पुणे : केरळमध्ये दाखल झालेला मान्सून आता महाराष्ट्रात कधी दाखल होणार याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. केरळमध्ये पाऊस पोहोचला असला तरी मुंबईसह राज्यातील काही भागांत अजूनही उन्हाचा फटका बसत आहे. मान्सून साधारणपणे १ जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होतो आणि १० जूनपर्यंत महाराष्ट्रात दाखल होतो. पण, आता केरळमध्ये पाऊस उशिरा आल्याने राज्यातील पाऊसही लांबला आहे. त्यातच ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ येत्या ४८ तासांत आणखी तीव्र होण्याचा अंदाज असल्याने या चक्रीवादळाने हवामान विभागाच्या अधिका-यांची झोप उडवली आहे.
प्रादेशिक हवामान केंद्राचे मुंबई प्रमुख एस. जी. कांबळे यांनी सांगितले की, “महाराष्ट्रात १० जून आणि मुंबईत ११ जून ही मान्सून सुरू होण्याची सामान्य तारीख आहे. मान्सून केरळमध्ये उशीराने पोहोचला आहे. त्यातच ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ घोंगावते आहे. यामुळे हे चक्रीवादळ आणि मान्सूनच्या प्रगतीवर बारीक लक्ष ठेवले जात आहे. येत्या दोन-तीन दिवसांत महाराष्ट्रात मान्सूनच्या सुरुवातीबाबत माहिती मिळेल.”
साधारणपणे १ जनपर्यंत केरळमध्ये दाखल होणाऱ्या पाऊस ८ जूनला केरळमध्ये पोहोचला. या पार्श्वभूमीवर १८ जूनपर्यंत महाराष्ट्रात पाऊस येण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. यामध्ये दोन ते तीन दिवसांचा फरक जाणवू शकतो.
स्कायमेट वेदरनुसार, पुढील तीन ते चार दिवस खूप तीव्र चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे.
१२ फेब्रुवारीला लग्न झालेल्या शुभमला पत्नीसमोर संपवलं दहशतवाद्यांनी सांगितलं पत्नीला का नाही मारलं? नवी दिल्ली…
देहराडून : चारधाम यात्रा (Chardham Yatra 2025) येत्या ३० एप्रिल २०२५ पासून सुरू होणार आहे.…
मुंबई : पहेलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू झाला. यात तीन डोंबिवलीकर,…
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यामागे पाकिस्तान पुरस्कृत लष्कर - ए - तोयबा…
नवी दिल्ली: या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर फक्त अॅक्शन बघायला मिळणार आहे. अनेक नवीन चित्रपट आणि…
बारामुला : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी पर्यटकांना लक्ष्य करुन गोळीबार केला. या हल्ल्यात २६…