Rajavadi hospital : गर्भवती महिलेकडे नव-याचे आधारकार्ड नसल्याने उपचार नाकारले

सामाजिक आणि रुग्णमित्र संस्थांनी व्यक्त केला रोष


घाटकोपर : सरकारी रुग्णालयांचा (Government Hospitals) ओंगळ कारभार अनेकदा समोर आला आहे. कधी कर्मचार्‍यांच्या हलगर्जीपणामुळे तर कधी सुविधा अपुर्‍या पडल्याने रुग्ण दगावल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यातच आता आणखी एका घटनेची भर पडली आहे. गर्भवती महिलेकडे (Pregnant woman) आधारकार्ड (Aadhar card) नसल्याने उपचार नाकारल्याची घटना घाटकोपरमधील सरकारी राजावाडी रुण्यालयात घडली. या घटनेबाबत अनेक अनेक सामाजिक आणि रुग्णमित्र संस्थांनी रोष व्यक्त केला.


ही गर्भवती महिला नालेसफाईचे काम करते. नालेसफाईदरम्यान ती अचानक खड्ड्यात पडल्याने तिला उपचारांकरता राजावाडी रुग्णालयात (Rajavadi Hospital) आणण्यात आले. त्यावेळी तिच्याकडे नवर्‍याचे आधारकार्ड नसल्याने तिला उपचार नाकारण्यात आला व तिला घरी पाठवण्यात आले. यापूर्वी ती शताब्दी रुग्णालयात गेली होती मात्र तिथेही तिला अशीच वागणूक मिळाली. या प्रकरणात आरोग्य जनहक्क समिती धावून आली. निव्वळ आधार कार्ड किंवा तत्सम कागदपत्र नसल्यास गर्भवतीवर उपचार किंवा तपासणीच होत नसल्याच्या तक्रारी समितीने केल्या.


तक्रारींची दखल घेत मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी या घटनेबाबत परिपत्रकाद्वारे स्पष्ट इशारा दिला आहे. आधारकार्ड नसल्याच्या कारणाने गर्भवती महिलेवर उपचार करणे नाकारल्यास आणि तपासाविना परत पाठविल्यास संबंधितावर कडक कारवाई करण्याचे त्यांनी आदेश दिले आहेत.

Comments
Add Comment

MHADA Lottery : म्हाडाच्या दोन हजार ६४० सदनिकांसाठी निघणार सोडत, ७५ हजार १२७ अर्जदारांचे लक्ष

मुंबई : म्हाडा मुंबई (MHADA Mumbai) मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील २,६४० सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत (MHADA

Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय! पुढील ४ दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा; 'या' जिल्ह्यांना ऑरेंज-यलो अलर्ट

मुंबई : महाराष्ट्रात मान्सूनने पुन्हा जोर धरला असून पुढील चार दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कायम

Anil Kakodkar : पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गासाठी अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती

- 'जीएमआरटी' दुर्बिणीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणार; ६० दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश मुंबई :

Sindhu Mahakumbh : सिंधू महाकुंभाच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या संदेशाचा महाराष्ट्रात गौरव; राज्यपालांच्या हस्ते इंद्रेश कुमार आणि पाल्गा रिंपोचे यांचा सन्मान

मुंबई : लडाख येथे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या सिंधू महाकुंभ (Sindhu Mahakumbh) उपक्रमाने राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक

Analog Paneer : पनीरच्या ३२ टक्के नमुन्यांमध्ये भेसळ, 'ॲनालॉग पनीर'मध्ये वनस्पती चरबीचा वापर

मुंबई : राज्यात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) बाजारपेठेतून घेतलेल्या पनीरच्या नमुन्यांपैकी तब्बल ३२ टक्के नमुने

Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांनी घेतला करंजा मत्स्य बंदर प्रकल्पाचा आढावा

- ४ हजार ५०० मेट्रिक टन मत्स्य उत्पादन हाताळण्याची क्षमता; अत्याधुनिक यंत्रणेसह अनुभवी मनुष्यबळाचा वापर