
जाणून घ्या कोणत्या दिवशी कोणत्या राज्यात कोणता अलर्ट?
मुंबई : राज्यात सगळीकडे हाहाकार माजवल्यानंतर गेले दोन दिवस पावसाने थोडी विश्रांती घेतली आहे. मात्र हवामान खात्याने (Indian Metrological Deaprtment) नुकत्याच वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात पुढील चार ते पाच दिवसात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता (Rain updates) आहे. बंगालच्या किनारपट्टीवर निर्माण झालेला तीव्र कमी दाबाचा पट्टा (Deep Depression) पुढे सरकत असून आज संध्याकाळी तो बांगलादेश किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे. त्यानंतर तो पुढील २४ तासांत पश्चिम बंगालमधील गंगा नदीचे खोरे ओलांडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा एकदा धो-धो पावसाला सुरुवात होऊ शकते.
भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मंगळवारी सातारा आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर पुणे, रायगड, कोल्हापूर, रत्नागिरी आणि मुंबईमध्ये तसेच विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. या ठिकाणी यलो अलर्ट दिला आहे.
1 Aug: बांगलादेश किनार्यावर बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र (Deep Depression).संध्याकाळपर्यंत ते खेपुपाराच्या पूर्वेला बांगलादेश किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता
नंतर,पुढील २४ तासांत Gangetic WestBengalओलांडण्याची शक्यता
पुढील ४,५ दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता
IMD pic.twitter.com/NNYa9YFtJK
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 1, 2023
२ ऑगस्ट
ऑरेंज अलर्ट - मुंबई, पुणे, रायगड, सिंधुदुर्ग आणि सातारा
यलो अलर्ट - कोल्हापूर, रत्नागिरी, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ
३ ऑगस्ट
ऑरेंज अलर्ट - मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि सातारा
यलो अलर्ट - कोल्हापूर, रत्नागिरी, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ
४ ऑगस्ट
यलो अलर्ट - मुंबई, पालघर, रायगड, पुणे, सिंधुदुर्ग आणि सातारा
ऑगस्ट - सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस
राज्यात काही जिल्ह्यांचा अपवाद वगळला तर जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पाहायला मिळाला. पण ऑगस्ट महिना हा अधिकाधिक प्रमाणात कोरडा जाण्याचीच शक्यता आहे. भारतीय हवामान विभागानं पुढील दोन महिन्यांसाठी पावसाचा अंदाज जाहीर केला आहे. या दोन महिन्यांमध्ये देशात मान्सून सामान्य राहिल, असा अंदाज आहे. महाराष्ट्रातही ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांमध्ये पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.