ठाणे : आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उल्हासनगरमधील एका कार्यक्रमात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे सिंधी समाज संतापला आहे. सिंधी समाजाने आक्रमक होत ठाण्यातील कोपरी भागात बुधवारी एक मेळावा घेतला आणि आव्हाडांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध केला. तसेच असंसदीय शब्दांचा वापर करणाऱ्या आव्हाडांची आमदारकी रद्द करण्याची मागणी हा समाज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे करणार आहे.
उल्हासनगर प्रभात गार्डन कॅम्प-५ जवळ २७ मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत बोलताना जितेंद्र आव्हाड यांची जीभ चांगलीच घसरली. मंत्री पदावर राहिलेल्या आव्हाड यांनी यावेळी बोलताना सिंधी समाजाला कुत्र्यांची उपमा दिल्याचा आरोप करण्यात येत आहे. आव्हाडांच्या या वक्तव्यानंतर सिंधी समाज आक्रमक झाला आहे.
जोपर्यंत जितेंद्र आव्हाड माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांच्या घरावर मोर्चा काढणे, कोपरी बंद ठेवणे, जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांना निवेदन देणे या संविधानिक मार्गाने निषेध नोंदवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यावेळी शिवसेनेचे प्रकाश कोटवानी, गोपाळ लांडगे, हेमंत पमनानी, दिपक घनशानी यांच्यासह कोपरीतील सिंधी समाज तसेच इतर समाजातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीनंतर आव्हाडांची आमदारकी रद्द करण्याची मागणी सिंधी समाजाने लावून धरली आहे.
आव्हाड यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी उल्हासनगर शहरात ठिकठिकाणी जोरदार निदर्शने करण्यात आली. जितेंद्र आव्हाड यांनी सिंधी समाजाची लेखी माफी मागावी, अशी मागणी होत आहे.
सिंधी समाजाचा अपमान झाल्याची भावना समाजाने व्यक्त करीत आव्हाड यांचा नाशिक येथे निषेध नोंदवला. यापुढे समाजाचा अपमान सहन केला जाणार नाही, असे नाशिक, तपोवन, लिंक रोड येथील रामी भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या निषेध बैठकीत निर्धार करण्यात आला.
मुसळधार पावसाचा पालघरमध्ये पहिला बळी पालघर : मुंबई, ठाण्यासह उपनगरीय भागात काल रात्रभर जोरदार पाऊस…
मुंबई : कांदिवली पश्चिमेकडील पोयसर नदीवर बसवण्यात आलेल्या सक्शन पंपाचे पाईप फुटल्याने आज कांदिवलीत मोठ्या…
मुंबई मनपा, पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणेला सहकार्य करा : एकनाथ शिंदे अजित पवार यांनीही…
हार्बर रेल्वे तसेच मेल एक्स्प्रेस रद्द झाल्याने अडकलेल्या प्रवाशांच्या सोयीसाठी बससेवा मुंबई : मुंबईत काल…
मुसळधार पावसामुळे घडली दुर्दैवी घटना मुंबई : मुंबईसह ठाणे आणि उपनगरांत काल रात्रीपासून मुसळधार पाऊन…
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात (Maharashtra Monsoon Sessions) आज एक महत्त्वाचा ठराव मांडला जाण्याची…