देहू: आषाढीवारीसाठी देहूनगरी सज्ज झाली असून आज तुकोबांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. हा प्रस्थान सोहळा याची देही याची डोळा पहाण्यासाठी हजारो वारकरी देहूनगरीत जमले असून टाळ मृदंगाच्या गजराने अवघी देहूनगरी दुमदुमली आहे. विठू नामाचा जयघोष करत आज संत तुकाराम महाराजांची पालखी विठ्ठलाच्या भेटीला निघणार आहे.
पंढरीच्या भेटीची आस लागून असणाऱ्या आषाढीवारीला आजपासून सुरुवात होत आहे. यंदा पालखी सोहळ्याचे ३३८ वे वर्ष आहे. या पार्श्वभूमीवर देहुत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आज सकाळी पहाटे ५ वाजता ‘श्री’ची, संत तुकाराम शिळा मंदिर, श्री विठ्ठल-रखुमाई यांची महापूजा करण्यात आली. त्यानंतर पहाटे ५.३० वाजता तपोनिधी नारायण महाराज समाधी महापूजा करण्यात आली.
९ ते १० दरम्यान, इनामदार वाडा येथे श्री संत तुकाराम महाराज पादुका पूजन झाल्यानंतर सकाळी १० ते १२ वाजता पालखी प्रस्थान सोहळा आणि काला कीर्तनाला सुरुवात होणार आहे.
दुपारी २ वाजता पालखी प्रस्थान सोहळा सुरू होणार असून यावेळी अश्व व दिंड्यांचे देउळवाड्यात आगमन होणार आहे. दरम्यान, विविध धार्मिक कार्यक्रम यावेळी आयोजित करण्यात आले आहेत.
सायंकाळी ५ वाजता पालखी प्रदक्षिणा होऊन सायंकाळी ६.३० वाजता पालखी सोहळा मुक्काम हा इनामदार वाडा येथे होणार आहे. यानंतर मुख्य आरती होणार असून रात्री ९ वाजता कीर्तन, जागर असे कार्यक्रम होणार आहे. सोमवारी या पालखीचे पुण्यात आगमन होणार आहे.
सेवाव्रती: शिबानी जोशी ईशान्य भारतातील सात राज्ये निसर्ग संपन्नतेने नटलेली राज्य; परंतु सीमारेषा जवळ असल्यामुळे…
मुंबई : आधीच महागाईने बेजार झालेल्या सर्वसामान्य मुंबईकरांना आणखीन महागाईचा फटका बसण्याची शक्यता आहे. सीएनजी…
मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने आयसीसी टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर या फॉरमॅटला अलविदा म्हटले…
महाराष्ट्रातील १० कॉलेजचा त्यात समावेश मुंबई : वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी परदेशामध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची वाढती संख्या…
वॉशिंग्टन : अमेरिकेत आर्थिक मंदीचा फटका बसला आहे. वाढती बेरोजगारी आणि आयटीतील एआयचा वाढता यामुळे…
मुंबई: केसगळती(hair fall) ही सध्याची मोठी समस्या बनली आहे. थोडेफार केस गळणे ही सामान्य बाब…