Soveli Dam : सरकार धरण फुटण्याचीच वाट पहातेय!

पाच वर्षांपासून पाठपूरावा करुनही होतेय दुर्लक्ष


दापोलीतील सोवेली धरणाला गळती, नागरिकांमध्ये घबराट, प्रशासनाकडून पाहणी, दक्ष राहण्याच्या सूचना

दापोली : रत्नागिरी जिल्ह्यातही काही ठिकाणी दरड कोसळून घरांना धोका निर्माण झाल्याच्या घटना घडल्या आहेत. दापोली तालुक्यात दाभोळ भंडारवाडा येथील हनुमान मंदिराची भिंत कोसळून मंदिराला मोठा धोका निर्माण झाला आहे. एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे दापोलीतील सोवेली धरणाला गेल्या पाच वर्षापासून लागलेली गळती यावर्षी वाढल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. प्रशासनाच्या वतीने स्थानिक अधिका-यांनी धरणाची पाहणी केली. या पावसात सर्वजण हतबल असून नागरिकांना दक्ष राहण्याच्या सूचना केल्या आहेत.


गळती लागल्याची माहिती मिळताच प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी सोवेली धरणाची पाहणी केली. या पाहणीत धरणाच्या भिंतीच्या मध्यभागी आणि पायाजवळ पाण्याची गळती होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. येथील ग्रामस्थांनी मागिल ५ वर्षांपासून गळती होत असून त्याकडे प्रशासन लक्ष देत नाही, मात्र पावसाळ्यात येथे धोका निर्माण होऊ शकतो ही गंभीर बाब दापोली प्रशासनाच्या लक्षात आणून दिली आहे.


दरम्यान, या पाहणीनंतर प्रांताधिकारी डॉक्टर थोरबोले यांनी संबंधित विभागाला तातडीने लक्ष घालण्याच्या सूचना दिल्या आहेत. धरणाच्या खालील बाजूला असणा-या लोकांना दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच हे धरण ज्यांच्या अधिपत्याखाली येते त्या लघुपाटबंधारे विभागाला प्रांताधिकार्‍यांनी लेखी पत्र देऊन तातडीने उपाययोजना करण्यासाठी कळवले आहे.


मात्र पावसाचा जोर कायम असल्याने येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मागिल पाच वर्षापासून पाठपूरावा करुनही दुर्लक्ष केले जात असल्याने सरकार धरण फुटण्याचीच वाट पहातेय का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

वकिलाकडून थुंकीने पान उलटण्यावर न्यायाधीशांचा आक्षेप

कोलकाता : कोलकाता उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती अमृता सिन्हा यांनी एका वकिलाने थुंकी लावून पान उलटण्यावर

अहमदाबादच्या भक्तांकडून साईचरणी सोन्याची गणेश मूर्ती

शिर्डी : श्री साईबाबांवर देश-विदेशातील लाखो भाविकांची अढळ श्रद्धा असून, भाविकांकडून श्री साईबाबांच्या चरणी

भारतीय रेल्वेने ११ वर्षांत तयार केले ४२ हजारांहून अधिक एलएचबी कोच

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने गेल्या ११ वर्षांत (२०१४-२०२५) ४२,६०० हून अधिक एलएचबी कोच (लिंके हॉफमन बुश) तयार केले

अवघ्या १३व्या वर्षी शाळकरी मुलांमध्ये व्यसनाची सुरुवात!

दहा शहरांतील अभ्यासातून वास्तव उघड… मुंबई  : देशातील शाळेत जाणाऱ्या मुलांमध्ये तंबाखू, धूम्रपान, मद्यपान तसेच

मीरा रोडच्या गुन्हे शाखेने राजस्थानमधील अमली पदार्थांचा कारखाना केला उद्ध्वस्त

१०० कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त भाईंदर : मीरा रोडच्या काशिगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गुन्ह्याचा तपास

ठाण्यात शुक्रवारपर्यंत पाणीकपात

कल्याण फाटा येथे नादुरुस्त झालेल्या जलवाहिनीचे काम सुरू ठाणे  : कल्याण फाटा येथील महानगर गॅसच्या कामांमध्ये