मनोर: डुकले पाड्यातील विष्णू नारायण शेलार यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी चिता रचलेल्या भागात हात नदीच्या पुराचे पाणी भरल्याने वाहत्या पाण्यातच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची घटना आवंढाणी येथे घडली आहे. यावेळी ग्रामस्थांची चांगलीच तारांबळ उडाली होती. दरम्यान अर्धवट जळलेला मृतदेह पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचे बोलले जात आहे. साचलेल्या पाण्यातच मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
गेल्या दोन दिवसांपासून पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. चिल्हार आवंढाणी ग्रामपंचायत हद्दीतील आवंढाणी गावच्या डुकले पाड्यात चिता रचलेल्या ठिकाणी हात नदीच्या पुराचे पाणी भरले होते. या साचलेल्या पाण्यात मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आदिवासी बहूल वस्तीसाठी स्मशानभूमीच नसल्याने प्रशासनाच्या उदासीन कारभारामुळे आदिवासींना मृत्यूनंतरही यातना सोसाव्या लागत आहेत. डुकले पाड्याच्या ग्रामस्थांनी याबद्दल संताप व्यक्त केला आहे.
पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण आणि आदिवासी बहुल भागात जीवनावश्यक सोयी सुविधांचा अभाव आहे. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही ग्रामस्थांना मूलभूत सुविधा मिळवण्यासाठी मोर्चे काढावे लागतात. वर्षानुवर्षे गटार,पाणी,रस्ते,वीज सारख्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी काम करूनही पायाभूत सुविधा गाव पाड्यात पोहोचवण्यात जिल्हा प्रशासनाला अपयश आले आहे.
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…