Wednesday, May 14, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

निवडणूक आयोगाची शिक्षकांवर ‘छडी’

निवडणूक आयोगाची शिक्षकांवर ‘छडी’

मुंबई : राज्यातील शाळांना मे महिन्याची सुट्टी लागली असल्यामुळे अनेक शिक्षक आपल्या हक्काच्या सुट्टीत गावी गेले आहेत. मात्र दुसरीकडे शिक्षकांना सुट्टी मिळाली तर निवडणुकीचे काम कोण करणार? असा सवाल उपस्थित करत प्रशासनाने शिक्षकांना मतदार नोंदणीच्या कामासाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. मात्र अनेक शिक्षक गावी असल्यामुळे निवडणूक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी समतानगर पोलीस ठाण्याला अर्ज देऊन फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली आहे. निवडणूक अधिकाऱ्यांच्या या हालचालीमुळे राज्यभरातील शिक्षकांमध्ये भीतीचे आणि नाराजीचे वातावरण पसरले आहे.


शाळा सुरु असल्यामुळे शिक्षकांना वर्षभर सुट्ट्या घेणे शक्य होत नसते. मात्र मे महिन्यात शाळांना सुट्टी असल्यामुळे शिक्षक सुट्टी लागल्यावर लगेच आपापल्या गावी किंवा बाहेर कुठेतरी फिरवयास जाण्याची योजना बनवितात. अशी सर्व परिस्थिती असतांना पुढील काही दिवसांत लोकसभा, विधानसभा आणि पालिकेच्या निवडणुका येणार असल्यामुळे निवडणूक आयोगाच्या कार्यालयात हालचाली वाढल्या आहेत. त्यामुळे मतदार नोंदणीबाबतची कामे करण्यासाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांची गरज भासते आणि म्हणूनच शिक्षकांना ही मतदार नोंदणीची कामे सोपविण्यात येणार आहेत.

Comments
Add Comment