राजकारणातील कोकणी बाज...


  • अनघा निकम-मगदूम



राजकारणाला असलेला कोकणी बाज, विरोधकांना कधी चिमटे काढून, तर कधी थेट ‘प्रहार’ करत सन्माननीय केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या मार्गदर्शनाखाली राजकीय वाटचाल करणारे महाराष्ट्राचे झुंजार नेतृत्व म्हणजे कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार सन्माननीय नितेशजी राणे!



राणे साहेब आणि ज्येष्ठ बंधू माजी खासदार निलेशजी राणे यांच्याप्रमाणेच आक्रमक राजकारण करणाऱ्या आ. नितेशजी राणे यांचा महाराष्ट्रातील राजकारणात स्वतंत्र ठसा आहे, स्वतःच्या अभ्यासू वृत्तीमुळे कमी काळातच नितेश राणे हे नाव महाराष्ट्रात दूरवर पोहोचले आहे. उच्चशिक्षित असलेल्या नितेशजी राणे यांनी त्यांच्या आमदारकीच्या पहिल्या टर्ममध्येच त्यांच्या मतदारसंघाचा चेहरा-मोहरा बदलून टाकला आहे. जे वेगळं, जे नवीन ते आपल्या भूमीत असायला हवं, ही इच्छाशक्ती यापूर्वी कोकणवासीयांनी राणे साहेबांमध्ये पाहिली आहे. त्यांच्यामुळेच सिंधुदुर्ग जगाच्या नकाशावर विशेष झळकू लागले. तीच कामाची पद्धत अवलंबत आ. नितेशजी राणे यांनी त्यांच्या मतदारसंघाचा कायापालट केला आहे. जनतेच्या स्थानिक गरजांची विशेष दखल घेत त्यांच्या पूर्ततेसाठी ते कटिबद्ध राहिले आहेत. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्यात आपल्या पक्षाची सत्ता आहे की नाही ही गोळाबेरीज न करता आवश्यक तिथे आक्रमक भूमिका आ. नितेशजी राणे यांनी घेतली आहे. विरोधकांनी त्यावर कितीही टीका केली तरीही सर्वसामान्यांना मात्र हे आक्रमक नेतृत्व आपलं नि आश्वासक वाटतं, हे नक्की.



सामान्यांचे प्रश्न सोडवतानाच समाज एकसंध ठेवणं ही सुद्धा आपली जबाबदारी आहे, याची जाणीव या नेतृत्वाला आहे. समाजात वेगवेगळे मतप्रवाह कधी धर्म, कधी जातीच्या नावाने वावरत असतात. हे प्रवाह जेव्हा समांतर असतात, तेव्हा समाज शांत असतो. पण कोणी कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला, समाज अस्थिर करण्याचा प्रयत्न केला, तर त्याला वेळीच आवर घातला पाहिजे ही भूमिका आ. नितेश राणे यांनी घेतली आहे. महाराष्ट्रातील वाढत्या लव्ह जिहाद प्रकारांना वेळीच नियंत्रणात आणणे गरजेचे आहे. त्यातून अनेक निष्पाप हिंदू युवतींचा बळी जातोय. हे थांबणं गरजेचे आहे, म्हणूनच आ. नितेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यातील अनेक ज्ञात-अज्ञात बहिणींच्या मागे मी खंबीर उभा आहे, अशी ग्वाही ते आपल्या कृतीतून देत असतात. आज आ. नितेश राणे यांनी घेतलेल्या या भूमिकेची समाजाला गरज आहे. हिंदू युवतींना टार्गेट करून जाळ्यात अडकवले जात आहे. त्यांना या चक्रव्युहातून बाहेर काढण्यासाठी आ. नितेशजी राणे यांनी घेतलेली भूमिका सर्वार्थाने महत्त्वाची आहे.
त्यांच्या अशाच आक्रमक भूमिकेमुळे त्यांचे विरोधक अस्वस्थ असतात. अनेकांना स्वतःला सिद्ध करण्यासाठी अनेक वर्षे द्यावी लागतात. पण राणे साहेबांच्या मुशीतून तयार झालेल्या, अस्सल कोकणी बाणा अंगी असलेल्या या आश्वासक नेतृत्वाने अल्पवधीतच आपलं वलय तयार केलं आहे.



त्यांच्या या कार्यकर्तृत्वामुळे भारतीय जनता पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व अन्य नेते, पदाधिकाऱ्यांना त्यांच्याबद्दल एक विश्वास वाटतो आहे. पक्ष आ. नितेश राणे यांच्यावर ज्या जबाबदाऱ्या सोपावत आहे, त्यावरूनच भाजपमधील एक आश्वासक नेतृत्व म्हणून जी नावे पुढे येतात, त्यात आ. नितेश राणे हे नाव आघाडीवर आहे, हे स्पष्ट होतं.



आज आ. नितेशजी राणे यांचा वाढदिवस. या दिवशी महाराष्ट्रभरातून विविध माध्यमातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असेल; परंतु राज्यातील निष्पाप युवतींना लव्ह जिहादसारख्या जाळ्यातून सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल अनेक आई-वडील त्यांना शुभाशीर्वाद देत असतील, यात वाद नाही. विकासाची प्रक्रिया ही केवळ भौतिक पद्धतीने होत नाही, तर सामाजिक विकास होणे आवश्यक असते. लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी निभावताना आ. नितेश राणे यांच्याकडे ती व्यापक दृष्टी आहे. राजकारणात कधी चौकार मारायचा, कधी षटकार आणि कधी चेंडू बॅटने खेळवत विजय मिळवायचा हे अचूक जाणणाऱ्या आ. नितेश राणे यांचा राजकीय प्रवास आश्वासक असणार, हे निश्चित आहे. नितेशजी राणे साहेब आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Comments
Add Comment

पुन्हा चंद्रमाच्या दिशेने

५३ वर्षांनी मानवाने पुन्हा चंद्राच्या दिशेने पाऊल टाकले. यावेळी ‘नासा’ची ‘आर्टेमिस २’ ही मोहीम आहे. या

गॅस टंचाई, पॅरासीटामॉल, खत समस्या ते हेलियम - सामान्य माणसाच्या घरात पोहोचू लागलेले इराण युद्धाचे परिणाम!

विनय जोशी, आयसीआरआर - संघर्ष संशोधन आणि निराकरण संस्था इराणवर अमेरिकन, इस्रायली हल्ले सुरू होऊन आता महिना होत आला.

विदर्भ साहित्य संघाचा नवा अध्याय

वार्तापत्र : विदर्भ विदर्भातील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित अशा विदर्भ साहित्य संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत

राज्याच्या उपराजधानीत नवे विधान भवन

वार्तापत्र : विदर्भ नागपूर येथे नवे विधान भवन उभारण्याच्या कामाला आता गती मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

कामगारांच्या जीवावर उठलेले स्फोटक कारखाने

वार्तापत्र : विदर्भ कळमेश्वर तालुक्यात राउळगाव येथील एसबीएल स्फोटक कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण

राष्ट्र, संस्कार आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी श्री गुरू तेग बहादुर यांची अमर शहादत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘‘जिन्हूं न निंदा दुखी करदी है, न उसतत खुश करदी हैः जो मान-अपमान नूं बराबर समझदा