Income Tax : ज्यांनी अद्याप इन्कम टॅक्स भरला नाही त्यांचे पुढे काय?

काळजी करू नका! ३१ डिसेंबरपर्यंत रिटर्न भरता येईल! पण १ ते ५ हजारापर्यंत दंड भरावा लागेल

मुंबई : इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२३ होती. पण तरीही तुम्ही आयटीआर (Income Tax) भरला नसेल, तर तुम्ही ते ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत भरू शकता. ज्या करदात्यांच्या खात्यांचे ऑडिट करणे आवश्यक नाही, त्यांच्यासाठी दंडाशिवाय इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै होती. रिपोर्टनुसार, बहुतेक करदात्यांनी आधीच त्यांचे विवरणपत्र भरले आहे.


ज्यांनी अद्याप प्राप्तिकर भरला नाही मात्र उशीरा इन्कम टॅक्स रिटर्न फाईल भरल्यास, ५००० रुपयांपर्यंत दंड भरावा लागेल. ५ लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या करदात्यांना लेट फी १,००० रुपये आहे, तर इतरांसाठी ५,००० रुपये आहे.


३१ जुलै नंतर इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याच्या बाबतीत, तुम्हाला देय असलेल्या कोणत्याही करावर दरमहा १ टक्के दराने दंडात्मक व्याज भरावे लागेल.


जेव्हा शेवटच्या तारखेपूर्वी इन्कम टॅक्स रिटर्न दाखल केला तर करदात्यांना १ एप्रिलपासून रिफंडच्या तारखेपर्यंत रिफंडच्या रकमेवर दरमहा ०.५ टक्के दराने व्याज मिळते. तथापि, उशीरा रिटर्न फाइलच्या बाबतीत, हे व्याज इन्कम टॅक्स रिटर्न भरल्याच्या तारखेपासून परताव्याच्या तारखेपर्यंत दिले जाते.


आयकर विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, २०२३-२४ या आर्थिक वर्षात ३१ जुलैपर्यंत ६.७ कोटीहून अधिक करदात्यांनी आयकर रिटर्न भरले आहेत. यापैकी, ५.६२ कोटी पेक्षा जास्त आयटीआर करदात्यांनी व्हेरीफाय केले आहे. ३१ जुलैपर्यंत ३.४४ कोटी रिटर्न्सची पडताळणी झाली.


आयटीआर दाखल करणाऱ्यांची संख्या वर्षानुवर्षे वाढत आहे. गेल्या वर्षी ३१ जुलैपर्यंत ५.८३ कोटीहून अधिक रिटर्न भरले होते, तर यावेळी ही संख्या वाढली आहे. या वर्षी भरलेले एकूण परतावे (ऑडिटसह) सुमारे ८.५ कोटी आहेत.


 
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Gas Supply Changes : स्वयंपाकाच्या गॅसच्या पुरवठ्यात होणार बदल

नवी दिल्ली : स्ट्रेट ऑफ होर्मुझ भागातील वाढत्या लष्करी आणि राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने

Randhir Jaiswal : पीओजेकेतील निवडणुका दिखावा, मानवी हक्क उल्लंघन लपवण्याचा प्रयत्न- रणधीर जयस्वाल

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या ताब्यातील जम्मू-काश्मीर (पीओजेके) येथे घेतल्या जात असलेल्या तथाकथित विधानसभा

Narendra Modi : आसाममधील पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींची खासदारांसोबत आढावा बैठक

नवी दिल्ली : आसाममधील भीषण पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी राज्यातील

Uttarakhand : उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे हाहाकार; चारधाम यात्रा दोन दिवसांसाठी स्थगित

पुढील ४८ तासांत मुसळधार पाऊस, मालदेवतामध्ये २३३ मिमी पावसाची शक्यता देहरादून : उत्तराखंडमध्ये सक्रिय

Himachal Pradesh : भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू

Suneel Anand Passed Away : अभिनेते देव आनंद यांच्या मुलाचे निधन; ज्या रुग्णालयात वडिलांनी घेतला अखेरचा श्वास, तिथेच लेकाचाही मृत्यू

लंडन : हिंदी चित्रपटसृष्टीचे सदाबहार अभिनेते दिवंगत देव आनंद (Dev Anand) यांच्या कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला