kailash mansarovar yatra: कैलास मानसरोवर दर्शन आता देशातूनच शक्य, चीनचा व्हिसा नको! कसे? घ्या जाणून

  414

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): आता कैलास मानसरोवर दर्शनासाठी चीनमधून जाण्याची गरज भासणार नाही. उत्तराखंडमधील लिपुलेखच्या डोंगरावरून भाविकांना कैलास मानसरोवर पाहता येणार आहे. २०१९ मध्ये शेवटच्या वेळी लोकांनी दर्शनासाठी प्रवास केला होता. तेव्हापासून कोणत्या ना कोणत्या कारणाने कैलास मानसरोवर यात्रा पुढे ढकलली जात होती.



नुकतीच यात्रा पुन्हा सुरू करण्यासाठी आणि नवीन मार्ग काढण्यासाठी तज्ज्ञांचे पथक जुने लिपुलेख येथे पोहोचले होते. तेथील रोड मॅप, लोकांची राहण्याची व्यवस्था, दर्शनाच्या ठिकाणी पोहोचण्याचा मार्ग आणि इतर गोष्टींवर त्यांनी संशोधन केले.लवकरच ते आपला अहवाल पर्यटन मंत्रालयाला सादर करतील. त्यानंतर या मार्गाचे काम सुरू होईल. उत्तराखंडच्या पिथौरागढ जिल्ह्यात सुमारे १८ हजार फूट उंचीवरून कैलास पर्वत पाहणे पूर्णपणे शक्य आहे.



तिबेटमधील कैलास पर्वत नाभिधंगच्या अगदी वरच्या २ किलोमीटर उंच टेकडीवरून सहज दिसतो. असा दावा केला जात आहे की, हे आतापर्यंत कोणालाही माहीत नव्हते, परंतु जेव्हा काही स्थानिक लोक जुन्या लिपुलेखच्या टेकडीच्या शिखरावर पोहोचले तेव्हा तेथून कैलास पर्वत अगदी जवळ आणि दिव्य दिसला. याबाबत त्यांनी शासकीय अधिकाऱ्यांना माहिती दिली.

कैलास पर्वतरांग काश्मीरपासून भूतानपर्यंत पसरलेली आहे. हा पर्वत ल्हा चू आणि झोंग चू यांच्यामध्ये आहे. येथे दोन जोडलेली शिखरे आहेत. यापैकी उत्तरेकडील शिखर कैलास म्हणून ओळखले जाते.



या शिखराचा आकार विशाल शिवलिंगासारखा आहे.हिंदू धर्मात त्याच्या प्रदक्षिणाला खूप महत्त्व आहे. परिक्रमा ५२ किमी आहे. १९६२ मध्ये भारत आणि चीनमध्ये युद्ध झाले तेव्हा चीनने भारताचे कैलास आणि मानसरोवर ताब्यात घेतले. आता इथे जाण्यासाठी चिनी टूरिस्ट व्हिसा घ्यावा लागेल. यामुळे कैलासला जाणे सोपे नाही.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

२५ जुलैपासून रेल्वेची रामायण यात्रा पर्यटन ट्रेन सुरू

मुंबई: भगवान रामाशी संबंधित धार्मिक स्थळांना भेट देऊ इच्छिणाऱ्या यात्रेकरूंसाठी इंडियन रेल्वे केटरिंग अँड

अ‍ॅपलच्या योजनेला ब्रेक; ३०० चिनी अभियंते भारतातून माघारी

मुंबई : भारताची जागतिक उत्पादन केंद्र होण्याच्या दिशेने वाटचाल करत असलेल्या अ‍ॅपलच्या 'आयफोन १७' प्रकल्पाला

भारतीय सैन्याला मिळणार १.०३ लाख कोटी रुपयांची जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे आणि वाहने

नवी दिल्ली : भारताच्या संरक्षण अधिग्रहण परिषदेने १.०३ लाख कोटी रुपयांची शस्त्रे आणि लष्करी उपकरणे खरेदी

दलाई लामांचा उत्तराधिकारी ठरवण्याचा अधिकार केवळ तिबेटी परंपरेलाच: किरेन रिजिजू

तिबेटीयन धर्मगुरू दलाई लामा यांच्या उत्तराधिकारी निवडीबाबत चीनच्या हस्तक्षेपाच्या प्रयत्नांना भारताचे

ब्रिटिश रॉयल नेव्हीचे बंद पडलेले F35 B लढाऊ विमान, भारतातून तुकडे करुन परत पाठवणार

केरळमध्ये अडकलेल्या लढाऊ विमानाची अखेर दुरुस्ती झालीच नाही, शेवटी तुकड्यांमध्ये ब्रिटनला

बेदरकार गाडी चालवणाऱ्यांना विमा भरपाई नाही - सर्वोच्च न्यायालय

स्वतःच्या चुकीमुळे झालेल्या अपघातात मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना भरपाई मिळणार नाही नवी दिल्ली : भारताच्या