पेण: रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इरसाळवाडीची घटना घडल्यानंतर प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे. पेण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत तरणखोप हद्दीतील बारीवाडी या आदिवासी वाडीला लागून असलेल्या डोंगराला तडे जावून मोठ मोठ्या भेगा पडायला सुरुवात झाली आहे. बारीवाडीला दरड व भूस्खलनाचा धोका असल्याने तहसीलदार स्वप्निल डोईफोडे यांनी तातडीने १५० नागरिकांना स्थलांतरित केले आहे. दरम्यान, ७० घरे असलेली बारीवाडी एका तासात खाली करायला सांगितल्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती.
यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डी.बी.पाटील, सामाजिक कार्यकर्ते दिनेश पाटील, सरपंच सुनील पाटील, हनुमान पाटील, संजू पाटील, स्वप्नील पाटील, विशाल गावंड तसेच ग्रामसेवक तानाजी मेकाले, तलाठी शिवाजी वाभले यांनी सर्व नागरिकांना गणपती वाडी येथील मराठा समाज भवनात तात्पुरते स्थलांतरित केले आहे.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…