हिंमत असेल तर 'या' विषयांवर बोलून दाखवा

नितेश राणेंचे उबाठा सेनेला आव्हान


मुंबई : नांदेड येथे काल झालेल्या भाजपच्या जाहीर सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला बोल केला. याबाबत काही भूमिकाच नसल्याने ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत मात्र गप्प राहिले आहेत. इतर वेळी निरर्थक बडबड करणा-या संजय राऊतांनी हिंमत असेल तर आता बोलून दाखवावं, असं आव्हान भाजप आमदार नितेश राणेंनी आजच्या त्यांच्या पत्रकार परिषदेत दिलं.


हिंदुत्वाशी बेईमानी कोणी केली? कोणाचा राजकीय लव्ह जिहाद झालेला आहे? या अमित शाहांच्या प्रश्नांना उत्तर द्यायची उबाठा सेनेची हिंमतच नाही, असं नितेश राणे म्हणाले. ज्या सुप्रिया सुळेंचं ते कालपासून अभिनंदन करत आहेत, त्यांनीदेखील तिहेरी तलाकचं समर्थन केलं आहे. अमित शाह यांनी काल 'समान नागरी कायदा' आणणार, असे ठणकावून सांगितले, यावर उबाठा सेनेची उत्तर द्यायची हिंमत आहे का? असा सवाल नितेश राणेंनी उपस्थित केला. हिंमत असेल तर या सगळ्या विषयांवर संजय राऊतांनी बोलून दाखवावं, असं आव्हान नितेश राणेंनी दिलं.



राम मंदिराचं समर्थन करुन दाखवा

अमित शाहांनी काल अयोध्येमध्ये बनणार्‍या भव्य राम मंदिराचा उल्लेख केला. मग महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना, जितेंद्र आव्हाड, अब्बु आझमी, हसन मुश्रीफ यांना घेऊन राम मंदिराला समर्थन करायची तुमची हिंमत आहे का? असं नितेश राणे म्हणाले.



उद्धव ठाकरे खोके पुरवणा-यांचेच शब्द पाळतात

बाळासाहेब ठाकरेंचा शब्द बंदुकीच्या गोळीसारखा होता, एकदा निघाला की परत मागे जात नसे आणि त्यांच्या शब्दाला किंमत होती. मात्र उद्धव ठाकरेंनी त्यांच्या उभ्या आयुष्यात कोणालाही दिलेला शब्द पाळला नाही. उद्धव ठाकरे केवळ पाटणकर, सरदेसाई आणि त्यांच्या घरी खोके पोहोचवणारे लोक, वसुली करणारे लोक यांचेच शब्द पाळतात, असा आरोप नितेश राणेंनी केला.



संजय राऊतांचा शिवसेनेशी काहीही संबंध नाही

संजय राऊतांचा शिवसेनेच्या जडणघडणीशी काहीही संबंध नाही. शिवसेनेचा वाघ कोणी रेखाटला आहे, हेही साधं संजय राऊतांना माहित नाही. शिवसेनेला जे लोकसभेमध्ये बसून शिव्या द्यायचे, त्यांनी आम्हांला जुन्या शिवसेनेचे दाखले देऊ नयेत, असं नितेश राणे म्हणाले.



राष्ट्रवादीचा उमेदवार उभा करणार का?

संजय राऊत कालपासून भाजपच्या कल्याण-डोंबिवली मतदारसंघाबाबत फार बडबड करत आहेत. त्यांनी एक सांगावं की, २०२४ वरळी विधानसभेचा उमेदवार राष्ट्रवादीचा असणार का? वरळी विधानसभेची जागा राष्ट्रवादीचे सचिन अहिर सातत्याने जिंकत होते. त्यांना शिवसेनेने पक्षात समाविष्ट करुन घेतलं. आता त्या जागेवर आदित्य ठाकरे आमदार आहेत. मूळ जागा राष्ट्रवादीची असल्याने त्यांनी ती २०२४ च्या निवडणुकीसाठी मागितली आहे. उद्धव ठाकरे स्वतःच्या मुलाची जागा देऊ शकत नाहीत, मग संजय राऊत कल्याण-डोंबिवलीबद्दल कुठल्या तोंडाने बोलतायत? असं नितेश राणे म्हणाले.

Comments
Add Comment

BMC : धारावी, काळा किल्ला बेस्ट बस आगाराची जागा धारावी विकास प्रकल्पासाठीसाठी हस्तांतरीत

महापालिका सभागृहात बहुमताने प्रस्ताव मंजूर मुंबई : धारावी (Dharavi) बस डेपोची जागा पीपीपी तत्त्वावर धारावी विकास

BMC News : तातडीच्या कामकाजाच्या प्रस्तावावरून सलग दुसऱ्यांदा महापौरांकडून चूक

सत्ताधारी पक्ष दुसऱ्यांदा आला अडचणीत घाटकोपरमधील रस्ता रेषेसंदर्भातील प्रस्ताव मंजूर करण्याची महापौरांना

Chembur Tree Collapse : चेंबूरच्या झाड दुर्घटनेच्या अहवाल सत्ताधाऱ्यांनाच अमान्य

अहवालाची फेर चौकशी करून अहवाल सादर करण्याचे महापौरांचे निर्देश सभागृहनेत्यांनी अहवालाची प्रतच सभागृहात फाडत

FDA : मुंबईच्या प्रसिद्ध पारशी डेअरी फार्मवर अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; परवाना निलंबित

मुंबई : राज्यभर सुरू असलेल्या 'सेफ फूड, सेफ महाराष्ट्र' (Safe Food, Safe Maharashtra) या विशेष मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने (FDA)

NEET-UG 2026 Result : नीट-यूजी परीक्षेचा निकाल जाहीर; परीक्षेत मुलींनी मारली बाजी

मुंबई : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (National Testing Agency - NTA) ने नीट-यूजी (NEET-UG) २०२६ परीक्षेचा निकाल (Result) जाहीर केला आहे. उत्तरतालिका (Answer

MahaCare : महाकेअरच्या माध्यमातून राज्यात जागतिक दर्जाच्या कर्करोग उपचार सुविधा; नागपुरात हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रॉन प्रकल्पाला मंजुरी

मुंबई : राज्यातील कर्करोग रुग्णांना जागतिक दर्जाचे उपचार आणि संशोधन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र