तेजस्वी प्रकाशच्या ‘नागिन ६’ मध्ये ट्विस्ट

ऐकलंत का! : दीपक परब



छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘नागिन ६’ मध्ये अभिनेत्री तेजस्वी प्रकाश ही प्रमुख भूमिका साकारत आहे. ‘नागिन ६’मध्ये लवकरच एक ट्विस्ट येणार आहे. या मालिकेमध्ये प्रसिद्ध अभिनेत्याची एन्ट्री होणार आहे. या मालिकेत अभिनेता वत्सल सेठ याची एन्ट्री होणार आहे. विशेष म्हणजे तेजस्वीसोबत वत्सल सेठ मुख्य भूमिकेत दिसणार आहे. वत्सलने तीन वर्षांसाठी मालिकांमधून ब्रेक घेतला होता. त्याने ‘ये रिश्ते हैं प्यार के’ या मालिकेमध्ये निशांत माहेश्वरी ही भूमिका साकारली होती. त्याने ‘एक हसीना थी’, ‘हासील’ आणि ‘रिश्तो का सौदागर-बाजीगर’ यांसारख्या शोमध्ये प्रमुख भूमिका साकारली. ‘नागिन ६’ व्यतिरिक्त वत्सल सेठ आगामी शो ‘तितली’मध्येही दिसणार आहे. वत्सल हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. वत्सल आणि त्याची पत्नी इशिता यांच्या आयुष्यात लवकरच एका चिमुकल्या पाहुण्याची एन्ट्री होणार आहे. काही दिवसांपूर्वी वत्सलने त्याच्या पत्नीसाठी ग्रँड बेबी शॉवरचे आयोजन केले होते. वत्सल आणि इशिताचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र या कार्यक्रमात सहभागी झाले होते. इशिता दत्ता आणि वत्सल सेठ यांनी काही काळ डेट केल्यानंतर २०१७ मध्ये लग्न केले. ‘रिश्तों का सौदागर-बाजीगर’ या टीव्ही शोमध्ये काम करताना इशिता आणि वत्सल यांची ओळख झाली होती.



‘नागिन’ या मालिकेच्या पाचव्या सीझनला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता वत्सल सेठची या मालिकेत एन्ट्री होणार असल्याने प्रेक्षक या मालिकेच्या आगामी एपिसोडची उत्सुकतेने वाट बघत आहेत. नागिन-६ या मालिकेतील तेजस्वी प्रकाशच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. तेजस्वीला बिग बॉस-१५ या शोमुळे विशेष लोकप्रियता मिळाली आहे.

Comments
Add Comment

ध्येयप्रती निष्ठावान राहा

मनस्विनी : पूर्णिमा शिंदे स्वतःला पूर्णपणे स्वीकारा. आपल्या परिस्थितीकडे तुम्ही कसे पाहता? ती दूरदृष्टी, ते

वेळेचे महत्त्व

जीवनगंध : पूनम राणे शारदा विद्यालयात रेहान नावाचा विद्यार्थी शिकत होता. तो इयत्ता दहावीला होता. अत्यंत नम्र,

कोकणचा शिमगा... काळजातली ओढ

संस्कृती : विभा मसुरकर  कोंकणात होळीला शिमगा म्हणतात. फाल्गुन पंचमीपासून अनेक ठिकाणी या उत्सवाला सुरुवात

प्रतिभावंत संगीतकार पुत्रामुळे संगीतकार पित्याला नवी ओळख...

स्मृतिपटल : अनिल रा. तोरणे प्रत्येक पित्याप्रमाणे सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक सचिन देव बर्मन यांनाही वाटत असे की,

जंगलांच्या सहनशक्तीची कसोटी

पर्यावरण : मिलिंद बेंडाळे हवामान बदल हा केवळ तापमानवाढीचा प्रश्न नाही, तर ती परिसंस्थांच्या सहनशक्तीची कसोटी

एकादशीचे व्रत भद्रशील उपाख्यान

महाभारतातील मोतीकण; भालचंद्र ठोंबरे हिंदू धर्मात अनेक व्रत वैकल्ये आहेत. प्रत्येक व्रत वैकल्याचे आपआपले