मुंबईकरांनो आरोग्य सांभाळा; आजारांमध्ये वाढ

Share

मलेरिया, लेप्टो आणि डेंग्यूच्या रुग्ण संख्येत वाढ

मुंबई : गेल्या दिड महिन्यापासून राज्यभर कोसळणा-या तुफान पावसानंतर आता नागरिकांना विविध संसर्गजन्य आजारांचा सामना करावा लागत आहे. यामध्ये आठवडाभरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या दुप्पट तर मलेरिया रुग्णांची संख्या दीड पटीने वाढली आहे. आठवडाभरात मलेरियाचे ७२१, डेंग्यूचे ५६९ आणि गॅस्ट्रोचे १ हजार ६४९ रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर पालिकेने आपली संपूर्ण आरोग्य यंत्रणा तैनात ठेवली असली तरी मुंबईकरांनी काळजी घ्यावी, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. साथीच्या आजारांना थोपवण्यासाठी उपनगरीय रुग्णालयात ५०० बेड्स तैनात ठेवण्यात आले आहेत. तसेच संध्याकाळी ४ ते ६ ओपीडी सुरू ठेवण्यात आली आहे.

मुंबईत जुलै महिन्यात कोसळलेल्या पावसानं पावसाळी आजारांनी पुन्हा डोकं वर काढलं आहे. मुंबईत मलेरीया, लेप्टो आणि डेंग्यूच्या रुग्णांमध्ये जुलै महिन्यात वाढ झाली आहे. जुलै महिन्यात गॅस्ट्रोच्या एकूण १६४९ रुग्णांची नोंद झाली तर मलेरियाचे देखील जुलै महिन्यात ७२१ रुग्णांची नोंद झाली होती. जून महिन्यात देखील मलेरीयाचा प्रादुर्भाव होता. गेल्या महिन्यात ६७६ रुग्णांची नोंद झाली होती. जुलै महिन्यात लेप्टोच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली. लेप्टोच्या ३७७ रुग्णांची नोंद झाली तर जून महिन्यात लेप्टोचे रुग्ण ९७ होते.

डेंग्यूने देखील जुलै महिन्यात डोकं वर काढलं आहे. जुलै महिन्यात ५७९ रुग्णांची नोंद झाली आहे. तेच डेंग्यूचे जून महिन्यात ३५३ रुग्ण आढळून आले होते. म्हणजे जून महिन्याच्या तुलनेत जुलै महिन्यात रुग्ण वाढल्याचे पाहायला मिळाले. चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येत देखील जूनच्या तुलनेत वाढ होताना पाहायला मिळाली आहे. जून महिन्यात चिकगुनियाचे ८ रुग्ण होते तेच जुलै महिन्यात ही संख्या २४ वर पोहोचल्याचं दिसलं. पावसाचा जोर वाढल्यानंतर मुंबई पालिकेकडून लेप्टोसंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या गेल्या होत्या.

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Recent Posts

महाराष्ट्राला बालमृत्यूचे ग्रहण!

सात वर्षात १ लाखांहून अधिक नवजात बालकांचे मृत्यू मुंबई(साक्षी माने) : महाराष्ट्रात मोठ्या लोकसंख्येने जागोजागी…

27 minutes ago

मेट्रो-७ अ दुसऱ्या बोगद्याचे भुयारीकरण मे अखेरीस पूर्ण होणार

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (टी २) ते अंधेरी पूर्व मेट्रो-७ अ या…

1 hour ago

कोकणातील तरुणाची वेगळी वाट…

माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…

7 hours ago

छोड आये हम वो गलियाँ…

वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…

7 hours ago

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, २४ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…

8 hours ago

पहलगाममधील नरसंहार, हिंदू पर्यटकांना टार्गेट

भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…

8 hours ago