पहिल्याच पावसात एकदरा पुलावर पाणी तुंबले!



  • संतोष रांजणकर




मुरूड : मुरूड एकदरा पुलावर पहिल्याच पावसात पाणी तुंबल्याने पादचाऱ्यांना व वाहन चालकांना जाता येता कसरत करावी लागत आहे. या पुलाच्या डागडुजीबाबत अनेकदा वृत्त प्रसिद्ध झाले आहे. त्याची दखल घेत शासनाने या पुलाच्या दुरुस्तीसाठी ५ कोटींचा निधीही मंजूर केला आहे. परंतू पाऊस पडायला सुरुवात झाली तरीही या पुलाच्या दुरुस्तीला अजून सुरुवात झालेली नाही. या पुलाकडे बांधकाम खात्याचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.


मुरूड एकदरा पुलाची गेले ३० वर्ष बांधकाम खात्याने देखभाल न केल्याने या पुलाची पार दुरावस्था झाली आहे. दर पावसाळ्यापूर्वी या पुलावरील पाणी वाहून जाण्यासाठी असलेल्या मार्गांची स्वच्छता केली जात होती. त्यामुळे पावसाचे पाणी पुलावर तुंबत नव्हते. पण गेल्या ३० वर्षांपासून पाण्याच्या मार्गांची स्वच्छता न केल्याने पुलावर पावसाचे पाणी तुंबत आहे. या तुंबलेल्या पाण्यामुळे पुल कमकुवत होत आहे. ठिक ठिकाणी कॉन्क्रीट ढासळलेले आहे.


या पुलावरुन महावितरण व दुरसंचार विभागाने केबल अंथरलेल्या आहेत. या केबलमुळे या पुलावरील पावसाचे साचलेले पाणी वाहून जाण्यासाठी असलेले मार्ग बंद झाले आहेत. त्यामुळे या पुलावर दरवर्षी पावसाचे पाणी तुंबत आहे. यामुळे दिवसेंदिवस हा पुल कमकुवत होत आहे.


तरी बांधकाम खात्याने लक्ष देऊन या पुलाची दुरुस्ती करावी व या पुलावरील पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी असलेल्या मार्गांची स्वच्छता करावी अशी मागणी केली जात आहे.


दरम्यान, महाड येथिल सावित्री नदीवरील झालेल्या पुलाच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची वाट प्रशासन पहात आहे का, असा संतप्त सवाल वाहन चालकांनी केला आहे.

Comments
Add Comment

ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्मृती मानधनाची विक्रमी शतकी खेळी

चंदीगड : भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मानधना चमकदार कामगिरी करत साऱ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे. आणि

फडणवीस सरकारचा विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय

मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष व तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश

नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या प्रशासकीय इमारतींसाठी लागू झाले हे बंधन

मुंबई : राज्यातील नगरपरिषदा तसेच नगरपंचायतींच्या प्रशासकीय इमारती आता शासनाने तयार केलेल्या नमुना नकाशानुसारच

पर्यटनाला चालना देण्यासाठी या ठिकाणी जॉय मिनी ट्रेन सुरू करणार

मुंबई : राज्यातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पर्यटन उपक्रमांना चालना देण्यासाठी शासन प्रयत्न करत

मुंबईत केली दुर्मिळ वृक्षांची लागवड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ‘मुंबईचे फुफ्फुस’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या

आणखी एका मेट्रो स्थानकाचे नामकरण : ‘अथर्व युनिव्हर्सिटी – वळणई मीठ चौकी’

मुंबई : उत्तर मुंबईतील कांदिवली मालाड दरम्यानच्या वळणई - मीठ चौकी मेट्रो स्थानकाचे औपचारिक नामकरण “अथर्व