अरबी समुद्रातील ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीला धोका नाही, पण मान्सून लांबणीवर

Share

मच्छीमारांसाठी समुद्रात जाणे धोकादायक

रत्नागिरी : अरबी समुद्रात तयार होत असलेले ‘बिपरजॉय’ चक्री वादळ पश्चिम किनारपट्टीपासून खोल समुद्रात सुमारे एक हजार किलोमीटर दूर असल्याचे हवामान खात्याच्या सूत्रांकडून आणि अभ्यासकांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे या चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीवर फारसा परिणाम जाणवणार नाही. तसेच त्यामुळे येणाऱ्या पावसाचीही शक्यता नाही. त्यामुळे चक्री वादळाबाबत घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही.

पश्चिम दिशेने येणारे हे संभाव्य चक्रीवादळ ईशान्येला पाकिस्तानात धडकू शकेल अशी माहिती हवामान अभासकांनी दिली आहे. मात्र या काळात मच्छीमारांनी समुद्रात जाणे धोकादायक ठरू शकते. फयान चक्री वादळामुळे रत्नागिरीतील मच्छीमारांना याची निश्चित जाणीव आहे. मात्र या चक्रीवादळामुळे नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन लांबणीवर जाणार असून त्यामुळे समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.

हे चक्रीवादळ सध्या गोव्याच्या पश्चिम नैऋत्य किनाऱ्यापासून ९२० किमी अंतरावर आहे. तर, मुंबईच्या दक्षिण-नैऋत्यपासून ११२० किमी अंतरावर आहे. पोरबंदरच्या दक्षिण भागापासून ११६० किमी, तर पाकिस्तानातील दक्षिण कराचीपासून १५२० किमी अंतरावर आहे. त्यामुळे हे चक्रीवादळ सागरी क्षेत्रातच असून त्याची कोकण किंवा महाराष्ट्र राज्याच्या किनारपट्टी भागाला झळ बसण्याची कोणतीही शक्यता नसल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मात्र या चक्री वादळामुळे मान्सून साठी निर्माण झालेली अनुकूलता खंडित होणार असून मान्सून लांबणीवर जाण्याची भीती आहे. आधीच पाण्याची टंचाई स्थिती गंभीर असताना मान्सूनचे आगमन उशिराने झाल्यास पाणी टंचाईचे स्वरूप अधिक गंभीर होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

Recent Posts

Indus Waters Treaty : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने स्थगिती दिलेला सिंधू पाणी करार काय आहे?

सिंधू नदीला पाकिस्तानची लाईफलाईन समजले जाते. अरबी समुद्राला जाऊन मिळणारी सिंधू नदी पाकिस्तानातील अनेक राज्यांमधून…

14 minutes ago

Summer Tree : उन्हाळ्यात घरातील बाग किंवा कुंड्यांना असं ठेवा ताजंतवानं!

उन्हाळ्यात थंडावा देण्यासाठी आपल्या घरातली बाग किंवा कुंड्यांमधली झाडं मदत करतात. पण या उन्हाच्या झळा…

26 minutes ago

भारताचा डिप्लोमॅटिक स्ट्राईक, पाकिस्तानच्या चिंतेत वाढ

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी गोळीबार करुन २६ पर्यटकांना ठार…

29 minutes ago

हीच योग्य वेळ, आता भारताने पाकिस्तानच्या नरडीचा घोट घेतला पाहिजे; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्याचे ठाम मत

नवी दिल्ली/वॉशिंग्टन : पहलगाममधील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही संताप उसळला आहे.…

29 minutes ago

Diabetes Care : उन्हाळ्यात मधुमेहींनी आहाराची अशी काळजी घ्या….

उन्हाळा आला की आपल्याला आहारात बदल करावा लागतो. त्यात मधुमेहींना आणखी बंधनं असतात. कारण, रक्तातली…

37 minutes ago

Indus Waters Treaty : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने स्थगिती दिलेला सिंधू पाणी करार काय आहे?

सिंधू नदीला पाकिस्तानची लाईफलाईन समजले जाते. अरबी समुद्राला जाऊन मिळणारी सिंधू नदी पाकिस्तानातील अनेक राज्यांमधून…

48 minutes ago