Sambhaji Bhide : संभाजी भिडेंच्या वक्तव्यावर राजकारणी तापले...

दीपक केसरकर म्हणतात भिडेंचं वय झालंय तर छगन भुजबळांची कठोर कारवाईची मागणी


मुंबई : शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे (Sambhaji Bhide speech) यांनी त्यांच्या विदर्भ दौर्‍यामध्ये अमरावतीत महात्मा गांधीजींविरोधात (Mahatma Gandhi) वादग्रस्त वक्तव्य केलं होतं, तर यवतमाळमध्ये त्यांनी पंडित नेहरु (Pandit Nehru) यांच्याबद्दलदेखील वादग्रस्त वक्तव्य केलं. या गोष्टीवरुन राजकारणी, आंबेडकरी संघटना, सामाजिक संघटना सध्या आक्रमक झाल्या आहेत. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) व शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनीसुद्धा तीव्र विरोध दर्शवला आहे.


दीपक केसरकर म्हणाले, संभाजी भिडेंना मी ओळखतो कारण ते गडकिल्ल्यांच्या संदर्भात काम करतात. एक तर त्यांनी राजकीय प्रश्नांवर भाष्य करणं बंद केले पाहिजे. आणि ज्या प्रकारे त्यांनी भाष्य केलं आहे, मला वाटतं की हा वयोमानाचा परिणाम आहे. आमच्या गृहमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही निश्चितपणे सगळं तपासून बघू. माझी स्वतःची त्यांच्याशी भेट झाली तर मी सांगेन की अशा प्रकारच्या विधानांमुळे राज्यालाच नाही तर देशालाही दुःख होतं त्यामुळे हे थांबवा, असं दीपक केसरकर म्हणाले आहेत.



छगन भुजबळ म्हणतात...


महात्मा गांधींना अख्खं जग नमन करतं. मी अनेक ठिकाणी गेलो, असं क्वचित देश असेल जेथे महात्मा गांधींचा पुतळा नाही. त्यांच्यावर जे गलिच्छ स्वरूपात टीका करतात त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. त्यांच्यासोबत जाणं राजकारणासाठी आत्मघातकी आहे, महात्मा गांधींना असं बोललं तर देशातीलच तर नाहीच, गुजरातमधील कुठलाही बांधव-भगिनी सहन करेल का मग ते मोदी असतील किंवा शाह असतील, असं छगन भुजबळ म्हणाले.


त्यांच्यावर कडक कारवाई होत नाही म्हणून ते रोज नवीन काहीतरी बोलत राहतात. काल ते पंडित नेहरूंनी देशासाठी काही योगदान नाही असं ते म्हणतात. पण त्यांचे वडिल देशातील सर्वात श्रीमंत वकील त्यांनी देशासाठी सर्व काही दिलं, स्वतः साडेअकरा वर्ष नेहरू तुरुंगात राहिलेत असेही भुजबळ यावेळी म्हणाले. तुम्हाला एखादी व्यक्ती आवडत नसेल तर त्यांची स्तुती करू नका पण असली टीका मला आवडत नाही, असेही छगन भुजबळ यावेळी म्हणाले.


संभाजी भिडे, खरं म्हणजे तो मनोभर भिडे याच्यावर आम्हीसुद्धा एक केस दाखल केली आहे. आमच्या बंगल्यातील आंबे खाल्ल्यानंतर मुलगा होईल या वक्तव्यावर कोर्टात ती केस सुरू आहे. त्यांच्यावर कारवाई झाली पाहीजे, आम्ही कोर्टात गेलो, पण कोर्टात तारीखच लागत नाही. शेवटी सरकार केस करणार, पण केस केल्यानंतर ती लवकर वर आली पाहिजे. तारखांवर तारखा पडतात. आम्ही स्वतः कोर्टात गेलो आहोत. मला कधी-कधी वाटतं की मनोहर भिडे यांचं डोक ठिकाण्यावर आहे की नाही, तेच मला कळत नाही" असेही छगन भुजबळ म्हणाले.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

भांडुप स्टेशनजवळ बेस्टच्या बसने १३ जणांना चिरडले

मुंबई : भांडुप स्टेशनजवळ बेस्टच्या बसने रात्री दहाच्या सुमारास १३ जणांना चिरडले. या अपघातात तीन महिला आणि एक

मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकाऱ्यांनी घेतली मतदान नियमावलीची माहिती अन् अनुभवले ईव्हीएम यंत्राचे प्रात्यक्षिक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरूवार, १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार

एमपीएससी परीक्षेत प्रत्येक प्रश्नासाठी उत्तर देणे बंधनकारक

मुंबई : राज्य लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षांच्या उत्तरपत्रिकेत बदल करण्यात आले

लाडक्या बहिणींच्या ई-केवायसीला ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील दीड कोटी महिलांना ई-केवायसी करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी मेट्रो 'ॲक्वालाईन' रात्रभर धावणार

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी मेट्रो 'ॲक्वालाईन' रात्रभर धावणार ▪️मुंबई मेट्रो रेल

उबाठा गटाने ४२ जणांना दिले एबी फॉर्म

मुंबई: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. आता दुसऱ्या आणि