Ayodhya Ram Mandir : राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेची तारीख जाहीर, राम मंदिर जनतेसाठी कधी खुले होणार?

अयोध्या : अयोध्येतील राम मंदिर (Ram Mandir) जनतेसाठी कधी खुले होणार याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात असतानाच आता अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेची तारीख राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी जाहीर केली आहे. १५ ते २४ जानेवारी २०२४ दरम्यान राम मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.


प्राणप्रतिष्ठेच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण दिले जाणार आहे. प्राणप्रतिष्ठेनंतर राम मंदिराचे दरवाजे सर्व भाविकांसाठी खुले केले जातील, असेही नृपेंद्र मिश्रा म्हणाले.


मिश्रा पुढे म्हणाले की, अयोध्येसाठी हा फार मोठा उत्सव असेल. देशभरातील काही ठिकाणी हा कार्यक्रम व्हर्चुअली दाखवला जाईल. परदेशातील भारतीय दूतावासांमध्ये प्राणप्रतिष्ठा लाईव्ह पाहता यावी, यासाठी तयारी सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.


दरम्यान राम मंदिरातील गाभाऱ्याच्या मुख्य दरवाजावर सोन्याचे कोरीव काम असणार आहे. तसेच मंदिराचा १६१ फुटांच्या कळसालाही सोन्याचे आच्छादन असेल.



मंदिराचा पहिला टप्पा ३० डिसेंबर २०२३ पर्यंत तर ३० डिसेंबर २०२४ पर्यंत दुसरा टप्पा पूर्ण होणार


अयोध्येतील राम मंदिराचा पहिला टप्पा ३० डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती नृपेंद्र मिश्रा यांनी दिली. पहिल्या टप्प्यात तळ मजल्यावरील पाच मांडव पूर्ण करण्यात येण्यार आहेत. यामध्ये एक प्रमुख गर्भगृह असणार ज्यामध्ये भगवान रामाच्या मूर्तीची स्थापना केली जाणार आहे. या पाच मांडवांच्या निर्मितीसाठी जवळपास १६० खांब असणार आहेत. मंदिराच्या सर्वात खालच्या भागात भगवान रामाच्या दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच वीज, पाणी या सारख्या इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही सर्व कामे ३० डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.


मंदिराच्या दुसऱ्या टप्प्याविषयी माहिती देताना नृपेंद्र मिश्रा म्हणाले, मंदिराचा पहिला आणि दुसरा मजला ३० डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण होणार आहे. संपूर्ण मंदिराचे काम कधीपर्यंत पूर्ण होणार या प्रश्नाला उत्तर देताना समिती प्रमुख नृपेंद्र मिश्रा म्हणाले, डिसेंबर २०२५ पर्यंत संपूर्ण मंदिराचे काम पूर्ण होणार आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports,

Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

UP Religious Conversion : ५ वर्षांपासून सुरू असलेला 'लव्ह ट्रॅप'! जिम ट्रेनर तरुणीच्या प्रेमात बिझनेसमनचा मुलगा अडकला; नाव-धर्म दोन्ही बदलले

West Bengal Earthquake : पश्चिम बंगालमध्ये भूकंपाचे धक्के; सिलीगुडी, कूचबिहार हादरले, रिक्टर स्केलवर ५.६ तीव्रतेची नोंद

कोलकाता : पश्चिम बंगाल (West Bengal) मध्ये रविवारी रात्री भूकंपाचे (Earthquake) तीव्र धक्के जाणवले. सिलीगुडी (Siliguri) आणि कूचबिहार (Cooch

Narendra Modi : सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा, मोदींचे आवाहन

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील वाढता संघर्ष, ऊर्जा बाजारातील चढ-उतार आणि जागतिक आर्थिक अनिश्चिततेच्या

NEET-UG 2026 Re-Exam : नीट यूजी २०२६ पुनर्परीक्षेची शहर सूचना स्लिप neet.nta.nic.in वर उपलब्ध

नवी दिल्ली : नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) रविवार २१ जून २०२६ रोजी होणार असलेल्या नीट यूजी २०२६ पुनर्परीक्षेची शहर

CRIME : नवांशहर हादरले! बेपत्ता राधिकाची निर्घृण हत्या; ब्रीफकेसमध्ये मृतदेह भरून जंगलात जाळला

NAWANSHAHR DISTRICT PUNJAB : गेल्या चार-पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या १५ वर्षीय राधिका या दहावीच्या विद्यार्थिनीचा अखेर

Rules For Edible Oil:  खाद्यतेल विक्रीचे नियम बदलणार! केंद्राचा मोठा निर्णय, आता फक्त ९ पॅक साइजमध्येच मिळणार तेल

सर्वसामान्य ग्राहकांची दिशाभूल रोखण्यासाठी आणि बाजारपेठेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी केंद्र सरकारने