Maharashtra Assembly Opposition Leader : शिक्कामोर्तब! चर्चेत असलेली नावे सोडून 'या' नेत्याला मिळाले विरोधी पक्षनेतेपद

जाणून घ्या कोणत्या पक्षाचा ठरला विरोधी पक्षनेता...


मुंबई : राज्यातील सत्तानाट्यानंतर विधानसभा विरोधी पक्षनेता (Maharashtra Assembly Opposition Leader) कोण हा मुद्दा चर्चेत आला होता. यापूर्वी विरोधी पक्षनेता असलेले सद्यकालीन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत सरकारला पाठिंबा दिल्याने एक मोठी राजकीय उलथापालथ झाली. या घटनेला उद्या म्हणजेच दोन ऑगस्टला एक महिना पूर्ण होईल. त्यामुळे जवळजवळ महिनाभर विरोधी पक्षनेत्याची जागा रिकामीच होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) संख्याबळ कमी झाल्याने काँग्रेसने (Congress) विरोधी पक्षनेते पदावर आपला दावा केला होता. त्यानुसार आता विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी काँग्रेसचे विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांना देण्यात आली असून त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

२०१४ ते २०१९ या कार्यकाळात अखेरच्या तीन महिन्यांत विजय वडेट्टीवार यांना विरोधी पक्षनेतेपदाची संधी मिळाली होती. त्यावेळी, राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपसोबत गेल्यामुळे त्यांना ही संधी मिळाली होती. आता, दुसऱ्यांदा त्यांना विरोधी पक्षनेतेपदाची संधी मिळत आहे. त्यामुळे, काँग्रेस पक्षात वडेट्टीवार यांचं स्थान वाढल्याचं दिसून येतं.

महाराष्ट्रातील विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद सुमारे चार वर्षांनंतर काँग्रेसकडे चालून आले आहे. पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavhan), अशोक चव्हाण (Ashok Chavhan)आणि बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) हे तीन नेत्यांची नावे चर्चेत असताना विजय वड्डेटीवार यांच्या नावाची घोषणा आज करण्यात आली आहे. विधीमंडळ पक्षनेते पदाची जबाबदारी बाळासाहेब थोरात यांच्याकडेच राहणार आहे. बाळासाहेब थोरात यांना हा निर्णय दिल्ली हायकंमाडने कळवला आहे.
Comments
Add Comment

आज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

मशीद, सँडहर्स्ट रोड आणि काही थांबे रद्द मुंबई : मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार?

शरद पवार गटाकडून हालचालींना सुरुवात मुंबई : राज्यातील महापालिका निवडणुकांचे निकाल आल्यानंतर, आता सर्वच राजकीय

मुंबईत ४५ हजार शासकीय निवासस्थाने बांधणार

महापालिका निकालानंतर राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय मुंबई : राज्यातील २९ महापालिका निवडणुकीचे निकाल लागले आहेत.

मतदान अधिक, तरीही एमआयएमपेक्षा मनसेच्या जागा कमी

मुंबई : मुंबई महापालिकेच्या झालेल्या निवडणुकीत एआयएमआयएम पक्षाला मिळालेले यश हा चर्चेचा विषय झाला आहे. या

मुस्लीम मतदारांची मते यापुढेही निर्णायक ठरणार

मुंबई : संपूर्ण राज्यातील महानगरपालिकांमध्ये एआयएमआयएमचे ९५ च्या आसपास नगरसेवक निवडून आले असून त्यात मुंबईतील

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व नैसर्गिक वारशाचे ‘टीसीएस’कडून जतन

मुंबईतील राजाबाई टॉवर, ग्रंथालय इमारत, वस्तुसंग्रहालयाचे संवर्धन मुंबई : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व