विजयाचे आकाश मुंबईच्या कवेत...

इंडियन्सकडून लखनऊचा दारूण पराभव


चेन्नई (वृत्तसंस्था) : आकाश मधवालच्या विलक्षण गोलंदाजीच्या बळावर मुंबई इंडियन्सने लखनऊ सुपर जायंट्सला ८१ धावांनी पराभवाची धूळ चारत आयपीएलच्या यंदाच्या हंगामात क्वालिफायर सामन्यात प्रवेश केला. आकाशने केवळ ५ धावा देत ५ विकेट मिळवत लखनऊचा सुपडा साफ केला. या विजयामुळे मुंबईने आगेकूच केली असून लखनऊचा हंगामातील प्रवास मात्र थांबला.


प्रत्युत्तरार्थ फलंदाजीला आलेल्या लखनऊ सुपर जायंट्सवर मुंबईच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच अंकुश ठेवला. आकाश मधवालने मुंबईला विकेटचे खाते उघडून दिले. प्रेरक मंकडला शोकीनकरवी झेलबाद करत मधवालने मुंबईला पहिली विकेट मिळवून दिली. जॉर्डनने कायले मायर्सचा अडथळा दूर करत लखनऊला दुसरा धक्का दिला. कृणाल पंड्या आणि मार्कस स्टॉयनीस या जोडीने लखनऊचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. कृणालची बॅट शांत होती, मात्र स्टॉयनीसने लाजवाब फटकेबाजी करत लखनऊच्या धावांना गती देत होता. त्यात कृणालने स्टॉयनीसची साथ सोडली. त्यानंतर एकाही फलंदाजाने स्टॉयनीसला साथ दिली नाही. स्टॉयनीसने संघातर्फे सर्वाधिक ४० धावांचे योगदान दिले. आकाश मधवाल लखनऊच्या फलंदाजीवर तुटून पडला. त्याने एक दोन नव्हे तर ५ फलंदाजांना तंबूत पाठवले. मधवालने ३.३ षटकांत केवळ ५ धावा दिल्या आणि ५ विकेट मिळवले. विशेष म्हणजे त्याने १७ निर्धाव चेंडू टाकले. मधवालच्या धडाक्यामुळे लखनऊचा डाव १६.३ षटकांत १०१ धावांवर सर्वबाद झाला.



प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी खेळता आली नाही. मात्र तरीही कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नेहल वधेरा यांनी सांघिक फलंदाजी करत मुंबईला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. कॅमेरॉन ग्रीनने सर्वाधिक ४१ धावा जमवल्या. या खेळीत त्याने ६ चौकार आणि १ षटकार ठोकला. सूर्याने २० चेंडूंत २ चौकार आणि तितकेच ३३ धावांची भर घातली.



तिलक वर्माने २६, तर नेहल वधेराने २३ धावा जोडल्या. या सांघिक कामगिरीमुळे मुंबईने निर्धारित २० षटकांत ८ फलंदाजांच्या बदल्यात १८२ धावा जमवल्या. लखनऊच्या नवीन उल हक आणि यश ठाकूर यांना धावा रोखण्यात यश आले नसले, तरी त्यांनी मुंबईच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. नवीन उल हकने लखनऊतर्फे सर्वाधिक ४ फलंदाजांना बाद केले. तर यश ठाकूरने ३ फलंदाजांना माघारी धाडले.

Comments
Add Comment

IND W vs AUS W : भारतीय संघ दिमाखात फायनलमध्ये, ऑस्ट्रेलियाला केले चारीमुंड्या चीत, आता द. आफ्रिकेशी होणार लढत

नवी मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला वनडे वर्ल्डकपच्या सेमीफायनल सामन्यात भारताने बलाढ्य

शरद पवार-फडणवीस एकत्र! 'या' नेत्यांना मोठा धक्का! नक्की काय घडलं?

मुंबई : राज्याच्या राजकारणात नेहमीच एकमेकांविरोधात उभे ठाकणारे भाजपचे नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि

कोहलीचा १८ नंबर घेऊन पंत मैदानात: सोशल मीडियावर व्हायरल फोटो!

आसाम : ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या मालिकेत भारताला पराभव पत्करावा लागला. सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात

WC Semifinal: स्मृती मंधानाच्या विकेटवरून वाद, मैदानावर उभे असलेले अंपायरही झाले हैराण

नवी मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आयसीसी महिला क्रिकेट वनडे वर्ल्डकपचा सेमीफायनल

सेमीफायनल सामन्यात काळी पट्टी बांधून खेळतायेत खेळाडू... कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क!

मुंबई : आयसीसी महिला विश्वचषक २०२५ चा दुसरा उपांत्य सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जात आहे.

सेमी फायनलसाठी भारतीय संघात तीन मोठे बदल ; ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरू

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात महिला वन डे वर्ल्ड कप २०२५ चा सेमी फायनल सामना नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील