CM Shinde : दरोडा टाकणा-यांनी चोरीची भाषा करणे योग्य नाही

विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


मुंबई : "दरोडा टाकणा-यांनी चोरीची भाषा करणे योग्य नाही. मुंबई महापालिकेच्या कारभाराबाबत कॅगने ताशेरे ओढले. आता एसआयटीची स्थापना झाल्याने त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. त्यामुळेच मुंबईत मोर्चा काढून जनतेची दिशाभूल करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे," अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.


मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराच्याविरोधात ठाकरे गटाने १ जुलै रोजी आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात विराट मोर्चाचे आयोजन केले आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, गेली १५-२० वर्षे मुंबई महापालिकेवर दरोडा टाकला. मुंबई महापालिकेचे हजारो कोटी कुठे गेले, याचा हिशेब आता कॅग विचारणार आहे. एसआयटीची स्थापना झाल्याने त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे, दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न आहे. दूध का दूध पानी का पानी होईल. उलटा चोर कोतवाल को दांटे असा प्रकार आहे. कॅगच्या ताशेऱ्यांवर एसआयटी लावली आहे, ती निष्पक्षपणे काम करेल, मुंबईकरांचा पैसा मुंबईकरांच्याच तिजोरीत राहायला हवा. तो कोणालाही वळवता येणार नाही. एसआयटीच्या कारवाईत उघडे पडू नये म्हणून स्वत:ची कातडी वाचवण्यासाठी ही धडपड सुरू आहे."


 
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports,Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

सफाईच्या कामांचे ऑडिट करण्यासाठी आयआयटी मुंबईची मदत घेणार

मुंबई: मुंबईतील नालेसफाईच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असून ज्याठिकाणी मिठी नदीच्या कामासाठी नव्याने निविदा

महापालिका शालेय वस्तूंच्या खरेदीसाठी आता जेम पोर्टलवरून निविदा

मुंबई: मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये वितरीत केल्या जाणाऱ्या २७ शालेय वस्तूंची खरेदीची प्रक्रिया रद्द करून

महालक्ष्मी येथे लहान प्राणी, पक्ष्यांच्या मृतदेहांवर अंत्यविधीची सुविधा; लहान पाळीव प्राण्यांचे रुग्णालय लवकरच होणार सुरू

मुंबई: मुंबई महानगरपालिका आणि टाटा ट्रस्ट संचालित लहान प्राण्यांच्या रुग्णालयात लहान प्राणी व पक्ष्यांच्या

दिव्यांगांना शिक्षण, कौशल्य व रोजगाराच्या संधी देत मुख्य प्रवाहात आणण्यावर भर; दिव्यांग कल्याण विभाग आता दिव्यांग सक्षमीकरण विभाग नावाने ओळखला जाणार

मुंबई: राज्यातील दिव्यांग व्यक्तींच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेत

शिधावाटप विभागाच्या धडक कारवाईत वरळीतील गॅस सिलिंडरचा काळाबाजार उघड

मुंबई: वरळी परिसरात घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरचा काळाबाजार करणाऱ्या टोळीवर शिधावाटप विभागाने धडक

राज्यातील अनधिकृत मोबाईल टॉवर्सचे लवकर सर्वेक्षण

मुंबई : केंद्र शासनाचे धोरण आणि राज्याची गरज यांचा मेळ घालून भविष्यात महाराष्ट्राची स्वतंत्र 'टॉवर पॉलिसी' कशी