kailash mansarovar yatra: कैलास मानसरोवर दर्शन आता देशातूनच शक्य, चीनचा व्हिसा नको! कसे? घ्या जाणून

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): आता कैलास मानसरोवर दर्शनासाठी चीनमधून जाण्याची गरज भासणार नाही. उत्तराखंडमधील लिपुलेखच्या डोंगरावरून भाविकांना कैलास मानसरोवर पाहता येणार आहे. २०१९ मध्ये शेवटच्या वेळी लोकांनी दर्शनासाठी प्रवास केला होता. तेव्हापासून कोणत्या ना कोणत्या कारणाने कैलास मानसरोवर यात्रा पुढे ढकलली जात होती.



नुकतीच यात्रा पुन्हा सुरू करण्यासाठी आणि नवीन मार्ग काढण्यासाठी तज्ज्ञांचे पथक जुने लिपुलेख येथे पोहोचले होते. तेथील रोड मॅप, लोकांची राहण्याची व्यवस्था, दर्शनाच्या ठिकाणी पोहोचण्याचा मार्ग आणि इतर गोष्टींवर त्यांनी संशोधन केले.लवकरच ते आपला अहवाल पर्यटन मंत्रालयाला सादर करतील. त्यानंतर या मार्गाचे काम सुरू होईल. उत्तराखंडच्या पिथौरागढ जिल्ह्यात सुमारे १८ हजार फूट उंचीवरून कैलास पर्वत पाहणे पूर्णपणे शक्य आहे.



तिबेटमधील कैलास पर्वत नाभिधंगच्या अगदी वरच्या २ किलोमीटर उंच टेकडीवरून सहज दिसतो. असा दावा केला जात आहे की, हे आतापर्यंत कोणालाही माहीत नव्हते, परंतु जेव्हा काही स्थानिक लोक जुन्या लिपुलेखच्या टेकडीच्या शिखरावर पोहोचले तेव्हा तेथून कैलास पर्वत अगदी जवळ आणि दिव्य दिसला. याबाबत त्यांनी शासकीय अधिकाऱ्यांना माहिती दिली.

कैलास पर्वतरांग काश्मीरपासून भूतानपर्यंत पसरलेली आहे. हा पर्वत ल्हा चू आणि झोंग चू यांच्यामध्ये आहे. येथे दोन जोडलेली शिखरे आहेत. यापैकी उत्तरेकडील शिखर कैलास म्हणून ओळखले जाते.



या शिखराचा आकार विशाल शिवलिंगासारखा आहे.हिंदू धर्मात त्याच्या प्रदक्षिणाला खूप महत्त्व आहे. परिक्रमा ५२ किमी आहे. १९६२ मध्ये भारत आणि चीनमध्ये युद्ध झाले तेव्हा चीनने भारताचे कैलास आणि मानसरोवर ताब्यात घेतले. आता इथे जाण्यासाठी चिनी टूरिस्ट व्हिसा घ्यावा लागेल. यामुळे कैलासला जाणे सोपे नाही.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

नोबेल शांतता पुरस्कारासाठी ट्रम्प यांची वर्णी लागणार का ? आज होणार घोषणा

नॉर्वे : नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे आज नोबेल शांतता पुरस्काराची घोषणा केली जाणार आहे. यावर्षी नोबेल शांतता

भारतातील कोणत्या राज्यात आणि जिल्ह्यात सर्वाधिक रेल्वे स्थानके कुठे आहेत? जाणून घ्या इंटरेस्टिंग माहिती.

भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक रेल्वे स्थानके आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? आणि कोणत्या जिल्ह्यात ४०

ब्रिटनची ९ मोठी विद्यापीठे भारतात कॅम्पस सुरू करणार; पंतप्रधान मोदी आणि कीर स्टार्मर यांची मोठी घोषणा

मुंबई: भारत-ब्रिटन संबंधांमध्ये शिक्षण आणि युवाशक्तीला बळ देणारा एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. ब्रिटनचे

अयोध्या : घरात झालेल्या स्फोटामुळे इमारत कोसळली; ५ जणांचा मृत्यू

अयोध्या : अयोध्या जिल्ह्यातील नगर पंचायत भदरसा भरतकुंडच्या महाराणा प्रताप वॉर्डातील पगलाभारी गावात जोरदार

दहशतवाद्यांनी बर्फवृष्टीचा फायदा घेऊन घुसखोरी करू नये , सुरक्षा दलांनी सज्ज रहावे - अमित शाह

नवी दिल्ली : “केंद्र सरकारचे दहशतवादाविरोधातील “शून्य सहनशीलता” धोरण पुढेही कायम राहणार आहे”, असे केंद्रीय

मोठा अपघात टळला; फर्रुखाबादमध्ये खाजगी विमानाचा अपघात

फर्रुखाबा : उत्तर प्रदेशातील फर्रुखाबाद जिल्ह्यातील मोहम्मदाबाद येथील विमान तळावर आज सकाळी एका खासगी विमानाचा