अलिबागला पोहोचायला लागणार चार तास!

मुंबई : पावसाळा, उन्हाळा अगदी कोणत्याही ऋतूत पर्यटक अलिबागला जाणं नेहमीच पसंत करतात. समुद्रमार्गे बोटीने येताना प्रवाशांना लाटांचा आनंद घेत प्रवास करता येतो. पर्यटक जलवाहतूकीद्वारेच अलिबाग गाठत असतात. त्यामुळे सर्वच प्रवाशांना जलवाहतूक फायदेशीर ठरत असते. सोबतच एका तासात पोहोचता येत असल्यामुळे वेळेचीही बचत होते. मात्र आता याच प्रवासासाठी चार तास मोजावे लागणार आहेत.


याचं कारण म्हणजे पावसाळा तोंडावर आला असताना वेळेची बचत करणारा मांडवा ते गेट वे हा जलवाहतूक प्रवास आता तीन महिन्यांसाठी बंद राहणार आहे. २६ मे ते ३१ ऑगस्टदरम्यान प्रवासी जलवाहतूक बंद राहणार असून, महाराष्ट्र सागरी मंडळ विभागाने जलवाहतूक सेवा देणाऱ्या कंपन्यांना पत्र देऊन वाहतूक बंद करण्याचे कळविले आहे. त्यामुळे मुंबईला जाण्या-येण्यासाठी आता रस्ते मार्गाने प्रवास करावा लागणार आहे. जलवाहतूकीद्वारे मुंबई गाठण्यासाठी एका तासात होणा-या प्रवासाला रस्तेमार्गामुळे चार तासाचा अवधी लागणार आहे.


मांडवा ते गेटवे समुद्री ब्लॉक असला तरी मांडवा ते भाऊचा धक्का रो रो बोट सेवा सुरू राहणार असल्याने प्रवाशांची गैरसोय होत असली तरी काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. मात्र, हवामानानुसार रो रोच्या फेऱ्या रद्द केल्या जाणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना आता तीन महिने रस्ते मार्गानेच ये-जा करावी लागणार आहे.

Comments
Add Comment

BMC : नालेसफाईच्या कामांवर सत्ताधारी पक्षच नाराज

ऑन दी स्पॉट थर्ड पार्टी ऑडिट करण्याची महापालिकेची मागणी महापालिका कंत्राटदार नाही, तर नगरसेवक

Monsoon Update : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा ; कोकणात पावसाचा जोर वाढणार

मुंबई : देशभरात आणि महाराष्ट्रात (Maharashtra) दाखल झाल्यानंतर अचानक थबकलेल्या मान्सूनच्या प्रगतीसाठी आता पुन्हा एकदा

'National Database' of lawyers : वकिलांची माहिती देणारा 'राष्ट्रीय डेटाबेस' आणि सोशल मीडिया नियमावली तयार करा; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार व 'बीसीआय'ला नोटीस

  नवी दिल्ली: देशातील बोगस वकिलांचा शोध घेऊन त्यांना कायदेशीर क्षेत्रातून बाहेर काढण्यासाठी एक देशव्यापी

पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसर विकासासाठी

३ हजार ९९३.९० कोटींच्या आराखड्याला मंजुरी मुंबई : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूर येथील ‘श्री

Deepak Sawant : उबाठाचा एक नगरसेवक झाला कमी

संजय राऊत, सुनील राऊतला मोठा धक्का जात प्रमाणपत्र समितीने जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्याने महापालिका सदस्यत्व

Devendra Fadnavis : 'यूएई आणि भारता'मधील बँकिंग भागीदारी भारतीय अर्थव्यवस्थेच्या उत्कर्षाचे प्रतीक

केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांचा दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे सहभाग एमिरेट्स एनबीडी आणि आरबीएल