गेल्या काही दिवसांत अनेक दर्जेदार सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यातील काही सिनेमे सिनेमागृहात प्रदर्शित होत आहेत, तर काही ओटीटीवर. अभिनेता मनोज वाजपेयीचा ‘सिर्फ एक बंदा काफी हैं’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षक हा सिनेमा पाहू शकतात. ज्याला आपण देव मानतो तोच पाप करतो तेव्हा काय होते हे या सिनेमात दाखविण्यात आले आहे. ही कथा अशा एका बाबाची आहे ज्याला लोक देव मानतात. पण त्याने आपल्या भक्तावर मात्र अन्याय केला आहे. हा आपल्या अल्पवयीन मुलाला न्याय मिळवून देणाऱ्या वकिलाबद्दल आहे. हा कोर्टरूम ड्रामा प्रत्येकाने पाहायलाच हवा.
‘सिर्फ एक बंदा काफी हैं’ या सिनेमाच्या सुरुवातीला पीसी सोलंकी यांची कथा असल्याचे सांगण्यात आले होते. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली आसाराम बापूंना तुरुंगात पाठवणारा सोळंकी हा वकील आहे. या सिनेमात थेट कोणाचेही नाव घेण्यात आलेले नाही. पण वकील पीसी सोळंकी यांच्या नावावरुनच सिनेमाच्या कथेचा अंदाज येतो. या सिनेमाच्या सुरुवातीलाच एक अल्पवयीन मुलगी आणि तिचे पालक दिल्लीतील कमल नगर पोलीस ठाण्यात जाताना दिसतात. पोलीस ठाण्यात गेल्यानंतर ते एका बाबावर अल्पवयीन मुलीचे शोषण केल्याचा गुन्हा दाखल करतात. गुन्ह्याची नोंद झाल्यावर पोलीस त्या बाबाला अटक करतात. दरम्यान, बाबांचे भक्त संतापतात. वकील पैसे घेऊन प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करतात. मुलीचे आई-वडील पीसी सोलंकी यांची मदत घेतात. त्यामुळे पुढे काय घडणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना सिनेमा पाहायलाच हवा. अपूर्व सिंह कार्की दिग्दर्शित या सिनेमात एक महत्त्वाचा विषय अतिशय सोप्या पद्धतीने मांडण्यात आला आहे. त्यामुळे दिग्दर्शकांचे विशेष कौतुक.
अभिनेता मनोज वाजपेयीने या सिनेमात चाबूक काम केले आहे. राजस्थानच्या भाषेवर त्याने प्रभुत्व मिळवले आहे. या सिनेमासाठी त्याने घेतलेली मेहनत सिनेमात दिसून येते. एकंदरीत मनोजने पीसी सोलंकीची गोष्ट खऱ्या अर्थाने जिवंत केली आहे. अल्पवयीन मुलीची भूमिका अदिती सिंह एंड्रिजाने साकारली आहे. तिचेदेखील काम चांगले झाले आहे. विपीन शर्माचा अभिनय जबरदस्त आहे. या सिनेमातील सर्वच कलाकारांनी या आपली पात्र योग्यपद्धतीने साकारली आहेत. हा सिनेमा प्रेक्षकांना शेवटपर्यंत गुंतवून ठेवतो. हा एक कोर्ट ड्रामा आहे. जर तुम्ही सत्याच्या पाठीशी असाल, तर तुमचे काहीही नुकसान होऊ शकत नाही, ही या सिनेमाची गोष्ट आहे. या सिनेमाला एक गती आहे. या सिनेमातील संवाद, दृश्ये अत्यंत प्रभावी आहेत.
नवी दिल्ली : मंगळवार २२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे…
दहशतवाद्यांचे उरलेले अड्डे नष्ट करण्याची वेळ आली आहे- पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्ली: पहलगाममधील पर्यटकांवर…
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पहलगाम…
मुख्यमंत्री हिमंता बिस्वा यांची ट्विटर पोस्ट चर्चेत नवी दिल्ली : पहलगाममध्ये पर्यटकांवर मंगळवारी झालेल्या दहशतवादी…
सातारा: रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आला आहे. या चित्रपटाचं शूट…
मुंबई : बॉलीवूड (Bollywood) चित्रपटसृष्टीत सातत्याने नवनवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. गेल्या काही दिवसांत…