नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठे भगदाड! संपूर्ण नगरपंचायतच शिवसेनेत विलीन

  106

नाशिक: उद्धव ठाकरे गटाला नाशिकमध्ये जबरदस्त धक्का बसला आहे. संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप करत नाशिकमधील संपूर्ण नगरपंचायतीनेच शिवसेनेत प्रवेश केला आहे. संजय राऊत यांच्या वाचाळ वृत्तीस कंटाळून आम्ही ठाकरे गट सोडण्याचा निर्णय घेतल्याचे या नगरसेवकांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वर्षा या शासकीय निवासस्थानी नाशिकमधील या सहा महत्वाच्या नेत्यांचा आणि त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश पार पडला.


नाशिकमधील सुरगणा नगरपंचायतीतील विद्यमान नगराध्यक्ष भारत वाघमारे, गटनेता सचिन आहेर, नगरसेविका पुष्पा वाघमारे, नगरसेविका अरुणा वाघमारे, नगरसेविका प्रमिला वाघमारे, नगरसेवक भगवान आहेर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही धनुष्यबाण हाती घेतला. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये या सर्व नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश देत भाऊ चौधरी यांनी ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे.


त्याचबरोबर नवी मुंबईचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमदार शशिकांत शिंदे यांचे भाऊ, माथाडी कामगार नेते ऋषिकांत शिंदे यांच्यासोबत अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. त्यामुळे जावळीत शिवसेनेची ताकद वाढणार आहे. त्याबरोबरच हा राष्ट्रवादीलादेखील मोठा धक्का मानला जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजेंना मोठे बळ मिळण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर १६ जुलैला होणार सुनावणी

नवी दिल्ली : शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने सर्वोच्च न्यायालयात पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबत सुरू

विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या आड लपून राजकारण करु नये

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केव्हाही चर्चा करण्याची राज्य सरकारची तयारी - उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबई : शेतकरी

चंद्रपूरातील नाल्याच्या संरक्षण भिंतीचे प्रकरण विधानसभेत गाजले!

मुंबई: चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात हवेली गार्डन ते आकाशवाणी रोडवरील नाल्याच्या संरक्षण भिंतीच्या

कोल्हापूरचे माजी जिल्हाधिकारी दरवर्षी करतात सहा हजाराहून अधिक वारकऱ्यांची सेवा

वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलसेवा, विठ्ठल मळ्यात जपलीय परंपरा..! १६ वर्षांची परंपरा; ४० दिंड्यांतील सहा हजार

Prasad Tamdar Baba : अंग चोळून अंघोळ अन् शरीरसंबंध; भोंदूबाबा प्रसादचे हायटेक कारनामे उघड

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील भोंदूबाबाच्या कारनाम्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. मोबाईलच्या

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

मुंबई : जलसंधारण विभागाला नव्याने ८,७६७ पदांचा आकृतीबंध तयार करून तो वित्त विभागाकडे सादर करण्यात आला होता. या