बलासोर: ओडिशाच्या बालासोरमध्ये झालेल्या रेल्वे अपघातात २८८ नव्हे तर २७५ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले आहे. ओडिशाचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांनी सांगितले की, काही मृतदेहांची दोनदा मोजणी करण्यात आली होती. अपघातात १ हजार ७५ जण जखमी झाले असून, त्यापैकी ७९३ जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या अपघाताचे कारण सांगितले. ते म्हणाले, इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमध्ये बदल झाल्यामुळे हा अपघात झाला. यासाठी जबाबदार असलेल्या व्यक्तींची ओळख पटली आहे. तसेच रेल्वे बोर्डाच्या ऑपरेशन व बिझनेस डेव्हलपमेंट सदस्या जया वर्मा यांनी सांगितले की, सिग्नलमध्ये समस्या होती. कोरोमंडल एक्सप्रेसचा अपघात झाला, तेव्हा तिचा वेग ताशी १२८ किमी एवढा होता.
या धडकेनंतर मालगाडी रुळावरून घसरली नाही. कारण मालगाडीत लोखंड भरलेले होते. याचा कोरोमंडल एक्सप्रेसला सर्वाधिक फटका बसला. त्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला. जया वर्मा पुढे म्हणाल्या, रात्री ८ वाजेपर्यंत दोन्ही लाइन्स ठीक होतील. त्यावर हळूवारपणे रेल्वे धावतील.
ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…