महाराष्ट्रात पाऊस कधी पडणार?

'बिपरजॉय' चक्रीवादळाने उडवली हवामान विभागाच्या अधिका-यांची झोप!


पुणे : केरळमध्ये दाखल झालेला मान्सून आता महाराष्ट्रात कधी दाखल होणार याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. केरळमध्ये पाऊस पोहोचला असला तरी मुंबईसह राज्यातील काही भागांत अजूनही उन्हाचा फटका बसत आहे. मान्सून साधारणपणे १ जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होतो आणि १० जूनपर्यंत महाराष्ट्रात दाखल होतो. पण, आता केरळमध्ये पाऊस उशिरा आल्याने राज्यातील पाऊसही लांबला आहे. त्यातच 'बिपरजॉय' चक्रीवादळ येत्या ४८ तासांत आणखी तीव्र होण्याचा अंदाज असल्याने या चक्रीवादळाने हवामान विभागाच्या अधिका-यांची झोप उडवली आहे.


प्रादेशिक हवामान केंद्राचे मुंबई प्रमुख एस. जी. कांबळे यांनी सांगितले की, "महाराष्ट्रात १० जून आणि मुंबईत ११ जून ही मान्सून सुरू होण्याची सामान्य तारीख आहे. मान्सून केरळमध्ये उशीराने पोहोचला आहे. त्यातच 'बिपरजॉय' चक्रीवादळ घोंगावते आहे. यामुळे हे चक्रीवादळ आणि मान्सूनच्या प्रगतीवर बारीक लक्ष ठेवले जात आहे. येत्या दोन-तीन दिवसांत महाराष्ट्रात मान्सूनच्या सुरुवातीबाबत माहिती मिळेल."


साधारणपणे १ जनपर्यंत केरळमध्ये दाखल होणाऱ्या पाऊस ८ जूनला केरळमध्ये पोहोचला. या पार्श्वभूमीवर १८ जूनपर्यंत महाराष्ट्रात पाऊस येण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. यामध्ये दोन ते तीन दिवसांचा फरक जाणवू शकतो.


स्कायमेट वेदरनुसार, पुढील तीन ते चार दिवस खूप तीव्र चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

विहिरीतील मोटार काढताना काळाचा घाला; धाराशिवमध्ये बाप-लेकासह चौघांचा दुर्दैवी मृत्यू

धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील केशेगाव येथे घडलेल्या एका भीषण अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र

‘या’ उमेदवारांना मत देणार नाही; नाशिकमधील गावकऱ्यांचा ठाम निर्णय

नाशिक : नाशिक महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंबड गावातील ग्रामस्थांची

Tragedy at Nagpur Bachelor Party : मैत्री की क्रूरता? पार्टीत अडथळा नको म्हणून बेशुद्ध मित्राला चादरीत गुंडाळून फेकून दिलं; बॅचलर पार्टीचा 'सैतानी' चेहरा समोर

नागपूर : नागपूर जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या मित्राच्या

आंदेकर कुटुंबिय उतरलं आगामी निवडणुकीच्या रिंगणात! कडक पोलीस बंदोबस्तात केला उमेदवारी अर्ज दाखल

पुणे: यावर्षीच्या गणपतीमध्ये झालेल्या आयुष कोमकर खून प्रकरणात आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर न्यायालयीन

आधी मतांसाठी सोनं वाटलं, पराभवानंतर धमकी देत.... अन त्र्यंबकेश्वरमध्ये खळबळ

नाशिक : निवडणुकीपूर्वी ‘कुबेर’ बनून मतदारांवर सोन्याची बरसात करणारा उमेदवार, पराभवानंतर मात्र मतदारांच्या

कोरेगाव भीमा विजयी दिनानिमित्त पुण्यात वाहतुकीत बदल; कोणते पर्यायी मार्ग वापरावेत?

पुणे: कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी दरवर्षी १ जानेवारीला लाखो अनुयायी पुण्यात येत असतात.