दीर्घ निद्रानाशानंतर १३-१४ तासांची झोप मिळाली

ऋतुराज गायकवाडने केली भावना व्यक्त


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुजरात टायटन्सविरुद्धचा हंगामातील अंतिम सामना सोमवारी रात्री उशीरा संपला. या सामन्यात दीर्घ निद्रानाशाच्या रात्रीनंतर अखेर १३-१४ तासांची झोप मिळाली असल्याची समाधानाची भावना चेन्नईचा सलामीवीर मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने व्यक्त केली. सीएसकेने जेतेपदाचा चषक उंचावल्यानंतर त्याने एक पोस्ट केली. या पोस्टच्या माध्यमातून त्याने आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या.


ऋतुराज गायकवाड म्हणाला की, दीर्घ निद्रानाशाच्या रात्रीनंतर अखेर १३-१४ तासांची झोप मिळाली असल्याची भावना जागृत झाली. अंतिम सामन्याला एवढा उशीर झाल्यानंतर आणि २ चेंडूत १० धावा करायच्या होत्या यावर विश्वासच बसत नव्हता. पण जडेजाने आमच्यासाठी जबाबदारी स्वीकारली. सर्व चाहत्यांचे आभार... ज्यांनी एवढा उशीर होऊनही एवढ्या मोठ्या संख्येने आम्हाला पाठिंबा दर्शवला", अशा शब्दांत ऋतुराजने चाहत्यांचे आभार मानले.


सोमवारी रवींद्र जडेजाने नरेंद्र मोदी स्टेडियमवर विजयी चौकार लगावून आयपीएलला सोळावा चॅम्पियन दिला. चेन्नई सुपर किंग्जने गतविजेत्यांना पराभूत करून आयपीएलवर पुन्हा एकदा आपले नाव कोरले. अखेरच्या चेंडूवर विजय मिळवत चेन्नईने गुजरात टायटन्सचा पराभव केला अन् पाचव्यांदा आयपीएलचा किताब पटकावला.

Comments
Add Comment

वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये पोहोचणारा ऑस्ट्रेलिया ठरला पहिला संघ, बांगलादेशला केले पराभूत

मुंबई: आयसीसी महिला वर्ल्डकप स्पर्धेतील एका महत्त्वपूर्ण सामन्यात, ऑस्ट्रेलियाने बांगलादेशचा १० गडी राखून

अभिषेक शर्मा आणि स्मृती मानधनाला आयसीसी प्लेअर्स ऑफ द मंथ पुरस्कार

दुबई : भारतीय क्रिकेटपटू अभिषेक शर्मा आणि स्मृती मानधना यांनी सप्टेंबर २०२५ साठी आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार

WTC Time Table : पाकिस्तानच्या विजयाने टीम इंडियाला फटका, पाहा कोण आहे अव्वल

नवी दिल्ली: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) २०२५-२०२७ च्या गुणतालिकेत एक महत्त्वपूर्ण बदल झाला आहे. पाकिस्तान

IND vs AUS: इंग्लंड, वेस्ट इंडिजनंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलची खरी परीक्षा

मुंबई: शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना झाला आहे. इंग्लंड आणि वेस्ट

२०३० च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी अहमदाबादची यजमान शहर म्हणून शिफारस, अंतिम निर्णय २६ नोव्हेंबरला

नवी दिल्ली : २०३० मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या (Commonwealth Games) यजमान शहरासाठी भारताच्या 'अहमदाबाद'

"तो कुठेही जाणार नाही!" विराट कोहलीच्या RCBमधील भविष्यावर मोहम्मद कैफ यांची प्रतिक्रिया!

कोहली RCBमध्येच राहणार, निवृत्तीच्या अफवांना पूर्णविराम नवी दिल्ली : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीच्या रॉयल