Rain Updates : दिल्ली पुन्हा बुडणार!

यमुना नदीने पुन्हा धोक्याची पातळी ओलांडली


नवी दिल्ली : यमुना नदीने पुन्हा एकदा धोक्याची पातळी ओलांडल्याने दिल्लीत पुन्हा एकदा पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. सोमवारी सकाळी ७ वाजता यमुना नदीची पाणीपातळी २०६.५६ मीटरवर पोहोचली.


जुन्या रेल्वे पुलाजवळ यमुनेच्या पाण्याची पातळी १५ तासांत सुमारे एक मीटरने वाढली आहे. १३ जुलै रोजी यमुनेच्या पाण्याची पातळी विक्रमी उंचीवर (२०८.६६ मीटर) पोहोचली होती. त्यामुळे यमुनेच्या पुराचे पाणी लाल किल्ला, राजघाट आणि दिल्लीच्या सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचले होते.


दरम्यान, हरियाणात हथिनी कुंडातून पाणी सोडल्यानंतर पाण्याची पातळी वाढली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एलजी व्ही के सक्सेना यांच्याशी चर्चा केली. परिस्थितीला सामोरे जाण्याच्या तयारीबाबत दोघांमध्ये चर्चा झाली.


शाह म्हणाले की, एनडीआरएफ आणि एसडीआरएफ टीम गरजू लोकांच्या मदतीसाठी उपस्थित आहेत. तसेच सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Sasaram-Patna Passenger Train Catches Fire : सासाराम-पाटणा पॅसेंजरच्या डब्याला पहाटे भीषण आग, प्लॅटफॉर्मवर उडाली एकच धावपळ!

बिहार : बिहारमधील सासाराम जंक्शन रेल्वे स्थानकावर आज पहाटे एक मोठी दुर्घटना टळली. सासारामहून पाटण्याकडे

ICEYE भारतात उपग्रह उत्पादन सुरू करणार

नवी दिल्ली : अंतराळ-आधारित गुप्तचर क्षेत्रातील जगातील आघाडीची कंपनी 'आय-साय' (ICEYE) पुढील एका वर्षात भारतात आपले

Fire : रतलामजवळ राजधानी एक्सप्रेसला आग

रतलाम : तिरुवनंतपुरम-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेसला (गाडी क्रमांक १२४३१) मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात

Education : १ जुलैपासून इयत्ता ९ वी आणि १० वीसाठी तीन भाषा अनिवार्य, CBSE चा निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून इयत्ता ९ वी आणि १० वीच्या भाषा

NEET UG 2026 Paper Leak : नीट २०२६ पेपरफुटी प्रकरण : सीबीआयची मोठी कारवाई, एनटीएच्या बायोलॉजीच्या प्राध्यापिकेला पुण्यातून अटक

नवी दिल्ली : 'नीट-युजी' (NEET-UG) परीक्षेत झालेल्या गैरव्यवहाराप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) तपासाची चक्रे

'पाकिस्तानने ठरवावे की त्यांना भूगोलाचा भाग व्हायचे आहे की इतिहासाचा ?'

नवी दिल्ली : पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला केला आणि त्यांची हत्या केली. या