भीषण अपघातात पाच जणांसह १९० मेंढ्या जागीच मृत, दोन जण गंभीर

Share

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीपासून काही अंतरावर असलेल्या माळेगावजवळ झालेल्या अपघातात पाचजणांसह एकूण १९० मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाला. याशिवाय दोन जण गंभीर जखमी आहेत. मेंढ्या घेऊन जाणाऱ्या मालमोटारीने उभ्या असलेल्या फरशीने भरलेल्या मालमोटरीला समोरून जबर धडक दिल्याने ही दुर्घटना घडली.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनूसार, राजस्थान येथील एक मालमोटर (एचआर-५५-एजे-३१११ ) २०० हूनअधिक मेंढ्या भरून हैदराबादकडे निघाला होता. या मालमोटर चालकासह चौघेजण केबिनमध्ये बसले होते. एक व्यक्ती पाठीमागे मेंढ्यांसोबत बसला होता. माल मोटर गुरुवारी (२५ मे) पहाटे तीन ते साडेतीनच्या सुमारास माळेगाव फाट्याजवळ आली असताना उड्डाणपुलाजवळ माल मोटरचालकाला डूलकी लागली. त्यामुळे त्याचा वाहनावरील ताबा सुटला आणि समोर उभे असलेल्या मालमोटरवर त्याचे वाहन आदळले.

या अपघातामध्ये मालमोटरमधील तिघेजण जागीच ठार झाले, तर गंभीर जखमी झालेल्या दोघांना पुढील उपचारासाठी नांदेडला नेत असताना मध्येच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अपघातातील दोन्ही जखमींना उपचारासाठी तात्काळ कळमनुरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेडला हलवले. मात्र रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

या अपघातामधील मृतांमध्ये सलमान आली मौला अली, सत्यनारायण बळाई, लालू मीना, कदीरमेवाती, आलम अली यांचा समावेश आहे. यामध्ये एक जण राजस्थानमधील असून इतर मध्य प्रदेशातील असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Recent Posts

Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीयेला आपल्या राशीनुसार खरेदी करा या गोष्टी, मिळतील भरपूर लाभ

मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…

5 minutes ago

LSG vs DC, IPL 2025: ऋषभ पंत घरच्या मैदानावर दिल्लीला रोखणार?

मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…

25 minutes ago

Heat wave: उष्णतेच्या लाटेपासून असा करा बचाव…जाणून घ्या या टिप्स

मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…

58 minutes ago

कोकण रेल्वेने प्रवास करण्याआधी हे जरूर वाचा…

कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…

2 hours ago

‘चला वाचू या! सुट्टीतील वाचनालय’, मुंबई महानगरपालिकेकडून विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रम

येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…

2 hours ago

चंद्रपूर: येत्या २४ एप्रिल पर्यंत उष्णतेचा ‘येलो अलर्ट’

चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…

3 hours ago