मुंबई : मुंबईत काल पावसामुळे सगळीकडे पाणी साचले होते. तर आज सोमवार आठवड्याच्या पहिल्याच दिवशी चाकरमान्यांना आपल्या कार्यालयात पोहचण्यासाठी प्रचंड हाल झाले. सकाळी वाशी खाडी पुलावर ट्रेलरचा अपघात झाला आणि इकडे मध्य रेल्वेवर मालगाडीचे इंजिन बंद पडल्याने रस्ते आणि रेल्वे वाहतुकीचा पुरता खोळंबा झाला.
सायन पनवेल महामार्गावर सोमवारी सकाळी साडेसात वाजता दोन ट्रेलरचा अपघात झाला. यामुळे पुण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवर चक्काजाम झाले होते. मानखुर्द पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तर मध्य रेल्वेवर अंबरनाथ बदलापूर स्थानकादरम्यान मालगाडीचे इंजिन बिघडले आहे. त्यामुळे कर्जतहून मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प झाली. यामुळे गेल्या पाऊण तासापासून अप मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
कल्याणहून इंजिन मागविण्यात आले आणि मालगाडी बाजुला करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली. परंतू यास वेळ लागला तसेच काही लोकल रद्द कराव्या लागल्या. मात्र रेल्वे प्लॅटफॉर्मवर कोठेही नेमके कारण काय याची अनाउन्स न झाल्याने प्रवासी संतापले होते. अनेक रेल्वे स्थानकांवर गर्दी उसळली होती. दरम्यान, या बिघाडाचा परिणाम आज दिवसभर राहण्याची शक्यता आहे.
मुंबई: सध्या सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. काश्मीर खोऱ्यातील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांनी…
मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…
अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…
पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…