kailash mansarovar yatra: कैलास मानसरोवर दर्शन आता देशातूनच शक्य, चीनचा व्हिसा नको! कसे? घ्या जाणून

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): आता कैलास मानसरोवर दर्शनासाठी चीनमधून जाण्याची गरज भासणार नाही. उत्तराखंडमधील लिपुलेखच्या डोंगरावरून भाविकांना कैलास मानसरोवर पाहता येणार आहे. २०१९ मध्ये शेवटच्या वेळी लोकांनी दर्शनासाठी प्रवास केला होता. तेव्हापासून कोणत्या ना कोणत्या कारणाने कैलास मानसरोवर यात्रा पुढे ढकलली जात होती.



नुकतीच यात्रा पुन्हा सुरू करण्यासाठी आणि नवीन मार्ग काढण्यासाठी तज्ज्ञांचे पथक जुने लिपुलेख येथे पोहोचले होते. तेथील रोड मॅप, लोकांची राहण्याची व्यवस्था, दर्शनाच्या ठिकाणी पोहोचण्याचा मार्ग आणि इतर गोष्टींवर त्यांनी संशोधन केले.लवकरच ते आपला अहवाल पर्यटन मंत्रालयाला सादर करतील. त्यानंतर या मार्गाचे काम सुरू होईल. उत्तराखंडच्या पिथौरागढ जिल्ह्यात सुमारे १८ हजार फूट उंचीवरून कैलास पर्वत पाहणे पूर्णपणे शक्य आहे.



तिबेटमधील कैलास पर्वत नाभिधंगच्या अगदी वरच्या २ किलोमीटर उंच टेकडीवरून सहज दिसतो. असा दावा केला जात आहे की, हे आतापर्यंत कोणालाही माहीत नव्हते, परंतु जेव्हा काही स्थानिक लोक जुन्या लिपुलेखच्या टेकडीच्या शिखरावर पोहोचले तेव्हा तेथून कैलास पर्वत अगदी जवळ आणि दिव्य दिसला. याबाबत त्यांनी शासकीय अधिकाऱ्यांना माहिती दिली.

कैलास पर्वतरांग काश्मीरपासून भूतानपर्यंत पसरलेली आहे. हा पर्वत ल्हा चू आणि झोंग चू यांच्यामध्ये आहे. येथे दोन जोडलेली शिखरे आहेत. यापैकी उत्तरेकडील शिखर कैलास म्हणून ओळखले जाते.



या शिखराचा आकार विशाल शिवलिंगासारखा आहे.हिंदू धर्मात त्याच्या प्रदक्षिणाला खूप महत्त्व आहे. परिक्रमा ५२ किमी आहे. १९६२ मध्ये भारत आणि चीनमध्ये युद्ध झाले तेव्हा चीनने भारताचे कैलास आणि मानसरोवर ताब्यात घेतले. आता इथे जाण्यासाठी चिनी टूरिस्ट व्हिसा घ्यावा लागेल. यामुळे कैलासला जाणे सोपे नाही.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

स्मृती मानधना-पलाश मुच्छल लग्नाची 'ही' तारीख पंतप्रधानानीचं केली उघड

मुंबई : स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्या लग्नाबाबतची चर्चा अनेक दिवसापासून रंगत होती. मात्र आता त्यांच्या

स्मार्ट सिटीच्या धर्तीवर अयोध्येचा विकास

लखनऊ / अयोध्या : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दूरदर्शी नेतृत्वाचा परिणाम म्हणून अयोध्येचा स्मार्ट सिटी

विधेयक मंजुरीसाठी राष्ट्रपती, राज्यपालांवर वेळेचं बंधन नाही; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना राज्य किंवा केंद्र

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच जिल्हा परिषदांचा कार्यक्रम

आरक्षणासाठी निवडणूक आयोग पुन्हा लॉटरी काढण्याची शक्यता नवी दिल्ली : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या

CM Nitish Kumar Bihar : CM नितीश कुमारांकडे फक्त २१ हजारांची रोख रक्कम! पाटण्यात नावावर घर नाही, तरीही नितीश कुमार यांची एकूण संपत्ती किती?

पाटणा : बिहारच्या राजकारणाला गेल्या दोन दशकांपासून एकच चेहरा व्यापून राहिला आहे, तो म्हणजे नितीश कुमार यांचा. ते

कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे मोठे विधान! राज्यातील राजकारणावर चर्चांना उधाण

कर्नाटक: एकीकडे बिहारमध्ये आज नितीशकुमार यांनी दहाव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तर दुसरीकडे