Manasi Desai : माझ्या वडिलांनी कोणालाही फसवलेलं नाही

नितीन देसाई यांच्या कुटुंबियांकडून पहिली प्रतिक्रिया


मुंबई : कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येनंतर (Nitin Desai suicide case) आता कारणे समोर येऊ लागली आहेत. आत्महत्येनंतर सापडलेल्या वॉईज रेकॉर्डरमध्ये एडेलवाईज कंपनीने (Edelweiss Company) नितीन देसाई यांचा मानसिक छळ केल्याचा उल्लेख असल्याने त्या प्रकरणी चौकशी सुरु आहे. दरम्यान, नितीन देसाई यांची मुलगी मानसी देसाई (Manasi Desai) हिने यावर पहिल्यांदा भाष्य केले आहे. एडेलवाईज कंपनीने नितीन देसाई यांना खोटी आश्वासने दिली, माझ्या बाबांनी कोणालाही फसवलं नाही, असा आरोप मानसी देसाईने केला आहे.


मानसी देसाई म्हणाली, गेली दोन वर्षे डोनर कंपनीसोबत मीटिंग्ज करुन खूप प्रयत्न केले. यात कर्ज फेडण्यासाठीच्या उपायांवरही चर्चा झाली होती. कंपनीनेही त्यांना आश्वासनं दिली की सगळं हँडल करु आणि कंपनीदेखील कर्ज फेडण्यात मदत करेल. पण कंपनीने एकीकडे कायदेशीर कार्यवाही सुरु केली.


पुढे ती म्हणाली, गुंतवणूकदार पण बाबांची मदत करण्यासाठी तयार होते. पण कंपनीने काही मदत करु दिली नाही. माझी सगळ्यांना हीच विनंती आहे की पुढे बाबांबद्दल काहीही खोट्या किंवा चुकीच्या बातम्या पसरवू नका. माझ्या बाबांनी खूप मेहनत करुन त्यांचं नाव कमावलं होतं, ते मातीत मिळवू नका, अशी विनंती मानसी देसाई यांनी केली.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

 
Comments
Add Comment

खोकल्याच्या सिरपमुळे बालकांचा मृत्यू; खबरदारीसाठी राज्याने 'हा' टोल-फ्री क्रमांक केला जारी!

मुंबई: मध्य प्रदेश आणि राजस्थानसह देशातील काही राज्यांमध्ये 'कोल्ड्रिफ' (Coldrif) नावाच्या खोकल्याच्या सिरपमुळे काही

लाडक्या बहिणींची 'ई केवायसी'तील तांत्रिक अडचण लवकर दूर करणार, मंत्री आदिती तटकरेंचे आश्वासन

मुंबई(प्रतिनिधी): मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना आता 'ई-केवायसी' बंधनकारक केली आहे.

ठाकरे बंधूंची मात्रोश्रीवर भेट, राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांच्या शक्यता

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या जवळीकीच्या बातम्या चर्चेत आल्या आहेत. शिवसेना

रेल्वे , बेस्ट, एसटी , मेट्रो... आता एकाच कार्डवर फिरू मुंबई ...

मुंबई : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही एकाच प्लॅटफॉर्म आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न होते. त्याच

अंधेरी ते मालाड प्रवास सहा मिनिटांत करता येणार

मुंबई : पश्चिम उपनगरातील अंधेरी ते मालाड या पट्ट्यात प्रचंड लोकवस्ती आहे. मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय,

गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या जुळ्या बोगद्याचे काम नवीन वर्षापासून

मुंबई (खास प्रतिनिधी) :गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातंर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात