मोदींना विरोध करणाऱ्यांना जनता जमालगोटा देणार

एकनाथ शिंदे यांनी नवीन संसद भवनाला विरोध करणाऱ्यांना दिली चपराक


नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची यशस्वी कामगिरी पाहून पोटदूखी होणाऱ्या लोकांना जनता जमालगोटा देणार आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवीन संसद भवनाला विरोध करणाऱ्या विरोधकांना चपराक दिली आहे. दिल्लीतील महाराष्ट्र सदनात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंती निमित्त झालेल्या सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, तसेच भाजप व शिवसेनेचे खासदार उपस्थित होते.


ते म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीचे औचित्य साधून नरेंद्र मोदी यांनी नव्या संसद भवनाचे उद्घाटन केले आहे. अत्यंत रेकॉर्डब्रेक वेळेत संसदेचे काम पूर्ण झाले आहे. संपूर्ण देशवासियांना अभिमान वाटेल अशी ही वास्तू असून यामुळे लोकशाही अधिक बळकट आणि वृद्धींगत होणार आहे. देशाला ११ व्या क्रमांकावरुन ५ व्या क्रमांकावर नेणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामगिरीला पाहुन पोटदुखी होणाऱ्या लोकांना जनता जमालगोटा देणार आहे असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला.



स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती महाराष्ट्र सदनात प्रथम


यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती दिल्लीतील महाराष्ट्र सदनात प्रथम साजरी होत असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. काही लोकांना सावरकरांचं वावडं आहे त्यामुळे त्यांनी या कार्यक्रमाला केलेला विरोध दुर्दैवी असल्याचं ते म्हणाले. घराणेशाहीत अडकलेल्या पक्षांकडून या कार्यक्रमात मिठाचा खडा टाकला जात आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.



कावीळ झालेल्यांना सगळं पिवळं दिसतं


यावेळी मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंती कार्यक्रमासाठी आमंत्रण न मिळाल्याचा आरोप करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, या कार्यक्रमासाठी सगळ्यांना निमंत्रण पाठवलं होतं, सर्व जण तिथे आले होते. सर्व जातीपाती-धर्माचे लोक कार्यक्रमाला होते. कोणालाही डावलण्यात आलं नाही. पण कावीळ झालेल्या लोकांना सगळं पिवळं दिसतं. आजच्या या कार्यक्रमात सगळ्यांनी सहभागी व्हायला पाहीजे होतं पण दुर्देव आहे असं त्यांनी म्हटलं.



पालापाचोळ्यासारखे उडून गेले


देशात लोकशाही टिकवायची असेल तर सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यायला हवं असे आवाहन ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलं. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, लोकशाहीचं हे पवित्र मंदिर आहे. लोकशाही टिकवायची असेल तर त्यांनी सहभागी व्हायला हवं होतं. सगळे एकत्र? २०१९ ला देखील सगळे एकत्र आले होते. पण पालापाचोळ्यासारखे उडून गेले. २०१४ पेक्षा २०१९ ला मोदी साहेबांच्या नेतृत्वात जास्तीच्या जागा आल्या. २०२४ ला देखील सगळे रेकॉर्ड मोडतील. १४० कोटी जनता मोदींच्या पाठिशी आहेत, असं म्हटलं आहे.

Comments
Add Comment

TMC political crisis 20 MP likely to join BJP : ममता बॅनर्जींना मोठा झटका! ६० आमदारांनंतर आता २० खासदार भाजपाच्या वाटेवर

कोलकाता : पश्चिम बंगालच्या राजकारणातून अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. विधानसभा निवडणुकीतील दारुण

Jodhpur female influencer: ट्रोलिंगचा त्रास असह्य झाला; जोधपूरमधील महिला इन्फ्लुएन्सरने उचलले टोकाचे पाऊल

जोधपूर : जोधपूरमध्ये सोशल मीडियावरील ट्रोलिंगला कंटाळून एका महिला कंटेंट क्रिएटरने (Content Creator) आत्महत्येचा प्रयत्न

Crime News : डॉक्टर की शैतान ! आधी 8000 रुपयात हाड जोडली, नंतर उरलेले पैसे न दिल्याने डॉक्टरने केले असे काही की ऐकून तुम्हालांही धक्का बसेल

Uttar Pradesh Crime News : मृत्यूच्या खाईतून रुग्णाला परत आणणाऱ्या डॉक्टरला देवाचं दुसरं रूप समजलं जातं. पण हाच डॉक्टर बऱ्याचदा

Indian Railways News : रेल्वे प्रवाशांसाठी मोठी खुशखबर! IRCTC च्या ८०० हून अधिक बेस किचनवर AI कॅमेऱ्यांचा २४ तास पहारा

नवी दिल्ली (IRCTC AI Cameras) : रेल्वे स्थानकांवर आणि प्रवासी गाड्यांमध्ये मिळणाऱ्या जेवणाच्या गुणवत्तेबाबत वारंवार

MONSOON : मान्सूनचे केरळमध्ये दमदार आगमन; दक्षिण भारतासह देशातील २४ राज्यांना पावसाचा इशारा

NEW DELHI : दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर नैऋत्य मान्सूनने केरळमध्ये अधिकृतपणे धडक दिली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD)

Malviya Nagar Fire: दिल्ली अग्नितांडव प्रकरणात धक्कादायक खुलासा; 'या' कारणांमुळे हॉटेल मालकाला अटक

दिल्लीतील एका गेस्ट हाऊसमध्ये लागलेल्या भीषण आगीच्या घटनेनंतर तपास यंत्रणांनी चौकशीची गती वाढवली आहे. या