Mumbaikar : मुंबईकर बेहाल! काल पावसामुळे तर आज दोन अपघातांमुळे कामाला निघालेल्या चाकरमान्यांचे हाल!

  155

तिकडे वाशी पुलावर अपघात तर इकडे मध्य रेल्वेवर पडली मालगाडी बंद


मुंबई : मुंबईत काल पावसामुळे सगळीकडे पाणी साचले होते. तर आज सोमवार आठवड्याच्या पहिल्याच दिवशी चाकरमान्यांना आपल्या कार्यालयात पोहचण्यासाठी प्रचंड हाल झाले. सकाळी वाशी खाडी पुलावर ट्रेलरचा अपघात झाला आणि इकडे मध्य रेल्वेवर मालगाडीचे इंजिन बंद पडल्याने रस्ते आणि रेल्वे वाहतुकीचा पुरता खोळंबा झाला.


सायन पनवेल महामार्गावर सोमवारी सकाळी साडेसात वाजता दोन ट्रेलरचा अपघात झाला. यामुळे पुण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवर चक्काजाम झाले होते. मानखुर्द पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तर मध्य रेल्वेवर अंबरनाथ बदलापूर स्थानकादरम्यान मालगाडीचे इंजिन बिघडले आहे. त्यामुळे कर्जतहून मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प झाली. यामुळे गेल्या पाऊण तासापासून अप मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.



कल्याणहून इंजिन मागविण्यात आले आणि मालगाडी बाजुला करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली. परंतू यास वेळ लागला तसेच काही लोकल रद्द कराव्या लागल्या. मात्र रेल्वे प्लॅटफॉर्मवर कोठेही नेमके कारण काय याची अनाउन्स न झाल्याने प्रवासी संतापले होते. अनेक रेल्वे स्थानकांवर गर्दी उसळली होती. दरम्यान, या बिघाडाचा परिणाम आज दिवसभर राहण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ले

नारायण राणे यांचे धक्कादायक विधान मुंबई : खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन

अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

मुंबई : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी

अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतात महाराष्ट्राची भरारी

सहकारातून प्रथमच पंपस्टोरेज प्रकल्प; १००८ कोटी रुपये गुंतवणूक, २४० मेगावॉट वीजनिर्मिती मुंबई : महाराष्ट्राने

मोठी बातमी! पंढरपूर आषाढी वारीदरम्यान अपघात किंवा मृत्यू झाल्यास सरकार देणार ४ लाखांची मदत

मुंबई : महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा पंढरपूर आषाढी वारी सोहळा सध्या उत्साहात सुरू आहे. अशातच आता