बीजिंग : लहान मुलांमधील इंटरनेट आणि स्मार्टफोनच्या व्यसनाला आळा घालण्यासाठी चीन सरकारने कठोर पावले उचलली असून नव्या नियमानुसार, रात्री मुलांना स्मार्टफोन वापरण्यास पूर्णपणे मज्जाव करण्यात आला आहे. देशातील अठरा वर्षांखालील मुलांचा रात्री दहा ते सकाळी सहा या काळातील इंटरनेट अॅक्सेस पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. येत्या दोन सप्टेंबरपासून लोकांशी व्यापक चर्चा केल्यानंतर या नियमांची अंमलबजावणी होणार आहे.
मोबाईल इंटरनेट सेवेinteretच्या वापरासाठी वेगवेगळे टप्पे केले जाणार असून त्याची काटेकोर अंमलबजावणीही करण्यात येईल. आठ वर्षांखालील मुलांना दिवसभरात केवळ चाळीस मिनिटेच मोबाईल इंटरनेटचा वापर करता येईल. सोळा ते सतरा वर्षे वयोगटातील मुलांसाठी हाच वेळ दोन तासांचा असेल.
‘सायबर अॅडमिनिस्ट्रेशन ऑफ चायना’ने (सीएसी) हे नवे प्रस्तावित नियम तयार केले असून ते जगातील सर्वाधिक कठोर नियम म्हणून ओळखले जातात.
दरम्यान या नियमांचे पालन करण्याची कोणतीही सक्ती केली जाणार नसून पालकांना जर बगल द्यायची इच्छा असेल तर ते याला टाळू देखील शकतात, असेही सूत्रांकडून सांगण्यात आले.
इंटरनेटचा अधिक सकारात्मक पद्धतीने वापर व्हावा, सभोवताली चांगले वातावरण निर्माण व्हावे, मुलांमधील इंटरनेट आणि स्मार्टफोनचे व्यसन कमी व्हावे आणि मुलांना चांगल्या सवयी लागाव्यात या उद्देशाने हे नियम तयार करण्यात आले आहेत.
लहान मुलांच्या ऑनलाइन ओळखीचे संरक्षण करण्याबरोबरच त्यांना वयोमानानुसार योग्य कंटेंट कसा मिळेल? त्याचबरोबर त्यांच्यावरील वाईट माहितीचा प्रभाव कसा कमी होईल? हा देखील यामागचा प्रमुख उद्देश आहे.
नव्या डिजिटल तंत्रज्ञानाचा लहान मुलांवरील प्रभाव कमी करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने नियम अधिक कठोर करायला सुरूवात केली आहे. यासाठी देशांतर्गत इंटरनेट कंपन्यांवर देखील वेगवेगळी बंधने घातली जात आहेत.
चीनने २०२१ मध्ये लहान मुलांच्या गेमिंगसाठीच्या वेळेला कात्री लावली होती. चीन सरकारच्या नव्या प्रस्तावित नियमांचे परिणाम शेअर बाजारामध्ये देखील दिसून आले. यामुळे अनेक कंपन्यांचे शेअर कोसळले.
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…
पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…