IND vs WI: खेळाडूंना मूलभूत सुविधा तरी द्या

विंडिज क्रिकेट बोर्डाच्या व्यवस्थापनावर पंड्याने व्यक्त केली नाराजी


विंडिज दौऱ्यादरम्यान(IND vs WI) दिल्या गेलेल्या सुविधांबाबत भारतीय संघाचा कर्णधार हार्दिक पंड्याने वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाच्या व्यवस्थापनावर नाराजी व्यक्त केली. वेस्ट इंडिज बोर्डाने प्रवासासारख्या गोष्टींकडे थोडे अधिक लक्ष दिले पाहिजे. खेळाडूंना मूलभूत सुविधा दिल्या पाहिजेत, असे पंड्या म्हणाला.


पंड्या म्हणाला की, एकदिवसीय मालिकेच्या आधी विमानाला ४ तास उशीर झाल्याची तक्रारही अनेक वरिष्ठ खेळाडूंनी बीसीसीआयकडे केली होती. त्यामुळे सामन्यापूर्वी खेळाडूंना पुरेशी झोप घेता आली नाही. पुढच्या वेळी आम्ही वेस्ट इंडिजमध्ये आलो, तर परिस्थिती सुधारण्याची आशा करतो. वेस्ट इंडीज बोर्डाने प्रवासासारख्या गोष्टींकडे थोडे अधिक लक्ष दिले पाहिजे. आम्ही चैनीची मागणी करत नाही, तर मूलभूत सुविधा दिल्या पाहिजेत.


आपल्या अर्धशतकीय खेळीबद्दल हार्दिक म्हणाला की, 'मला फलंदाजी करताना मैदानात टिकायचे होते. मी सामन्यापूर्वी विराट कोहलीशी बोललो. त्याने मला खेळपट्टीवर थोडा वेळ घालवण्यास सांगितले आणि ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये जुळवून घेण्याचा सल्ला दिला.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.
Comments
Add Comment

अमेरिकेकडून होर्मुज सामुद्रधुनीजवळील इराणी भागात ५,००० पौंडांचा बॉम्ब हल्ला

वॉशिंग्टन : अमेरिकेने बुधवारी पहाटे इराणवर अनेक मोठे हल्ले केले आहेत. अमेरिकन सैन्याने सांगितले की या

सौदी अरेबियाकडून भारताला रेड सी मार्गे कच्च्या तेलाचा पुरवठा सुरू

नवी दिल्ली : अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे स्ट्रेट ऑफ होर्मुज परिसरातील संकट अधिक

इराण-इस्रायल युद्ध सुरु राहिले तर उपासमारी येईल?; डब्ल्यूएफपीने काय सांगितले?, जाणून घ्या

नवी दिल्ली: संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अन्न कार्यक्रमाने (WFP) इशारा दिला आहे की, अमेरिका, इस्रायल आणि इराण

२८ फेब्रुवारीपासून आखाती देशांमधून किती भारतीय परतले ?, परराष्ट्र मंत्रालयाकडून खुलासा

नवी दिल्ली: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर बदललेल्या परिस्थितीत, आखाती देशांमधून मोठ्या

Dubai Airport : दुबई विमानतळ बंद : एअर इंडियाची सर्व उड्डाणे तात्पुरती रद्द; प्रवाशांमध्ये गोंधळ

पश्चिम आशियात तणाव कायम असताना, एअर इंडियाने सोमवारी (१६ मार्च) दुबईकडे जाणारी आपली सर्व उड्डाणे रद्द केली आहेत.

Iran-US-Israel War : इराणमधील भारतीय दूतावासकडून पुन्हा एकदा सूचना जारी

इराणमध्ये भू-राजकीय संकट सुरू झाल्यानंतर मध्यपूर्वेत अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी भारत सरकार