विजयाचे आकाश मुंबईच्या कवेत...

  134

इंडियन्सकडून लखनऊचा दारूण पराभव


चेन्नई (वृत्तसंस्था) : आकाश मधवालच्या विलक्षण गोलंदाजीच्या बळावर मुंबई इंडियन्सने लखनऊ सुपर जायंट्सला ८१ धावांनी पराभवाची धूळ चारत आयपीएलच्या यंदाच्या हंगामात क्वालिफायर सामन्यात प्रवेश केला. आकाशने केवळ ५ धावा देत ५ विकेट मिळवत लखनऊचा सुपडा साफ केला. या विजयामुळे मुंबईने आगेकूच केली असून लखनऊचा हंगामातील प्रवास मात्र थांबला.


प्रत्युत्तरार्थ फलंदाजीला आलेल्या लखनऊ सुपर जायंट्सवर मुंबईच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच अंकुश ठेवला. आकाश मधवालने मुंबईला विकेटचे खाते उघडून दिले. प्रेरक मंकडला शोकीनकरवी झेलबाद करत मधवालने मुंबईला पहिली विकेट मिळवून दिली. जॉर्डनने कायले मायर्सचा अडथळा दूर करत लखनऊला दुसरा धक्का दिला. कृणाल पंड्या आणि मार्कस स्टॉयनीस या जोडीने लखनऊचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. कृणालची बॅट शांत होती, मात्र स्टॉयनीसने लाजवाब फटकेबाजी करत लखनऊच्या धावांना गती देत होता. त्यात कृणालने स्टॉयनीसची साथ सोडली. त्यानंतर एकाही फलंदाजाने स्टॉयनीसला साथ दिली नाही. स्टॉयनीसने संघातर्फे सर्वाधिक ४० धावांचे योगदान दिले. आकाश मधवाल लखनऊच्या फलंदाजीवर तुटून पडला. त्याने एक दोन नव्हे तर ५ फलंदाजांना तंबूत पाठवले. मधवालने ३.३ षटकांत केवळ ५ धावा दिल्या आणि ५ विकेट मिळवले. विशेष म्हणजे त्याने १७ निर्धाव चेंडू टाकले. मधवालच्या धडाक्यामुळे लखनऊचा डाव १६.३ षटकांत १०१ धावांवर सर्वबाद झाला.



प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी खेळता आली नाही. मात्र तरीही कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नेहल वधेरा यांनी सांघिक फलंदाजी करत मुंबईला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. कॅमेरॉन ग्रीनने सर्वाधिक ४१ धावा जमवल्या. या खेळीत त्याने ६ चौकार आणि १ षटकार ठोकला. सूर्याने २० चेंडूंत २ चौकार आणि तितकेच ३३ धावांची भर घातली.



तिलक वर्माने २६, तर नेहल वधेराने २३ धावा जोडल्या. या सांघिक कामगिरीमुळे मुंबईने निर्धारित २० षटकांत ८ फलंदाजांच्या बदल्यात १८२ धावा जमवल्या. लखनऊच्या नवीन उल हक आणि यश ठाकूर यांना धावा रोखण्यात यश आले नसले, तरी त्यांनी मुंबईच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. नवीन उल हकने लखनऊतर्फे सर्वाधिक ४ फलंदाजांना बाद केले. तर यश ठाकूरने ३ फलंदाजांना माघारी धाडले.

Comments
Add Comment

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार

इंग्लंडचा दुसऱ्या कसोटीसाठीचा संघ जाहीर, आर्चरचे पुनरागमन

Archer included in England squad for second Test लंडन : इंग्लंड आणि भारत यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला