आधी स्वतःची लायकी ओळखा मग नैतिकतेचे धडे द्या : नितेश राणे

नितेश राणेंनी ठाकरे गटाच्या गैरवर्तनांचा वाचला पाढा


मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत नेहमीच अजबगजब विधाने करत असतात. त्यातच आता ओडिशा रेल्वे अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. यावर भाजप आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे गटाच्या गैरवर्तनांचा पाढाच वाचला आणि संजय राऊतांचे वाभाडे काढले.


रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा द्यावा या ठाकरे गटाच्या मागणीवर नितेश राणेंनी जोरदार टीका केली. आज रेल्वे पुन्हा सुरु होईपर्यंत वैष्णवजींनी अपघातस्थळावरुन काढता पाय घेतला नाही, रेल्वेमंत्र्याचं काम कसं असावं याबाबत विद्यमान रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा आदर्श समोर ठेवावा. तरीही ठाकरे गटाकडून रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी केली जाते. नैतिकता आणि पश्चात्तापाची भाषा केली जाते. मात्र उद्धव ठाकरे ज्या कोविड काळात मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्या निष्काळजीपणामुळे अनेकांना जीव गमवावा लागला, त्याचा पश्चात्ताप उद्धव ठाकरेंना झाला होता का?


केंद्र सरकारला नावं ठेवणार्‍या ठाकरे गटाचा सामना वृत्तपत्राचा ५० लाखांचा व्यवसाय हा केंद्र सरकारच्या जाहिरातींमधूनच चालतो, असा आरोप नितेश राणेंनी केला आहे. ज्यांच्या जीवावर ठाकरे गट जगतो आहे अशा केंद्र सरकारला नावं ठेवण्याची त्यांची हिंमत कशी होते, असा सवाल नितेश राणेंनी उपस्थित केला.


मुख्यमंत्रीकाळात पेंग्विन उद्धव ठाकरे यावर्षी मुंबई तुंबणार नाही अशी आश्वासनं द्यायचे. मात्र त्यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या मुंबई महापालिकेच्या बेजबाबदारपणामुळे एकही पावसाळा असा गेला नाही की मुंबई तुंबण्याचा प्रकार घडला नाही. उद्धव ठाकरे लंडनला उपचारांसाठी गेले त्याचाही खर्च कोविड काळात केलेल्या भ्रष्टाचारातूनच झाला. उद्धव ठाकरेंकडे आर्थिक उत्पन्नाचे स्रोत नसल्याने हा पैसा भ्रष्टाचारातूनच जमा केला आहे, असं नितेश राणे यावेळी म्हणाले.


संजय राऊत आपल्या मालकाच्या या सर्व गोष्टींकडे लक्ष न देता नैतिकतेचे धडे देत आहेत, मग त्यांच्या मालकाने नैतिकता जपत साध्या विधानसभेच्या आमदारकीचा राजीनामा का नाही दिला? संजय राऊत म्हणतात की खरी शिवसेना दिल्लीसमोर कधी झुकत नाही मग उद्धव ठाकरे इतक्यांदा जनपथवर तमाशे करायला का गेले होते? सीबीआय चौकशीवर बोलताय मग श्रीधर पाटणकरांवर असलेल्या चौकशीचं काय झालं? त्यामुळे उगाच इतरांवर आरोप करण्यापेक्षा तुमच्या मालकाने अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना काय दिवे लावले यावर कधीतरी भाष्य करा आणि नैतिकतेचे धडे द्या, असा खोचक सल्ला नितेश राणेंनी संजय राऊतांना दिला.


राऊत आणि ठाकरे जी शिवसेना चालवतायत ते चायनीज मॉडेल आहे आणि कधीही बंद पडेल. त्यांच्या जागांची संख्या घसरुन आता केवळ २२ वर आली आहे आणि पुढच्या काही दिवसांत ती २ वर येईल. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आधी स्वतःची लायकी ओळखा मग दुसर्‍यांवर आरोप करा, अशा शब्दांत नितेश राणेंनी संजय राऊतांची चांगलीच जिरवली आहे.

Comments
Add Comment

मुंबईत महायुतीला बहुमत मिळाल्याबद्दल केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून केले अभिनंदन

राज्यभरातील २९ महानगरपालिकांमध्ये महायुतीच अव्वल मुंबई : अत्यंत प्रतिष्ठेची निवडणुक ठरलेल्या मुंबई

Raj Thackeray : भावाशी युती करूनही राज ठाकरेंच्या खात्यात २२ शून्य, मुंबईत 'मनसे'ला जबरदस्त धक्का; ठाकरे ब्रँड फेल!

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेसाठी २० वर्षांचा वनवास संपवून एकत्र आलेल्या 'ठाकरे बंधूं'साठी आजचा निकाल

तेजिंदर सतनाम सिंग तिवाना यांचा प्रचंड मतांनी दणदणीत विजय

वार्ड ४७ मध्ये तरुणाईचा विजयघोष मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत वार्ड क्रमांक ४७ मधून भारतीय जनता पक्षाचे

Chandrashekhar Bawankule : महाराष्ट्रानं विकासालाच कौल दिला!" भाजपच्या मुसंडीनंतर बावनकुळेंनी मानले मतदारांचे आभार

मुंबई : राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांचे कल स्पष्ट होऊ लागले असून, भाजपने महायुतीसह मुसंडी मारली

BMC Election Result 2026 : मुंबईत 'महायुती'चा झंझावात! भाजप-शिंदे गटाने गाठलं 'शतक'; महापालिकेत सत्तांतराचे स्पष्ट संकेत

मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आज मोठा उलटफेर पाहायला

Mumbai BMC Election Results 2026 LIVE Counting : मतमोजणीच्या अडीच तासांनंतर 'हे' उमेदवार ठरले विजयी; पाहा विजयी उमेदवारांची पहिली यादी

वॉर्ड २ – तेजस्वी घोसाळकर (भाजप) वॉर्ड १९ – प्रकाश तवडे (भाजप) वॉर्ड २० – दीपक तवडे (भाजप) वॉर्ड 36 – सिद्धार्थ