मुंबई : आज शिवसेनेकडून प्रमुख वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर ‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ अशा आशयाची जाहिरातबाजी करण्यात आली. यामुळे शिवसेना-भाजपा युतीत काहीतरी बिनसल्याच्या चर्चा सुरु आहेत. मात्र आज राज्य मंत्रिमंडळाच्या पार पडलेल्या बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंबंधी शिवसैनिकांसोबत स्पष्ट चर्चा केली. ‘युतीत या गोष्टी होत राहतात, त्यामुळे काळजी करण्याचे काही कारण नाही’, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
‘आपण युतीमध्ये आहोत, त्यामुळे या गोष्टी होतच राहतात. काळजी करु नका, एकत्र काम करत राहूयात’, असा सल्ला फडणवीसांनी शिवसैनिकांना दिला. तसेच युतीत खडा पडेल असं कुणीही काहीही बोलू नये, असा कानमंत्र त्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना दिला आहे.
देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांनी गेल्या ११ महिन्यांत सांघिकपणे महाराष्ट्रात जे काम केलं त्याची महाराष्ट्राने नोंद घेतली आहे. सर्वेक्षण झालं याचा अर्थ आमची जबाबदारी वाढली आहे, विजय टिकवणं ही आमची जबाबदारी आहे, असं मत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलं.
आज कोल्हापूर येथे होणा-या ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार होते. मात्र त्यांना कानाचा त्रास सुरु झाल्याने त्यांनी दौरा रद्द केला आहे. सायनसचा त्रास बळावल्याने देवेंद्र फडणवीस यांना दोन दिवस विमान प्रवास न करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे फडणवीस आज कोल्हापूरला जाणार नाहीत, अशी माहिती दीपक केसरकर माध्यमांशी बोलताना दिली. त्यांच्याऐवजी आता चंद्रकांत पाटील कोल्हापूरला रवाना होणार आहेत.
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…