सावधान! बँक खात्यांमधून पैसे होताहेत गायब!

Share

आरबीआयने जाहीर केली धक्कादायक आकडेवारी

मुंबई : बँकिंग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची फसवणुक होत असून बँक खात्यांमधून पैसे गायब होत असल्याची धक्कादायक आकडेवारी आरबीआयने जाहीर केली आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षात फसवणुकीच्या १३,५३० प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे, तर यात गुंतलेली रक्कम जवळपास ३०,२५२ कोटी रुपये इतकी आहे.

आरबीआयच्या २०२२-२३ च्या वार्षिक अहवालात डिजिटल पेमेंटद्वारे सर्वाधिक फसवणूक झाल्याचे म्हटले आहे. कार्ड/इंटरनेटमधून फसवणुकीची सर्वाधिक प्रकरणे नोंदवली गेली. कर्जाच्या पोर्टफोलिओ बाबतीतही फसवणूक झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

२०२१-२२ मध्ये एकूण ९,०९७ फसवणुकीची प्रकरणे नोंदवली गेली. यामध्ये ५९,८१९ कोटींचा समावेश होता. तर २०२०-२१ मध्ये १,३२,३८९ कोटी रुपयांच्या फसवणुकीची ७,३३८ प्रकरणे समोर आली आहेत. असे आरबीआयच्या अहवालात म्हटले आहे

तीन वर्षात नोंदवलेल्या एक लाख आणि त्याहून अधिकच्या फसवणुकीच्या संदर्भात, आरबीआय डेटा २०२०-२१ च्या तुलनेत २०२१-२२ मध्ये एकूण फसवणुकीच्या रकमेत ५५ टक्के घट झाली आहे.

आरबीआयने म्हटले आहे की, खाजगी क्षेत्रातील बँकांद्वारे नोंदवलेल्या फसवणुकीच्या संख्येत कार्ड/इंटरनेट इत्यादीसारख्या छोट्या किंमतीची फसवणूक अधिक आहे. परंतु सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये कर्जाशी संबंधित फसवणुकीची प्रकरणे अधिक आहेत.

मध्यवर्ती बँकेने असेही निदर्शनास आणून दिले की २०२१-२२ आणि २०२२-२३ दरम्यान नोंदवलेल्या फसवणुकीच्या विश्लेषणावरून असे दिसून येते की फसवणूक झाल्याची तारीख आणि तपास यात बरेच अंतर आहे.

२०२२-२३ दरम्यान, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी २१,१२५ कोटी रुपयांची ३,४०५ फसवणूक केली आहे. खाजगी बँकांनी ८,९३२ प्रकरणे नोंदवली आहेत ज्यात ८,७२७ कोटी रुपयांचा समावेश आहे.

आरबीआयच्या आकडेवारीनुसार, एकूण ३०,२५२ कोटी रुपयांपैकी ९५ टक्के किंवा २८,७९२ कोटी रुपयांच्या कर्ज प्रकरणांची नोंद झाली आहे. बँकिंग क्षेत्रातील फसवणूक रोखण्यासाठी आवश्यक ती पावले उचलणार असल्याचे आरबीआयने म्हटले आहे.

Recent Posts

Viral News: ‘हे’ गाणे ऐकून लोक आत्महत्या करायचे; ६२ वर्षांनंतर बंदी हटवली!

मुंबई : आपण अनेक चित्रपटांची गाणी ऐकली आणि बघितली असतील. भारतीय चित्रपटात गाणी नसतील तर…

38 minutes ago

Mumbai Airport Close : प्रवासी कृपया लक्ष द्या, मुंबईचा आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद राहणार आहे!

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.…

42 minutes ago

MI vs CSK, IPL 2025: मुंबई इंडियन्स मागील पराभवाचा वचपा काढणार?

मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…

1 hour ago

लिंबू लोणचं

पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…

2 hours ago

पुण्यात काँग्रेसला गळती, नेते आणि पदाधिकारी महायुतीच्या वाटेवर

पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…

2 hours ago

भाषा हे राजकारण्यांच्या हातातले हत्यार नाही!

डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…

2 hours ago