अजूनही खरं तर सुरू न झालेला पण प्रायः उन्हाळ्यानंतर नेमेचि येणारा ऋतू म्हणजे पावसाळा. नुकताच ज्याच्या नावाने आपण आषाढ शुद्ध प्रतिपदा साजरी केली, त्या कवी कालिदासाच्या साहित्य निर्मितीचाही प्रेरक असा हा वर्षा ऋतू. मनात असंख्य भावनांनी माणसालाच नव्हे, तर चराचर सृष्टीला भुरळ पाडणारा ऋतू. या काळात काय खावे, प्यावे, आरोग्य कसे सांभाळावे याविषयी भारतीय वैद्यक शास्त्र काय सांगते, हे आजच्या लेखात जाणून घ्यायचा प्रयत्न करू यात.
ऋतूचर्या याविषयी खरं तर विस्ताराने मागील काही लेखांत आपण पाहिले आहे, तरी इथे लक्षात घ्यायचा महत्त्वाचा विषय म्हणजे, निसर्गाकडून सर्व सृष्टीलाच हळूहळू बल किंवा ताकद मिळायला पावसाळा ऋतूपासून सुरुवात होते. आता हळूहळू उन्हाळा संपून हवेतील गरम, कोरडेपणा हळूहळू कमी होईल. थंडावा, आर्द्रता, गारवा वाढायला लागेल. साधारण श्रावण भाद्रपद हे दोन महिने पावसाळा असेल. इंग्रजी वर्षानुसार या वर्षी जुलै १८ ते १८ ऑक्टोबर एवढा कालावधी पावसाळा अनुभवता येणार आहे. तेव्हा या कालावधीत पुढीलपैकी गोष्टी आचरणात आणण्याचा प्रयत्न केल्यास आरोग्य सांभाळता येऊ शकेल, ते पाहूयात.
पावसाळ्याच्या सुरुवातीला विशेषकरून पचनशक्ती सांभाळायला हवी. त्यामुळे एकूणच पुढे शरद हेमंत ऋतूतील थंडीच्या कालावधीत मिळणारी ताकद दीर्घकाळ आरोग्य टिकवण्यास फायदेशीर ठरू शकते.
leena_rajwade@yahoo.com
मुंबई : उन्हाळ्याचा प्रभाव खुपच वाढत आहे.उन्हाळ्यात बहुतेक लोक शरीर थंड ठेवण्यासाठी दही खातात. पण…
हैदराबाद : दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू (Mahesh Babu) यांना रिअल इस्टेट (Real Estate Groups) गुंतवणूकदारांच्या…
वादळ, हिमनद्या वितळणे, अवकाळी पावसासारख्या वाढल्या आपत्तीच्या घटना ठाणे (प्रशांत सिनकर) : जगभरात २२ एप्रिल…
ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…