Manasi Desai : माझ्या वडिलांनी कोणालाही फसवलेलं नाही

नितीन देसाई यांच्या कुटुंबियांकडून पहिली प्रतिक्रिया


मुंबई : कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येनंतर (Nitin Desai suicide case) आता कारणे समोर येऊ लागली आहेत. आत्महत्येनंतर सापडलेल्या वॉईज रेकॉर्डरमध्ये एडेलवाईज कंपनीने (Edelweiss Company) नितीन देसाई यांचा मानसिक छळ केल्याचा उल्लेख असल्याने त्या प्रकरणी चौकशी सुरु आहे. दरम्यान, नितीन देसाई यांची मुलगी मानसी देसाई (Manasi Desai) हिने यावर पहिल्यांदा भाष्य केले आहे. एडेलवाईज कंपनीने नितीन देसाई यांना खोटी आश्वासने दिली, माझ्या बाबांनी कोणालाही फसवलं नाही, असा आरोप मानसी देसाईने केला आहे.


मानसी देसाई म्हणाली, गेली दोन वर्षे डोनर कंपनीसोबत मीटिंग्ज करुन खूप प्रयत्न केले. यात कर्ज फेडण्यासाठीच्या उपायांवरही चर्चा झाली होती. कंपनीनेही त्यांना आश्वासनं दिली की सगळं हँडल करु आणि कंपनीदेखील कर्ज फेडण्यात मदत करेल. पण कंपनीने एकीकडे कायदेशीर कार्यवाही सुरु केली.


पुढे ती म्हणाली, गुंतवणूकदार पण बाबांची मदत करण्यासाठी तयार होते. पण कंपनीने काही मदत करु दिली नाही. माझी सगळ्यांना हीच विनंती आहे की पुढे बाबांबद्दल काहीही खोट्या किंवा चुकीच्या बातम्या पसरवू नका. माझ्या बाबांनी खूप मेहनत करुन त्यांचं नाव कमावलं होतं, ते मातीत मिळवू नका, अशी विनंती मानसी देसाई यांनी केली.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

 
Comments
Add Comment

मुंबईतील गोरेगावात ४५ मजली इमारतीला भीषण आग

मुंबई: मुंबईतील गोरेगाव परिसरात असलेल्या ४५ मजली इमारतीला भीषण आग लागली आहे. या इमारतीच्या नवव्या मजल्यावर

पहिल्या महापालिका सभेत मुख्यमंत्र्यांच्या समक्ष भाजप नगरसेवकांचे घडले असे दर्शन

मुंबई :  मुंबई महापालिकेत मागील पाच वर्ष केवळ पहारेकरी म्हणून काम करणाऱ्या भाजपने खऱ्या अर्थाने विरोधी पक्षाची

जे जे उड्डाणपूलाखाली परिसरातील वर्षानुवर्षांच्या कचऱ्यांसह अतिक्रमणांची जळमटेही केली दूर

मुंबई : दक्षिण मुंबईतील जे जे उड्डाणपूलाखालील भागात मागील काही वर्षांपासून अतिक्रमण होऊन मोठ्याप्रमाणात

मंत्रालयात लाच घेताना लिपिकाला अटक

मुंबई : अन्न व औषध प्रशासन विभागातील लिपिकाला लाच घेताना मंत्रालयात सापळा रचून मोठी कारवाई केली. राजेंद्र ढेरंगे

रेस्टॉरंट्सकडून 'सर्व्हिस चार्ज' आकारणी; मुंबई ग्राहक पंचायतीची कारवाईची मागणी

मुंबई  : 'सर्व्हिस चार्ज देणे हे सक्तीचे नसून तो देणे हा ग्राहकांच्या पूर्णपणे स्वेच्छेवर अवलंबून असताना

विजय मल्ल्या भारतात परतणारच नसतील, तर आम्ही याचिका का ऐकावी?

मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल मुंबई  : फरार आर्थिक गुन्हेगार विजय मल्ल्याने आधी भारतात परत यावे. आम्ही तातडीने