Debt recovery from Banks : चुकीच्या पद्धतीने कर्ज वसुली करणार्‍या बँकांना निर्मला सीतारामन यांनी खडसावले

काय म्हणाल्या केंद्रीय अर्थमंत्री ?


नवी दिल्ली : बँकांकडून कर्ज वसुलीसाठी (Debt Recovery) अवलंबण्यात येणार्‍या पद्धतींविरोधात संसदेच्या (Sansad) आजच्या पावसाळी अधिवेशनात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी बँकांना खडसावले आहे. कर्जवसुलीसाठी बँका सर्वसामान्यांना त्रास देत असल्याच्या प्रश्नाकडे विरोधकांनी आज संसदेत मंत्र्यांचे लक्ष वेधले. यावर निर्मला सीतारामन यांनी बँकांना 'मर्यादेत' राहून काम करण्याचा इशारा दिला आहे.


निर्मला सीतारामन म्हणाल्या की, 'कर्ज वसुलीसाठी काही बँका लोकांशी अतिशय चुकीच्या पद्धतीने वागतात, अशा तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. सरकारने अशा बँकांना मार्गदर्शक तत्त्वे जारी करावीत, असे आरबीआयला (RBI) स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. सरकारी बँका असोत किंवा खाजगी बँका, त्यांनी कर्ज वसुलीसाठी कठोर पावले उचलू नयेत. कर्ज वसुलीसाठी जेव्हा सामान्यांशी संपर्क साधला जातो, तेव्हा माणुसकी आणि संवेदनशीलता दाखवली पाहिजे.'


काही बँका लोकांकडून कर्ज वसुलीसाठी जबरदस्ती करतात. कर्जाच्या वसुलीसाठी अनेकदा बँकांकडून वारंवार फोन करुन धमकावले जाते, चुकीच्या पद्धतीने बोलले जाते किंवा घरी एजंट पाठवून लोकांसमोर अपमानित केले जाते. आरबीआयच्या मार्गदर्शक सूचना बँकाकडून असे प्रकार केले जातात. मात्र यासंदर्भात अनेक तक्रारी आल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोठी घोषणा केली व त्यानुसार सर्व बँकांना 'मर्यादेत' राहून काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


कर्ज वसुलीबाबत आरबीआयने काही मार्गदर्शक तत्त्वे सांगितली आहेत. त्यांची माहिती असणे आवश्यक आहे.




  • बँकेचा कर्ज वसुली एजंट ग्राहकाला सकाळी ८ ते संध्याकाळी ७ या वेळेतच कॉल करू शकतो.

  • एजंट ग्राहकाने सांगितलेल्या ठिकाणीच भेटू शकतो.

  • ग्राहकाने विचारल्यास एजंटला बँकेने दिलेले ओळखपत्र दाखवावे लागेल.

  • बँकेला ग्राहकांची गोपनीयता सर्वोच्च ठेवावी लागेल.

  • बँकेला ग्राहकाचा शारीरिक किंवा मानसिक छळ करता येत नाही.

  • एखाद्या ग्राहकासोबत असे घडल्यास, ग्राहक थेट आरबीआयकडे तक्रार करू शकतो.


Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

कर्नाटकमध्ये प्रत्येक आमदाराला शुभारंभाच्या सामन्याचे VIP पास मिळणार

बंगळुरू : कर्नाटकमध्ये प्रत्येक आमदाराला आयपीएलच्या राज्यातील शुभारंभाच्या सामन्याचे VIP पास मिळणार आहेत.

लडाखमध्ये हिमस्खलन, सात जणांचा मृत्यू; श्रीनगर-लेह महामार्ग बंद

लडाख : लडाखमधील झोजी ला येथे श्रीनगर-लेह महामार्गावर झालेल्या हिमस्खलनात अनेक वाहने बर्फाखाली गाडली गेली.

महाराष्ट्र आणि गोव्याला पंधराव्या वित्त आयोगाच्या अनुदानाअंतर्गत ५९२ कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी प्राप्त

नवी दिल्ली : केंद्र सरकारने, पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार, आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी, महाराष्ट्र आणि

एस-400 मिसाइलसह संरक्षण उपकरणांच्या खरेदीस मंजुरी

नवी दिल्ली : भारतीय संरक्षण मंत्रालयाने हवाई दलासाठी रशियाकडून एस-400 एअर डिफेन्स सिस्टमची अतिरिक्त बॅटरी खरेदी

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्त्वात उच्चस्तरीय गटाची स्थापना

- पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा निर्णय इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या

PM Narendra Modi : युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी करणार सर्व मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज म्हणजेच शुक्रवार २७ मार्च रोजी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ