तुकाराम मुंढेंची महिन्याभरात बदली, आता 'हा' पदभार

  154

मुंबई : महाराष्ट्रातील धडाकेबाज प्रशासकीय अधिकारी अशी ओळख असणाऱ्या तुकाराम मुंढे यांची महिन्याभरातच बदली करण्यात आली आहे. मुंबईत मंत्रालयातील मराठी भाषा विभागाचे सचिव म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे. याशिवाय सुधाकर शिंदे यांना मुंबईचे अतिरिक्त महापालिका आयुक्त म्हणून कार्यभार सोपवण्यात आला आहे. मुंढेंसह २० आयएएस अधिकाऱ्यांच्या बदलींचे आदेश काढण्यात आले आहेत.


तुकाराम मुंढे यांना जेमतेम महिन्याभरापूर्वीच कृषी व पशुसंवर्धन खात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. खरं तर त्यापूर्वीच्या बदलीनंतर अनेक महिने मुंढेंना नियुक्ती मिळाली नव्हती. मात्र राज्य शासनाने तीन मे रोजी दहा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले होते, त्यात तुकाराम मुंढेंच्या नावाचाही समावेश होता. त्यामुळे मुंढेंचा अनेक महिन्यांचा वनवास संपल्याचीही चर्चा होती. त्यातच आता पुन्हा मुंढेंच्या बदलीचे आदेश निघाले आहेत. दरम्यान, मुंढे यांची गेल्या १६ वर्षांत तब्बल २० वेळा बदली झाली आहे.



कोणकोणत्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची बदली?


१. सुजाता सौनिक (१९८७) - गृह विभागात अतिरिक्त मुख्य सचिवपदी


२. एस वी आर श्रीनिवास (१९९१) विशेष कर्तव्य अधिकारी (OSD), धारावी पुनर्विकास प्रकल्प, मुंबई


३. लोकेश चंद्र (१९९३) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (CMD), MAHADISCOM, मुंबई


४. राधिका रस्तोगी (१९९५) यांना प्रधान सचिव आणि विकास आयुक्त, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई


५. आय ए कुंदन (१९९६) प्रधान सचिव, अल्पसंख्याक विकास विभाग, मंत्रालय, मुंबई

Comments
Add Comment

जरांगेंच्या आंदोलनाचं काय होणार ? तोडगा निघणार की... ?

मुंबई : ओबीसी कोट्यातून सरसकट मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी करत मनोज जरांगेंच्या नेतृत्वात त्यांचे

मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान छगन भुजबळ अ‍ॅक्शन मोडवर, ओबीसी नेत्यांसोबत आज घेणार महत्वपूर्ण निर्णय

मुंबई: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरंगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र सरकारचे

Maratha Reservation : मराठा आरक्षण मुद्यावर मध्यरात्री 'वर्षा' बंगल्यावर खलबत! मुख्यमंत्र्यांची दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत महत्वाची बैठक

मुंबई: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील आजपासून मुंबईच्या आझाद मैदानावर कडक आमरण उपोषणाला बसणार

ग्रामीण भागातील प्रत्येक रस्त्याला विशिष्ट क्रमांक

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा महत्त्वाकांक्षी निर्णय ग्रामीण रस्ते होणार अतिक्रमणमुक्त ! मुंबई :

लालबागच्या राजाचे VIP दर्शन वादाच्या भोवऱ्यात! जनसामान्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप

मुंबई: संपूर्ण राज्यात गणेशोत्सवाची धामधूम सुरू असून, राज्यभरातून अनेक लोकं या दिवसात मुंबईत लालबागच्या

आता आणखी किती दिवस?' ऋषभ पंतने सोशल मीडियावर शेअर केली ही पोस्ट

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतने आपल्या दुखापतीबद्दल एक मोठी अपडेट दिली आहे.