सावधान! बँक खात्यांमधून पैसे होताहेत गायब!

Share

आरबीआयने जाहीर केली धक्कादायक आकडेवारी

मुंबई : बँकिंग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची फसवणुक होत असून बँक खात्यांमधून पैसे गायब होत असल्याची धक्कादायक आकडेवारी आरबीआयने जाहीर केली आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षात फसवणुकीच्या १३,५३० प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे, तर यात गुंतलेली रक्कम जवळपास ३०,२५२ कोटी रुपये इतकी आहे.

आरबीआयच्या २०२२-२३ च्या वार्षिक अहवालात डिजिटल पेमेंटद्वारे सर्वाधिक फसवणूक झाल्याचे म्हटले आहे. कार्ड/इंटरनेटमधून फसवणुकीची सर्वाधिक प्रकरणे नोंदवली गेली. कर्जाच्या पोर्टफोलिओ बाबतीतही फसवणूक झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

२०२१-२२ मध्ये एकूण ९,०९७ फसवणुकीची प्रकरणे नोंदवली गेली. यामध्ये ५९,८१९ कोटींचा समावेश होता. तर २०२०-२१ मध्ये १,३२,३८९ कोटी रुपयांच्या फसवणुकीची ७,३३८ प्रकरणे समोर आली आहेत. असे आरबीआयच्या अहवालात म्हटले आहे

तीन वर्षात नोंदवलेल्या एक लाख आणि त्याहून अधिकच्या फसवणुकीच्या संदर्भात, आरबीआय डेटा २०२०-२१ च्या तुलनेत २०२१-२२ मध्ये एकूण फसवणुकीच्या रकमेत ५५ टक्के घट झाली आहे.

आरबीआयने म्हटले आहे की, खाजगी क्षेत्रातील बँकांद्वारे नोंदवलेल्या फसवणुकीच्या संख्येत कार्ड/इंटरनेट इत्यादीसारख्या छोट्या किंमतीची फसवणूक अधिक आहे. परंतु सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये कर्जाशी संबंधित फसवणुकीची प्रकरणे अधिक आहेत.

मध्यवर्ती बँकेने असेही निदर्शनास आणून दिले की २०२१-२२ आणि २०२२-२३ दरम्यान नोंदवलेल्या फसवणुकीच्या विश्लेषणावरून असे दिसून येते की फसवणूक झाल्याची तारीख आणि तपास यात बरेच अंतर आहे.

२०२२-२३ दरम्यान, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी २१,१२५ कोटी रुपयांची ३,४०५ फसवणूक केली आहे. खाजगी बँकांनी ८,९३२ प्रकरणे नोंदवली आहेत ज्यात ८,७२७ कोटी रुपयांचा समावेश आहे.

आरबीआयच्या आकडेवारीनुसार, एकूण ३०,२५२ कोटी रुपयांपैकी ९५ टक्के किंवा २८,७९२ कोटी रुपयांच्या कर्ज प्रकरणांची नोंद झाली आहे. बँकिंग क्षेत्रातील फसवणूक रोखण्यासाठी आवश्यक ती पावले उचलणार असल्याचे आरबीआयने म्हटले आहे.

Recent Posts

Palghar news : रस्त्यातील खड्ड्यात आदळली बाईक! हातातून निसटल्याने दीड वर्षीय बाळाचा मृत्यू

मुसळधार पावसाचा पालघरमध्ये पहिला बळी पालघर : मुंबई, ठाण्यासह उपनगरीय भागात काल रात्रभर जोरदार पाऊस…

2 hours ago

सक्शन पंपात बिघाड, कांदिवली तुंबली!

मुंबई : कांदिवली पश्चिमेकडील पोयसर नदीवर बसवण्यात आलेल्या सक्शन पंपाचे पाईप फुटल्याने आज कांदिवलीत मोठ्या…

4 hours ago

CM Eknath Shinde : गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई मनपा, पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणेला सहकार्य करा : एकनाथ शिंदे अजित पवार यांनीही…

4 hours ago

ST Bus : मुसळधार पावसामुळे रेल्वेसेवा ठप्प! जाणून घ्या एसटी बस कुठून व कधी सुटणार?

हार्बर रेल्वे तसेच मेल एक्स्प्रेस रद्द झाल्याने अडकलेल्या प्रवाशांच्या सोयीसाठी बससेवा मुंबई : मुंबईत काल…

4 hours ago

Navi Mumbai news : धावत्या लोकलमधून महिला पडली! जीव वाचला पण गुडघ्यापासून दोन्ही पाय तुटले

मुसळधार पावसामुळे घडली दुर्दैवी घटना मुंबई : मुंबईसह ठाणे आणि उपनगरांत काल रात्रीपासून मुसळधार पाऊन…

5 hours ago

Mumbai Railway stations : मुंबईच्या रेल्वे स्थानकांबाबत आज विधानपरिषदेत होणार महत्त्वाचा ठराव!

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात (Maharashtra Monsoon Sessions) आज एक महत्त्वाचा ठराव मांडला जाण्याची…

6 hours ago