले आहे. ऑक्टोबर -२०२३ पर्यंत काम पूर्ण करण्याचा कालावधी आहे.


सध्या सुरू असलेला मुसळधार पाऊस जून महिन्यात तळोजा परीसरात १,४३३ मिमी. पडल्याची नोंद झाली आहे. या पावसात फेज- १ मधील एकूण डांबरीकरण करण्यात आलेल्या रस्त्यापैकी १ टक्का आणि फेज -२ एकूण कामांपैकी २.७५ टक्के रस्त्याच्या पृष्ठ भागाची (डांबराच्या ३० मिमी. थर) झीज झाल्याचे आढळून आले. तसेच महानगर गॅस कंपनीचे पाइप लाइन टाकण्याचे काम आणि विद्युत विभागाकडून गृहनिर्माण प्रकल्पातील विद्युत केबल टाकण्यासाठी रस्त्यांचे खोदकाम करण्यात आले आहे. सदर कामे पूर्ण झाल्यानंतर तत्काळ नव्याने दुरूस्ती करण्यात आली. परंतु सतत पडत असलेल्या पावसामुळे डांबरीकरणाचे काम पूर्ण झालेले नाही. रस्त्यांचे डांबरीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर दोषदायित्व कालावधी ३ वर्षाचा असल्याने पाऊस कमी झाल्यानंतर तत्काळ रस्त्यांचे दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात येईल असे, मिलिंद म्हात्रे यांनी मुलाणी यांना पाठवलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

परवानगीविना ३४ मजली इमारत उभी राहिलीच कशी? उच्च न्यायालयाने महापालिकेला खडसावले!

मुंबई : मुंबईत ताडदेव भागात अनिवार्य अग्निसुरक्षा परवाना आणि इतर आवश्यक परवानग्यांविना ३४ मजली इमारत कशी उभी

भाईंदर येथे खून करुन बिहारला फरार झालेला आरोपी १३ वर्षांनी दिल्लीत सापडला

भाईंदर : भाईंदर पूर्वेतील नवघर पोलीस ठाणे हद्दीत १३ वर्षांपूर्वी घडलेल्या एका धक्कादायक खुनाचा गुंता आता सुटला

विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार - मुख्य सचिव राजेश कुमार

मुंबई : महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात प्रगत राज्य आहे. राज्याचा मुख्य सचिव म्हणून २०४७ च्या विकसित महाराष्ट्र

PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेत आता मिळणार इतके व्याज, सरकारने केली घोषणा

नवी दिल्ली: भारत सरकारने स्मॉल सेव्हिंग स्कीम्सवरील व्याजदर कायम राखण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेत आतापर्यंत

व्होट जिहादचे उत्तर हिंदूंनी एकत्रितपणे दिले : डॉ. विखे

अ.नगर : आ.संग्राम जगताप हे एक हिंदुत्वाचा विचार आहे.त्यांना समर्थन देण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित आलो आहे.माझ्या

नांदगाव राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार

माजी नगरसेवक वाल्मीक टिळेकर यांचा शेकडो सर्मथकांसह शिवसेनेत प्रवेश नांदगाव : नांदगाव नगरपालिकेचे राष्ट्रवादी